सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.30.6.21 कोरोनापासून मुक्त होण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरण करवून घेण्याचा प्रचार शासनाचे वतीने करण्यात येत असला तरी लसिकरणासाठी आवश्यक असलेल्या लसिच्या मात्रा सरकारकड़े पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे.
लसिकरण मोहिमेसंदर्भात माहिती घेतली असता तालुक्यातसुद्धा आज लसिचा तूटवडा असल्याने लसिकरण केंद्रांवर जावून नागरिक परत येतांना आढळले.
जिल्हा पातळीवरुन लसिचा पुरवठा संपला असल्याने सर्वच वयोगटातील लसिकरण बंद असल्याचे दिसुन येत आहे.
आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेतली असता कोरोना लस संपल्याने लसिकरण केंद्रे बंद असून पुढील 1 – 2 दिवसात जिल्हा पातळीवरुन लसिचा पुरवठा झाल्यावर लसिकरण तात्काळ सुरु करण्यात येईल,अशी माहिती तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी कुचेवार(दिघे) यांनी दिली.