प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट :- बहुजन समाज पार्टी हिंगणघाट विधानसभा द्वारा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर बसपा नेता प्रलय तेलंग व इंजी. प्रा. नितेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली.
Ajitpawar / पवारांनी मोठया आवाजात सांगितले,“लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही?
हिंगणघाट तालुक्यातील बेला – वाघोली व अन्य शिवारामध्ये अनेक दिवसां पासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. खंडित वीज पुरवठा अभावी शेतकऱ्याना शेतामध्ये ओलीत करण्याकरिता त्रास होत आहे.
त्यामुळे पुर्वी झालेल्या पापसाच्या हजेरीने शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पीक बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. कारण अद्याप पेरणी नंतर चा योग्य पाऊस झाला नाही. विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना अतिशय त्रास देत आहेत.
सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाच्या द्वारे पाच तासाच्या आत विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. सदर निवेदन देताना नितेश कांबळे, प्रलय तेलंग,सुदेश जवादे, गणेश बावणे, मोरेश्वर जवादे, प्रदीप हाडके, अँड. मयुर मुन, अशोक कांबळे, सेवक वानखेडे,
Msebnews:मनोज कळसकर, विनायक पाटील, संजय भगत, रवींद्र भगत, प्रकाश नगराळे, सेवक वानखेडे, आवारी पाटील, प्रकाश पाणबुडे, राहुल मून, रामुजी वासेकर, बंडु थूल, भीमराव मुन, सुरेश भगत, अशोक मुन, चंदन थूल, राजकुमार मेश्राम, विजय पाटील, आनंद भगत, हरीश नाईक, विकास कोल्हेकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.