सोनाळा ( प्रतिनिधी )ग्रामपंचायत सोनाळा येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी होणारी ग्रामसभा दिनांक २० ऑगस्ट रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, निश्चित केलेल्या दिवशीही ग्रामसभा न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामसभा तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत सोनाळा येथील सरपंच यांना निवेदन देण्यात आले असून, 8 दिवसात ग्रामसभा घेण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसभा ही गावातील विकासकामे, विविध समस्या, शासकीय योजना तसेच ग्रामस्थांच्या मागण्यांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याने तिचे आयोजन वेळेत होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच ग्रामसभेची अधिकृत नोटीस, अजेंडा आणि आवश्यक पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. ग्रामसभा वारंवार रखडल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.
8 दिवसात ग्रामसभा घेण्यात आली नाही, तर ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात ‘ताल ठोक’ आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलन शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामसभा न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन तसेच पुढील तीव्र आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन 8 दिवसात ग्रामसभा आयोजित करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. प्रतिक्रिया :
सोनाळा ग्रामपंचायत अंतर्गत अद्याप १५ ऑगस्टची ग्रामसभा घेण्यात आलेली नाही.
ग्रामसभा ही गावातील विकासकामे व नागरिकांच्या प्रश्नांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामसेवक यांनी तत्काळ ग्रामसभा आयोजित करावी.ग्रामस्थांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Grampanchayatnews/ग्रामसभा तातडीने न घेतल्यास ग्रामस्थांच्या वतीने ‘कुलूप ठोको’ आंदोलन करण्यात येईल. सतीश व्ही. वानखडे, सामाजिक कार्यकर्ते, सोनाळा






