प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट : शहरात गॅस सिलेंडरच्या टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकीकडे पुरवठा विभागाचे अधिकारी शहरात कोणतीही टंचाई नसल्याचे सांगत असताना, दुसरीकडे ग्राहकांना 18-20 दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
माहितीनुसार, शहरी भागातील ग्राहकांनी 25 दिवसांनंतरच नवीन सिलेंडरसाठी बुकिंग करावे, असे नियम सांगितले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेक ग्राहकांना बुकिंग करून तीन आठवडे उलटूनही सिलेंडर न मिळाल्याने घरगुती कामकाज विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, गॅस एजन्सी चालकांकडून “वरूनच माल येत नाही” अशी कारणे दिली जात आहेत. यामुळे प्रशासन आणि एजन्सी यांच्यातील विसंगती स्पष्ट होत असून नागरिक मात्र या दोघांच्या मध्ये अडकले आहेत.
शहरातील गृहिणींना याचा सर्वाधिक फटका बसत असून पर्यायी इंधनाचा वापर करण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे. वाढत्या समस्येमुळे नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.
gas cylinder/एकीकडे “टंचाई नाही” असा प्रशासनाचा दावा आणि दुसरीकडे नागरिकांचा अनुभव यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या समस्येवर प्रशासन काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=100%2C70&ssl=1)
