आघाडी शासनाने वेळोवेळी जाहीर केले की ओबीसीचे आरक्षण कायम झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात येणार नाहीत परंतु हे आरक्षण कायम ठेवण्याकरता शासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही. आता न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद पोटनिवडनुका जाहीर झाल्या आहेत तरी निवेदनाद्वारे आम्ही असे आव्हान करतो की, मुलीचे आरक्षणासाठी लागणारा इंपिरियल डाटा लवकरात लवकर तयार करून आरक्षण कायम ठेवावे व नंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यात यावे अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल त्याची जबाबदारी सर्व शासनाची असेल.असे निवेदन नायब तहसीलदार भागवत साहेब यांच्याकडे देण्यात आले यावेळी नगर परिषद अध्यक्ष शकुंतला शकुंतला ताई पांडुरंग बुच , सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग बुच, विजुभाऊ टिळक, अमित देशमुख भाजपचे सर्व तालुका पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते







