सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )
कोरोनामुळे शेतकरी व सर्व सामान्य जनता अर्थिक संकटात सापडलेली आहे त्यात आणखी भर म्हणून विद्युत वितरण कंपनीने सर्व सामान्य ग्राहकना जास्त वीज बिल देऊन त्यांना अर्थिक मानसीक ञास देणे सुरू केले आहे महावितरणने वीज कनेक्शन तोडल्यास राज्य भर आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्ध पञिकात दिला आहे.
घरगुती वापराचे व कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची धमकी विद्युत वितरणाची कर्मचारी देत आहे त्यात वाढीवविज कमी करुन देण्याचा नावाखाली ग्राहकांकडून पैशाची मागणी केली जात आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन जनतेची होणारी फसवणूक थांबवावी वीज वापरली तितकेच वीज बिल त्यांना द्यावे सर्व सामान्य जनतेची होणारी लुट थांबवावी तसेच चुकीच्या पद्धतीने वीज कनेक्शन कट करु नये अन्यथा राज्य शासनाचा विद्युत वितरण कंपनी चा विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील यांनी दिला आहे