शहरातील पशुधन पालकांची पाळीव जनावरांच्या चोरी प्रकरणात अलीकडे वाढ झाली असून अनेक पशुपालकांनी बकऱ्या व गुरांची चोरी झाल्याच्या तक्रारी हिंगणघाट पोलिसांत केल्या आहे.
सदर चोरी प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सखोल तपास केल्यानंतर पोलिसांना पशुधन चोरी करणारी टोळी हाती लागली असून या टोळीतील चार गुन्हेगारांसह 7 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांत शहरातील
संत कबीर वार्ड, गोमाजी वार्ड,इंदिरा गांधी वार्ड येथून विविध ठिकाणावरून फिर्यादी तसेच इतर पशुपालकांची 12 जनावरे चोरून नेल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदर तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. 879/2021 कलम 379, 380 अ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद केला होता.
सदर प्रकरणी शहरात तसेच परिसरात शोध घेऊन संशयित आरोपी बबलु उर्फ शुभम मनोहर फुलझेले. वय 28 व रा
बडवाईक वस्तीगृहामागे, रामबाग, नागपूर, प्रतिक राजु पंचभाई, वय 19 वर्ष, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट, वैभव किसनाजी लेदे, वय 21 वर्ष, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट तसेच वैभव कालीदास खुडसंगे. वय 21वर्ष रा.चांदीमारी
चौक, तुकूम, चंद्रपूर यांना ताब्यात घेवून त्यांना विचारपुस केली, पोलिसांच्या दंडुकयाचा धाक दाखविताच आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी आरोपींकडुन गुन्हा करण्याकरीता वापरलेली महेन्द्र स्कार्पियो मोटरगाड़ी क्र. एमएच-34/ए-1186, मारोती
स्वीफ्ट डिझायर गाडी क्र. एमएच-04/जीडी-8221 तसेच आरोपिंचे चार मोबाईल असा एकुण 7लाख 31 हजार रूपये
किमतीचा माल जप्त करण्यात आला.
सर्व आरोपीना पोलीस कोठडी दिली असुन घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक सोमेश्वर टापरे हे करीत आहे.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, ,अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोलंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे,बाबु मुंडे,डीबी पथकाचे शेखर डोंगरे,नापोशी निलेश तेलरांधे,सचिन घेवन्दे,विशालबंगाले,सचिन भालशंकर,पोशी विजय हरनूर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा