Home Blog Page 183

क्रांती दिनी मुस्लिम शाह फकीर समाज संघटना करणार रास्ता रोको

0

 

मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्याची मागणी

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा. राज्यातील मुस्लिम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात करण्यात यावा, या मागणी करिता मुस्लिम शाह फकीर समाज संघटना महाराष्ट्र च्या वतीने क्रांती दिन 9 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा स्तरीय रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे

या बाबतचे निवेदन आज गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, राज्यातील मुस्लीम शाह फकीर या जातीचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गामध्ये महाराष्ट्र शासनाने अग्रक्रमाने करावा,

या महत्वपुर्ण मागणी बाबत राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात आंदोलने करण्यात आली.
परंतू राज्यातील शासनाने त्याची अद्यापपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे राज्यात मुस्लीम शाह फकीर समाजामध्ये प्रचंड रोष आहे.
शासनाने या मागणीच्या संदर्भात संघटनेने वेळोवेळी दिलेले निवेदने व पुरावे याची दखल न घेतल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात क्रांती दिन दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी पासून जिल्हाव्यापी “रास्ता रोको, जेल भरो आंदोलन सुरु करण्यात येत आहे.

शासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनाच्या अंती करण्यात आली आहे.
यावेळी निवेदनावर संस्थापक अध्यक्ष के.जी.शाह, संस्थापक महासचिव जाकीर शाह, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लुकमान शाह,विदर्भ अध्यक्ष मुश्ताक शाह ,रहीम मकबुल शाह, तहेसिन शाह, मन्सुर शाह, अकील शाह, शाहीद शाह, एजाज शाह,

इब्राहिम शाह,अलिम शाह मोबिन शाह, इरफान शाह, हसन शाह, बशीर शाह, अबुबकर उर्फ अली शाह, सलमान शाह, कासम शाह, मोबीन शाह, सिकंदर शाह, सईद शाह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

0

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी सज्ज राहा : रविकांत तुपकर

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलढाणा, दि. ३ ( स्वाभिमानी शेतकरी संघटना व पक्षाची बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील व घाटाखालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक २ ऑगस्ट रोजी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर, बुलढाणा येथे पार पडली.

या बैठकीत विविध विषयांवर पदाधिकऱ्यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली. तर जिल्हा पातळीवरील पक्ष आणि संघटनेच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

रविकांत तुपकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी संघटना व पक्षीय पातळीवरील काही नियुक्त्या जिल्हा कार्यकारिणीच्या मान्यतेने करण्यात आल्या. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (घाटावरील) जिल्हाध्यक्ष पदी डॉ. ज्ञानेश्वर टाले (मेहकर) व पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी बबनराव चेके (दे.राजा) व विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी पवनकुमार देशमुख (बुलढाणा) यांची फेरनिवड करण्यात आली.

तर अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी शेख जुल्फेकार (दे.राजा) यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी अमोल राऊत (मलकापूर) यांची निवड करण्यात आली व युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अनंता मानकर (संग्रामपूर), अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी मासुम शहा (खामगाव) यांची फेरनिवड करण्यात आली.

तर पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी आनंदा आटोळे (खामगाव) यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पदी श्याम अवथळे (खामगाव) यांची निवड करण्यात आली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे रविकांत तुपकर यांनी अभिनंदन केले

तर उर्वरित सर्व नियुक्त्या येत्या आठवड्याभरात करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी जाहीर केले. आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता या नियुक्त्या करण्यात आल्याअसून सर्वांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे ताकदीने काम करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी चळवळ आणि संघटना मजबूत होण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकरीपुत्रांना या चळवळीत सहभागी करुन घ्यावे. शेतकऱ्यांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण २० वर्षांपासून लढा देत आहेत.

या संघर्षात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तोलामोलाची साथ दिली असून आजही छातीचा कोट करुन कार्यकर्ते सोबत आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन सेवानिवृत्तीझालेले कर्मचारी यांच्या शाल आणि फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव .ग्रामीण पोलीस स्टेशनचेसेवानिवृत्ती कार्यक्रम अधिकारी व अमलदार 01 ग्रेड पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भटकर 02 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव ठाकरे03 पोना विजय गवई या कार्यक्रमास माननीय पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर साहेब तसेच पोलीस अंमलदार सफो अजिज सौदागर, अरुण जाधव,पोहे का

धनराज माने, अरुण मेटांगे, संजय देशमुख, प्रवीण गवई उमेश आखरे पोलीस नाईक श्रीराम चौधरी, निलेश हिवाळे,भानुदास तायडे, प्रवीण इतवारे, रवी कुमार मावस्कर, मंगलसिंग सोळंके, श्रीकृष्ण मेहंगे पोलीस शिपाई योगेश जाधव, मुकेश पवार, निलेश तोमर,

लोकेशसिंग तोमर, निलेश सोळंके नाजुकराव धुमाळे महिला पोहेका नीता खुरपडे मपोका राधिका पंजाबी व लासुरा बुद्रुक तसेच लासुरा खुर्द येथील पोलीस पाटील हजर होते.

शहर पोलिस स्टेशन शेगांवचे ठाणेदार श्री सुनिलजी अंबुलकर यांचा पतंजलि परिवार व गो ग्रीन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सत्कार संपन्न

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव – श्री सुनिलजी अंबुलकर साहेब हे शेगांव शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारपदी रूजू झाल्याबद्दल पतंजलि योग परिवार बुलडाणा जिल्हा व गो ग्रीन फाऊंडेशन शेगांवच्या संयुक्त विद्यमाने भट्टड जिन, शेगांव येथे दि. 1 ऑगस्ट रोजी किशोरजी कुळकर्णी प्राचार्य चिन्मय विद्यालय, शेगांव यांच्या अध्यक्षतेखाली, प्रल्हादजी सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष महाराष्ट्र (पूर्व) यांच्या शुभहस्ते व रमेशचंद्रजी भट्टड उद्योजक व नित्ययोग वर्ग भट्टड जीनचे आधारवड, चतुर्भूजजी मिटकरी जिल्हाप्रभारी भारत स्वाभिमान बुलडाणा जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

विशेष उपस्थितीमध्ये ज्ञानेश्वरजी मिरगे, कमलाकर चव्हाण, पुरूषोत्तम पिसे, जिल्हाप्रभारी किसान सेवा समिती, दशरथ लोणकर जिल्हा प्रभारी, हरिदास सोळंके जिल्हाप्रभारी युवाभारत, विनायकराव भारंबे जिल्हा प्रभारी सोशल मिडीया, निळकंठराव साबळे कोषाध्यक्ष, बाबुराव रोकडे महामंत्री, सुनिताताई चांडक महिला जिल्हाप्रभारी, कल्पनाताई मसने महिला सरचिटणीस भाजपा, वर्षाताई सरप महिला तहसिल प्रभारी व गो ग्रीन मंडळ हे होते.

कार्यक्रमाची सुरूवात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. प्रकाशजी झामरे राज्यपुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या सुरेल आवाजातील स्वागत गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. सत्कारमुर्ती श्री सुनिलजी अंबुलकर साहेबांचा परिचय वृक्षमित्र विठ्ठलराव मिरगे सरांनी करून दिला.

अंबुलकर साहेबांचा सत्कार प्रल्हाद सुलताने प्रांत सहकोषाध्यक्ष महाराष्ट्र (पूर्व), किशोरजी कुळकर्णी, रमेशजी भट्टड, चतुर्भूज मिटकरी यांनी शाल, श्रीफळ देवून केला. बुलढाणा जिल्हा पतंजलि परिवाराच्या वतीने सर्व जिल्हा प्रभारी, महिला जिल्हा प्रभारी, महिला तालुका प्रभारी यांच्या वतीने तर गो ग्रीन फाऊंडेशनच्या टिमच्या वतीने शाल श्रीफळ देवून करण्यात आला.

प्रल्हाद सुलताने, ज्ञानेश्वरजी मिरगे, किशोरजी कुळकर्णी यांची समायोचित भाषण झालीत. सुनिलजी अंबुलकर साहेबांनी सत्काराला उत्तर देतांना पर्यावरण रक्षक गो ग्रीन, आरोग्य रक्षक पतंजलि व सामाजिक सुरक्षा रक्षक पोलिस खाते या त्रिवेणी संगमाचे कौतुक केले व भविष्यात असेच समजोपयोगी कार्य एकत्रितपणे करण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन हरिषजी चिंचोलकर सर यांनी केले. आभारप्रदर्शन दिपक सरप सर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजलि परिवारातील सदस्यांनी व गो ग्रीन फाऊंडेशनच्या टिमने अथक परिश्रम घेतले.

तळेगाव येथे सिंघम ठाणेदार संदीप धोबे रुजू कर्तुवाचाचे महामेरू अशी त्यांची ओळख

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

तळेगाव:-वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो.त्यामधील तळेगाव हा अनेक आव्हानांचा माहेरघर म्हणून सुपरिचित आहे.

त्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि तालुक्यातील शांतता,सुरक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी कतृत्वाचा महामेरू,प्रामाणिक व्यक्तीमत्वाचे धनी ज्यांची कार्यप्रणाली पाहून ठाणेदार म्हणून संदीप धोबे यांची तळेगाव श्यामजी पंत ठाण्यात यांची नियुक्ती करण्यात आली असून नव्याने जबाबदारी सांभाळून एक आठवडा झाला आहे.

आणि एका आठवड्यात त्यांनी आपल्या परिसराला वळण लावण्यासाठी सुरुवात केल्यामुळे सुरू असलेले अवैध गोरख धंद्यांना निच्छितच खिळ बसणार आहे. अवैध गोरख धंदे करणाऱ्यांचे सध्या धाबे दणाणले आहेत.

तालुक्यातील अवैध धंदे त्यामध्ये दारू,रेती,सट्टा मटका,जुगार,अवैद्य धाब्यावर कडक नजर असणार आहे.गावातील सर्व सामान्य माणसांसाठी मोठा आशेचा आणि सुखाचा किरण निर्माण होईल अशी आशा वर्तविली जात आहे.

पोलिस निरीक्षक हे न्याय आणि सुव्यवस्थेचा केंद्र बिंदू असल्याने धोबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कामे सुरळीत चालतील यात शंका नाही.

एकंदरीत सर्वसामान्य नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगणघाट काँग्रेस कमिटी तर्फे भिडेच्या विधानाचा निषेध

0

 

प्रमोद जुमडे हिंगणघाट/वर्धा

आज दि. ३१ जुलै २०२३ ला हिंगणघाट शहर काँग्रेस कमिटी तर्फे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदविण्यात आला.

संभाजी भिडे हा नेहमी थोर महापुरुष यांच्यक्बाबत आक्षेपार्ह विधान करून प्रकाश झोतात राहतो, स्वतंत्र लढ्यात मोलाची कामगिरी बजावलेले महान विभूतीबाबत संभाजी भिडे यांनी केलेले विधान म्हमजे स्वातंत्र्य करिता प्राणाची आहुती दिलेल्या समस्त थोर पुरुषांचा अपमान आहे.

त्यामुळे संभाजी भिडे यांचेवर त्वरित कार्यवाही करून त्यांना अटक करावी व त्यांचेवर खटला चालविण्यात यावा अशी मागणी काँग्रेस तर्फे मा मुख्यमंत्री यांना मा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून करण्यांत आली.

याप्रसंगी पंढरीभाऊ कापसे, शहर अध्यक्ष हिंगणघाट काँग्रेस, ज्वलत मून, सचिव प्रदेश काँग्रेस कमिटी, अ. जा. विभाग, नरेंद चाफले, जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया विभाग वर्धा जिल्हा, रागिणी शेंडे, उपाध्यक्ष, महिला काँग्रेस, वर्धा जिल्हा, गुणवंत कारवाटकर, सुनील हरबुडे, सुरेंद्र बोरकर, प्रमोद जुमडे, प्रशांत राऊत, संजय कांबळे, इकबाल पहेलवान, हुमायू बेग, रमेश ढाले, मंदाकिनी ढाले, सुनीता चंदनखेडे, सुनीता भोयर, इत्यादी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूरग्रस्तांना एक हात मदतीचा….सीदी रेल्वे येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरग्रस्त घरांची प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी केली पाहणी……

0

 

शेकडो पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप….

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतूल वांदिले’ यांच्या सामाजिक उपक्रम…….!

हिंगणघाट :- सिंदी रेल्वे येथे अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागात पाहणी करुन गरजू कुटूंबाना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली मदत.
सिंदी रेल्वे येथे निसर्गाच्या प्रकोपाने अनेक प्रभागात अतिवृष्टी झाली असून अनेक घरामध्ये पाणी शिरले.

अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतमजूर, कामगार हतबल झाला असून सातत्याने निसर्गाचा प्रकोप वाढत असल्याने त्यांची दैयनीय अवस्था झाली आहे. शहरात व ग्रामीण भागात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.अनेकांचा घरा मध्ये पाणी शिरले होते. त्यांची पाहणी करून गरजू कुटूंबाना मदत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली

सिंदी रेल्वे भागातील अतिवृष्टीमुळे अनेक लोकांचा घरामध्ये प्रमाणात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत च्या पावसाने क्षतीग्रस्त झाल्याच्या घटना देखील झाल्या आहे. सोबतच पाळीव जनावराची सुद्धा जीवितहानी झालेली आहे. शेतकरी व नागरिक संकटात सापडला आहे अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी एक हात मदतीचा म्हणून पूरग्रस्त कुटूंबाची पाहणी करून त्यांना मदत केली.

पूरग्रस्त भागाची पाहणी करून शेकडो पूरग्रस्तांना धान्य किट वाटप करताना माजी नगराध्यक्ष तथा माजी सभापती कृ.उ.बा.स.बबनरावजी हिंगनेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी उपाध्यक्ष न.प.सुधाकरराव खेडकर, प्राचार्य तथा माजी उपाध्यक्ष अशोकजी कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अशोकबाबू कलोडे, अमोल बोरकर, वसंताजी सिर्से, गजाननराव डबारे, प्रकाश सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर,माजी नगरसेवक सुमनबाई पाटील,अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू खान,अशोकबाबू कलोडे, गुड्डू कुरेशी, गजानन खंडाळे, सुनील शेंडे, अशोक सातपुते, रवी राणा, युगल अवचट, मनोहर चंदनखडे, सुनील भुते, पप्पू आष्टीकर, पुरुषोत्तम कांबळे, गजू महाकाळकर, अमोल मुडे, सुशील घोडे यांच्यासह सिंदी रेल्वे भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

नांदुरा पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना केलं जेरबंद 19 दुचाकी जप्त

0

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक अनिल बेहेरानी यांना मिळालेल्या खबरेप्रमाणे अधिनस्त अंमलदारांचे पथक तयार करुन सदर पथकाने वरीष्टांचे सूचनाप्रमाणे दिनांक २८/०७/२०२३ रोजी पो स्टे नांदुरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना दुचाकी चोरीच्या आरोपाखाली संशयित आरोपी शिवाजी एकनाथ वक्टे, अभिषेक ऊर्फ ज्ञानेश्वर गोविंद बक्टे महादेव सतिश वक्टे सर्व रा. वडळी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली

यावेळी आरोपींच्या ताब्यातूनविविध कंपनी च्या विनाक्रमांक एकुण १९ मोटर सायकल किंमती ४,६५००० रुपयाच्या मिळून आल्याने व आरोपींतानी मोटारसायकल चे मालकी हक्काबाबत कोणतेच कागदपत्र सादर न केल्याने सदर मोटारसायकल ताब्यात घेवुन आरोपींता विरूध्द कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सदर मोटर सायकल हया आरोपीतांनी कोठुन आणल्या व त्या कोणत्याही प्रकारचे मालकी हक्काचे कागदपत्र जवळ नसतांना सुध्दा ताब्यात ठेवल्या याबाबत तपास करुन पुढील योग्य तो कायदेशिर कार्यवाही करणे सुरु आहे.

सदर कार्यवाही मा पोलीस अधिक्षक श्री सुनिलजी कडासने साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोकजी थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गवळी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोनि अनिल बेहेरानी यांचे सुचना व खबरे प्रमाणे सपोनि चंद्रकांत पाटील, पोहेकॉ मिलींद जवंजाळ, पोना पंकज डाबेराव,राहुल ससाने,संदीप डाबेराव, शैलेश बाहादुरकर, पोकों कैलास सुरडकर, विनायक मानकर, रविंद्र सावळे, रविंद्र झगरे यांनी केली आहे.

तरी सर्व नागरीकांना ठाणेदार अनिलजी बेहेरानी यांचे व्दारे जाहीर आवाहन करण्यात येते की, आपली मोटारसायकल चोरी गेली असल्यास किंवा गहाळ झाली असल्यास पो स्टे नांदुरा येथे आपले मो सा चे कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर येवुन किंवा संपर्क साधुन मिळुन आलेल्या मो सा पैकों आपली मोसा कोणती आहे याबाबत खात्री करावी. व कायदेशीर बाबींची पुर्तता करून मोटर सायकल घेवून जावे. असे आवाहन पोलीस करण्यात आले आहे

पो.स्टे नांदुरा अपराध क्रमांक 443/2023 कलम 124 महाराष्ट्र पोलीस कायदा मधील जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकल वर्णन एक काळया रंगाची लाल पांढरे स्टिकर असलेली विना क्रमांकाची हिरो फॅशन प्रो एक काळया रंगाची विना क्रमांकाची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस एक काळया रंगाची निळया व जाभंळया रंगाचे स्टिकर असलेली विना क्रमांकाची हिरो एच एफ डिलक्स एक काळया रंगाची ब्लु सिल्व्हर स्टिकर असलेली

विना क्रमांकाची स्लेंडर प्लस एक काळया रंगाची बिना क्रमांकाची हिरो स्प्लेंडर एक काळया रंगाची बिना क्रमांकाची स्लेंडर प्लस एक काळया रंगाची बिना क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर एक काळया रंगाची लाल व पांढरे स्टिकर असलेली बिना क्रमांकाची हिरो होंडा शाईन sp एक काळया रंगाची बिना क्रमांकाची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो काळया रंगाची लाल स्टिकर असलेली विना क्रमांकाची होंडा ड्रिम युगा एक पांढ-या रंगाची टिव्हीएस कंपनीची अपाचे
क्रमांक एम एच 12 एन जी 3485

गोळेगाव बुद्रुक ग्रामवासियाकडून पूरग्रस्तांना अन्नधान्याच्या किट चे वाटप

0

 

अर्जुन कराळे शेगाव

शेगाव तालुक्या अंतर्गत असलेल्या ग्राम गोळेगाव बुद्रुक येथील ग्रामपंचायत तसेच गावकरी यांनी मानवतेसाठी सर्वधर्मसमभाव व एकतेची भावना सहानुभूती दाखवत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य व गावकरी यांनी गावातून लोक वर्गणी करून संग्रामपूर जळगाव जामोद तालुक्यात झालेला

अतिवृष्टीमुळे अनेकांचे घरी उध्वस्त झाली त्यांचे खाण्यापिण्याचे सामान अन्नधान्य सर्व पुरामध्ये वाहून गेले अशा नागरिकांना आसलगाव येथे अन्नधान्याचे किट वाटप करून मानवतेचा एक आदर्श निर्माण केला आहे

यावेळी उपस्थित सरपंच रघुनाथ मापारी उपसरपंच पती शांताराम गावंडे सदस्य पती निलेश गावंडे, सदस्य देवचंद्र समदुर गावातील नागरिक धम्मपाल समुद्र सचिन गावंडे अनिल समदूर ग्रामपंचायत परिचारक उमेश नांदोकार आदींनी परिश्रम घेऊन जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव या ठिकाणी पूरग्रस्त पीडितांना ने अन्नधान्याचे मदत वाटप केला

यावेळी योगायोगाने त्या ठिकाणी जिल्हाधिकारी तूमोड साहेब व जळगाव जामोद च्या तहसीलदार मॅडम उपस्थित असल्याने त्यांनी सुद्धा गोळेगाव वासियांचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते सुद्धा किट वाटप करण्यात आले खरोखरच तेथील पूर पीडित नागरिकांचे अवस्था पाहून डोळ्यात पाणी आले

आणि खरोखरच अशा लोकांना मदत करणे हे जीवनातील खूप मोठे पुण्याचे काम असल्याचे त्या ठिकाणी जाणीव झाली आणि कीट वाटप झाल्यानंतर खूप मोठे समाधान मिळाल्याचे गोळेगाव बुद्रुक वासियांनी सांगितले.

यावेळी उल्हास माहोदे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आसलगाव तसेच गावचे सरपंच, सदस्य ईश्वर वानखडे व काही गावकऱ्यांनी यावेळी हीट वाटप करताना मुलाचे सहकार्य केले

रोही प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान अंबाशी, काटोडा, खैरव, गांगलगाव येथील शेतकरी त्रस्त

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

: चिखली तालुक्यातील अंबाशीसह परिसरातील खैरव, काटोडा, गांगलगाव इत्यादी गावांमध्ये रोही, हरीण, माकडे आदी वन्य प्राण्यांनी अक्षरशा: धुमाकूळ घालत असून पिकांची नासाडी करीत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून दिवसेंदिवस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. रोही, हरीण यांचा कळप एकाच वेळी शेतात घुसून पीक मोठ्या प्रमाणात उध्वस्त करतात. अगोदरच पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या.

त्यातच शेतमालाचे पडलेले भाव, विमा कंपनीकडून पिक विमा अनुदानाची अनियमितता, यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी एक महिना उशिरा पेरणी केली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मशागत केल्यामुळे पिके बहरत आहेत.

त्यातच जमिनीच्या बाहेर आलेली कोवळी पिके रोही, माकडांनी फस्त करणे सुरू केले आहे. त्यामुळे दिवस-रात्र पिकांची राखण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

याबाबत वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत