यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील नायगाव येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध ठेवुन तरूणीस लग्न करण्यासाठी जिवे ठार मारण्याची धमकी देवुन विनयभंग करणाऱ्या जळगावच्या तरूणा विरूद्ध तरुणीच्या फिर्यादीवरून विरूद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की नायगाव तालुका यावल येथील राहणारी २२ तरुणी सोबत शांताराम श्रावण ठाकुर राहणार शिरसोली तालुका जिल्हा जळगाव या तरूणाने जुलै २०१८ते २७ / ११ / २०२१या कालावधी दरम्यान फिर्यादी तरूणी ही क्लासेसला जात येत असतांना तिच्या घरी नायगाव येथे येवुन व जळगाव येथे वेळोवेळी प्रेमसंबंध ठेवुन जवळकी साधुन फिर्यादी तरुणीच्या घरी जावुन माझ्याशी लग्न कर अशी मागणी करून अट घातली व तु जर माझ्याशी लग्न केले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबास जिवंत सोडणार नाही असा दम दिला . त्या वेळीस घाबरलेल्या तरूणीने शांताराम ठाकुर या तरूणा विरूद्ध यावल पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन२०३ / २०२१ भा .द .वी . ३५४ ( अ ) ५०६ , ५०७प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .