सचिन वाघे वर्धा
15.5.21
(हिंगणघाट)
जीवघेण्या कोरोणा संसर्गाशी नागरीक संघर्ष करीत असतांनाच कोरोणाचा संसर्ग झालेल्यांना आणि त्यातून मुक्त झालेल्या रूग्णांना म्युकरमायक्रोसिस(काळी बुरशी) या आजाराची लागण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.प्रत्येक जिल्ह्यात या आजाराचे रूग्ण आढळून यायला लागलेले आहेत.हा रोग अतिजलद पसरणारा रोग असून तो मुख्यता नाक,डोळे आणि मेंदू ह्यांना बाधीत करीत असतो .हा आजार कॕन्सर पेक्षाही भयानक असून या आजारावर वेळीच उपचार झाले नाही तर रूग्णांना डोळे ,दृष्टी व प्राणही गममावा लागू शकतो .त्यामुळे आरोग्य यंत्रणेने वेळीच सतर्क होऊन या आजाराविषयीची नागरीकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे आहे.तसेच कोरोणा झालेल्या आणि त्यातून बरे झालेल्या रूग्णांसाठी उपजिल्हा रूग्णालयात स्वतंत्र पोस्ट कोव्हीड ओपीडी सुरू करावी.बुररशीरोधक इंजेक्शनची अगोदरच व्यवस्था करून ठेवावी. वेळीच रूग्णाला हे इंजेक्शन दिल्या गेले तर त्यावरील शस्रक्रीया व पुढचा अनर्थ टळू शकतो.सध्या या रूग्णाचे प्रमाण कमी दिसत असले तरी त्याचा प्रसार जर जलदगतीने झाला तर मृत्यूचे थैमान माजेल म्हणूनच आरोग्य यंत्रणेने वेळीच जागृत होऊन या आजारावरील उपचाराची अगोदरच व्यवस्था करून ठेवावी अशी मागणी विदर्भ विकास आघाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल जवादे यांनी केले आहे.