साकळी येथे जल्लोषात रंगणार क्रिकेटचा ‘महासंग्राम’ मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन महिनाभर चालणार क्रिकेटचे सामने

0
547

 

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

जयभारत क्रिकेट क्लब,साकळी यांच्या वतीने साकळी ता.यावल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आलेले असून दि.२८ रोजी क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन जि.प.शिक्षण,क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील(छोटूभाऊ) तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी ग्रा.पं.सदस्य दिपक नागो पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन या क्रिकेटच्या महासंग्रामस सुरुवात करण्यात आली आहे .याप्रसंगी यावल पंचायत समिती माजी उपसभापती तथा व पं.स.सदस्य दिपक पाटील,शिवसेना युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण सोनवणे( गोटूभाऊ )ग्रा.पं.सदस्य दिनकर माळी,जगदीश मराठे, सामाजिक कार्यकर्ते संदिप तायडे, नितीन फन्नाटे,सुरेश बडगुजर यांचेसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फलंदाजी करून उद्घाटन करण्यात आले.आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदरील क्रिकेट सामन्याचे आयोजन मनवेल रोडच्या लगतच्या मैदानावर करण्यात आलेले आहेत. या किक्रेट टूर्नामेंटमध्ये साकळी व परिसरातील जवळपास ४५ क्रिकेटच्या संघांनी सहभाग घेतलेला आहे. जवळपास एक महिनाभर क्रिकेटचे सामने चालणार आहे.प्रत्येक सामना हा बारा ओव्हरींचा खेळला जाणार आहे. या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी होणाऱ्या संघास कै. अण्णासाहेब सूर्यभान हिरामण पाटील(साकळी) यांच्या स्मरणार्थ अकरा हजारांची रोख बक्षीस तर द्वितीय क्रमांकाने विजयी होणार या संघास कै.नागो श्यामजी पाटील(साकळी) यांच्या स्मरणार्थ पाच हजाराचे रोख बक्षीस जाणार आहे. सर्व सामने प्लास्टिक बॉल (विकीचा) ने खेळली जाणार आहे.एकुणच या क्रिकेट्च्या महासंग्रामात क्रिकेटप्रेमींना क्रिकेट खेळाचा मोठा आनंद घेता येणार आहे तर या खेळा दरम्यान तरुणाईचा मोठा जल्लोष असणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील पाटील यांनी केले.उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी तरूण क्रिकेट प्रेमी व गावातील नागरिक तसेच आयोजक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here