अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात
FarmerNews:बु लडाणा :-पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
Buldhana Takkal virus / केसगळतीचा गूढ: रेशनच्या गव्हाचा संबंध नाही, पाण्याचाही नाही
या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळण्याची सुरुवात झाली आहे.
जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २२ हजार २१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना एकूण १३ कोटी २३ लाख रुपयांची भरपाई देण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे मदतीचा निधी जमा केला जात आहे. यापैकी ११ हजार २९० शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक क्लिक करा
उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार आहे.
FarmerNews:शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना आर्थिक मदत मिळण्यात अडचण येऊ शकते.