गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत अडपल्ली,कालीनगर येथील सन २०१६-२०२१ या वित्तीय वर्षातील ठक्कर बाप्पा योजनेच्या कामात भ्रष्टाचार- जिल्हाध्यक्ष प्रा अशोक लांजेवार यांची चौकशी करण्याची CEO कडे मागणी.

0
408

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,नक्षल ग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.हा जिल्हा अतिमागास असल्याने केंद्र व महाराष्ट्र शासनाने सन २०१६ ते २०२५ पर्यंत जिल्हा परीषदेच्या प्राप्त लेखाशिर्षाकानुसार ठक्कर बापा,बिआरजीएफ, मनरेगा, १३, १४, १५ व वित्त आयोग, नक्षल योजना जिल्हा वार्षिक योजना, २५१५३०५४ इत्यादी योजनेमध्ये करोडो रुपयेचा निधी प्राप्त झाला.मात्र मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली, कालीनगर या ग्राम पंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी सदर निधीच्या वापरात करोडो रुपयेचा भ्रष्टाचार करून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसविले व सदर निधीचा विल्लेवाट लावलेला आहे.या संपूर्ण कामात प्रचंड गैरव्यवहार तथा भ्रष्टाचार झालेला आहे.
चौकशी करताना सर्व योजनांच्या मोजमाप पुस्तिका मधील काम केलेल्या कामाचे स्तळ दर्शविलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष मोका चौकशी करून तसेच झालेल्या खर्चाची देयके आणि कामावर असलेल्या मजुराचे हजेरी पट तपासण्यात यावे अशी मागणी लेखी तक्रार जिल्हाध्यक्ष प्रा अशोक लांजेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. कामात गैरव्यवहार,भ्रष्टाचार झालेला असून एकाच कामाचे स्तळ अनेक योजनेमध्ये दाखवून शासकीय निधीचा परस्पर अपहर केलेला आहे. यामध्ये ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी,शाखा अभियंता जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here