SURYA MARATHI NEWS
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते.व त्यांनंतर त्यांची तब्बल तेरा तास चौकशी झाली होती.व त्यानंतर त्यांना ईडी कडून अटक करण्यात आली होती. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या या आरोपांनंतर गेली अनेक दिवस देशमुख हे गायब झाले होते. व सोबतच याच काळात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व ज्यांनी देशमुखांवर हे गंभीर आरोप केले ते, व परमवीर सिंग हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून गायब आहेत. पन काही दिवसांपुर्वी परमबीर सिंग यांनी एक पत्र लिहीलं होतं त्यात ते म्हणाले होते अनिल देशमुखांविरोधात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. व
तब्बल तेरा तास चौकशी चालल्यानंतर ईडीकडून देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे येत्या काळात देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले होते. आजच देशमुख यांनी खुले पत्र लिहीत परमवीर सिंग यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे या पत्रात म्हटले होते. या पत्रातून त्यांनी सचिन वाझे ( sachin vajhe) व परमवीर सिंग यांना लक्ष्य केले होते. व तसेच मी संविधान मानणारा भारताचा नागरिक असून ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीला सामोरे जाऊन ईडीच्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे म्हटले होते. व तसेच हि चौकशी निष्पक्षपणे व्हावी अशी अपेक्षा देखील त्यांनी या खुल्या पत्रात व्यक्त केली होती. Surya marathi news