इस्माइल शेख सह अमीन शेख
buldhananews:आगर : लोकसभेच्या निवडणुकीच्या धावपळीत शासनाने चक्क दिव्यांगाकडे पाठ फिरवली आहे.
buldhananews
दिव्यांग व्यक्तींना मिळणारी संजय गांधी पेन्शन योजनेचे मानधन गेली तिन महीने झाले दिव्यांग व्यक्तींच्या खात्यावर जमा झालेले नाही.ज्या गरीब ,गरजु ,अनाथानांचा उदर निर्वाह पेंशन वर होत आहे.
काही महीन्यापुर्वी महाराष्ट्र शासनाच्या वतीने “शासन आपल्या दारी “हा उपक्रम राबवला .पण महाराष्ट्र राज्यातील किती गरजु अपंगांना या योजनेचा फायदा झाला ? हा प्रश्न आता दिव्यांगाकडुन निर्माण होत आहे.
आमदार व खासदार यांच्या पेंशन मध्ये नेहमीच भरगोस वाढ होत आहे.पण दिव्यांगांना पंधराशे रुपये महिना मिळणारी पेंशन वेळेवर मिळत नाही.
शासनाने फिरवली पाठ ; दिव्यांग बघत आहे पेंशनची वाट ( buldhananews )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
इतर राज्या प्रमाणे महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींना मिळवणाऱ्या पेंशन मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने वाढ करावी.
buldhananews:व ती वेळेवर मिळावी या करीता दिव्यांग व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या विविध संघटना व संस्था शासनदरबारी दिव्यांगांच्या विविध अडचणी संदर्भात पत्रव्यवहार करुन निवेदन देउनही दिव्यांगांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे.


![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)




