Home Blog

board exam result / सहकार विद्या मंदिर बीबी शाळेची 100% निकालाची परंपरा कायम

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

board exam result:एसएससी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला असून ही परीक्षा म्हणजेच शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा पार करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ आहे.

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा 95.62% लागला असून निकालाच्या बाबतीत जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे लोणार तालुक्यातील येणारे गाव बीबी येथील सहकार विद्या मंदिर वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे मार्गदर्शन.सततचा सराव व परिश्रमाच्या जोरावर मागील काही वर्षापासून ची परंपरा कायम ठेवत याही वर्षी शंभर टक्के निकाल ठेवून जिल्हाभरात नाव चमकवले आहे.

 

शैक्षणिक सत्र 2024 25 मध्ये 109 विद्यार्थी परीक्षेला बसले होते 90% च्या वरती 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे त्यामध्ये तनुश्री हजबे,राज खंदारे यांनी 96% गुण मिळवून संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला आहे द्वितीय क्रमांक सुवर्णा सोळंके 95.20% व तृतीय क्रमांक आकांक्षा देशमुख 94.20% घेऊन प्राविण्य मिळवले आहे.

board exam result:सहकार विद्या मंदिर बीबी शाळेचे यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे सहकार विद्या मंदिर बीबी शाळेची यश म्हणजे विद्यार्थ्यांची चिकाटी कर्मचारी वर्गाची मेहनत पालकांचा शाळेवरती असलेला विश्वास या त्रिसूत्रीचे फलित असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे उपमुख्याध्यापक आर जी राठोड सर यांनी मत व्यक्त केले आहे

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

0

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

वाळू माफियाला थांबवण्याचा प्रयत्न, तहसीलदारांवर शिवीगाळ व धमकी

महाराष्ट्रातील संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने नदी पात्रात धाव घेतली. त्यांना एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला,

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

पण त्या ठिकाणी तीन ईसम संशयास्पद रित्या वाळुच्या ढिगाऱ्या आढळून आल्या. त्यांपैकी दोघांनी नाव सागर उमाळे व नामदेव थारकर हे पहुरपुर्णा येथील निवासी असल्याचे सांगितले, तर तिसऱ्याने नाव लपवले.

या घटनेत, सागर उमाळे याने अश्लील शिवीगाळ करून नदी काय तुमच्या बापाची आहे काय? असे सांगितले, तर नामदेव थारकर याने दम असेल तर १० मिनिट येथेच थांबा, तुम्हाला विना नंबरच्या वाहनांनी चिरडतो.

आणि खोटे विनयभंगाचे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो असी धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही दोनचाकी गाडीवर निघून गेले.

revenue:या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या हळवी चंद्रकिरणांतर्गत प्राण्यांची वार्षिक गणना पार पडली.

या निसर्ग अनुभव कार्यक्रमात १२ मे दुपारी २ वाजल्यापासून १३ मे सकाळी ९ वाजेपर्यंत २७ मचानांवर वन्यप्राण्यांची निरीक्षणे करण्यात आली. या काळात दोन वाघांसह एकूण ४६१ वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन झाले,

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

ज्यात बिबट्या, अस्वळ, निलगाय, सांबर, भेडकी, गवा, रानडुक्कर, लंगूर, माकड, रानकोंबडी, मोर, आणि इतर प्राणी होते.

अंबाबरवा अभयारण्य हा सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेजवळ १५,८३९.७५ हेक्टर क्षेत्रफळाचा निसर्ग वैभवाचा ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या अभयारण्यात वन्यजीवांची निरंतर गणना आणि संरक्षणावर भर दिला जातो.

या कार्यक्रमात निसर्गप्रेमी आणि वन्यकर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेचा जास्त अचूक अंदाज मिळाला.

वरील प्राणी गणनेमध्ये २ वाघ, ३ बिबट, ७ अस्वळ, २८ निलगाय, ३९ सांबर, १० भेडकी, ३१ गवा, २४ रान डुक्कर, ३० लंगूर, १६३ माकड, १४ मसान्यादेखील, ३० रानकोंबडी, १० रान मांजर, ५५ मोर, ३ ससा, २ चांदी अस्वल, ५ मुंगुस, ४ सायळ आणि १ साप अशा एकूण ४६१ प्राणी नोंदविण्यात आले आहेत.

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

अंबाबरवा अभयारण्यातील ही प्राणी गणना स्थलांतरित प्राणी संरक्षणासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाची आहे.

ambabarwa buldhana:वन्यजीव विभागाच्या कार्यान्वयनाखाली या प्रकारच्या गणना नियमितपणे होतात, ज्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांची स्थिती जाणून घेता येते आणि संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करता येतात

Hingnghat / ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेत 100% निकाल.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- एस.एस.सी बोर्ड मार्च 2025 ला घेण्यात आलेला परीक्षेचा निकाल आज दिनांक14/04/2025 मंगळवार रोजी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल देऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

एकूण 19 विद्यार्थ्यांनी 90% च्या वर गुण प्राप्त केले असून 75% च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 54 आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीतील गुण प्राप्त केले आहे. कुमारी यशोदा राजुरकर या विद्यार्थ्याने 95.60% टक्के गुण प्राप्त करून शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

वाढदिवसाला अंगणातच कुटुंब कार्यकर्ता सह अन्नत्याग; रविकांत तुपकरांचा नवीन संकल्प चर्चेत ( Ravikanttupkar )

तसेच1) यशोदा राजुरकर 95.60 2) देवयानी धोंगडे 94.40% 3) प्रज्ञा महाकाळकर 93.00
4) मंथन खउट 93.00 5) रोशन हुलके 92.60 6)पलक जामुनकर 92.40
7)गायत्री चंदनखेडे 92.40 8) अदिती चामचोर 92.40 9) हर्षल टिपले 92.00
10) वेदांत ब्राह्मणकर 91.60 11)वेदांत कावळे 91.40 12)संस्कृती खोडणकर 91.40
13) विष्णू सातारकर 90.80 14) नील गाखरे 90.80 15) इशा बाकडे 90.60
16) कल्याणी राऊत 90.20 17) क्षितिज तळवटकर 90.20 18) प्रणव किन्हेकर 90.00
19) समीक्षा महाकाळकर 90.00 20) पूर्वज धोटे 89.69 21) वेदांत सोनटक्के,89.40
22) आदित्य गवळी 89.40 23) हर्षल लडी 89.40.

Hingnghat:रोशन हुलके या विद्यार्थ्याने गणित या विषयांमध्ये 100 गुण प्राप्त केले असून यशोदा राजूरकर आणि गायत्री चंदनखेडे या विद्यार्थिनींनी गणित या विषयात 99 गुण प्राप्त केले. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना शाळेने दत्तक घेतले होते. तसेच कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत शिकवणी नसताना सुद्धा 90% च्या वर गुण प्राप्त केले.

ही खास उल्लेखनीय बाब. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय गिरधर राठी( संस्थापक व सचिव हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था हिंगणघाट) अर्पणा रशेश राठी( अध्यक्षा ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) रशेश राठी( सहसचिव हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट) प्रवीण धोबे( कोषाध्यक्ष) अभिनव जयस्वाल( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) नितीन ढबाले( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन वाघोली) शिल्पा पंकज जयस्वाल ( उप- मुख्याध्यापिका ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) यांना दिले. तसेच आपल्या सर्व विषय शिक्षक तसेच पालक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Hingnghat :सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन ची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

वाढदिवसाला अंगणातच कुटुंब कार्यकर्ता सह अन्नत्याग; रविकांत तुपकरांचा नवीन संकल्प चर्चेत ( Ravikanttupkar )

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

स्वाभिमानी शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तूपकर

Ravikanttupkar:तुपकर यांचा आज १३ मे रोजी जन्मदिवस आहे. आपला जन्मदिन साजरा न करता, शेतकरी व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. बुलढाणा येथील चिखली रोड मार्गावरील निवासस्थाना समोर हे उपोषण सुरू आहे.

Brekingnews/चोर पांगरा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू

सकाळपासूनच रविकांत तुपकर यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी तुपकर यांच्या निवासस्थानी जमले आहेत. शहीद भगतसिंग व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.Ravikanttupkar

दरम्यान, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी, शेतकऱ्यांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले, आज दिवसाला दहा शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहेत.

सोयाबीन कापसाला भाव व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे, यावर राज्य सरकार लक्ष देत नसल्याने नेहमीप्रमाणे आपण शासन दरबारी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहोत.

Ravikanttupkar :शेतकरी संकटात असताना जन्मदिवस साजरा करणे हे उचित वाटले नाही, या कारणाने एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Brekingnews/चोर पांगरा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Brekingnews:लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील महिला शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला ही घटना दिनांक 12 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर होत

असे की चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील महिला रंजना संदीप चव्हाण वय 35 वर्षे व पती व दोन मुले हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अवकाळी

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

पाणी वाऱ्यासह विजाच्या खरखड्यात या महिलेवर विज पडल्याने महिला जागीच मृत्यू पडली सुदैवाने पती व दोन मुले काम करत असताना ते वाचले

Brekingnews :ही घटना कळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तिला ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले पुढील तपास बिबि पोलिसटेशन करत आहे

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

0

 

Ladkibahinyojna:मुंबई – महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करत आहे. आता या योजनेतील लाभार्थी महिलांना अधिक स्वावलंबी करण्यासाठी बँकांमार्फत 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा प्रस्ताव सरकारकडे आहे.Ajitpawar

या कर्जाचा हप्ता लाडकी बहिण योजनेतील महिना देयकातून भरला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली आहे.Ajitpawar

Fire News / जळगाव जामोद: राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग; दुकान खाक

लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण उद्योजकता वाढवण्यासाठी आणि भांडवलाचा तुटवडा भागवण्यासाठी या योजनेतून आता कर्ज देण्याचा विचार सुरू आहे.

अजित पवार म्हणाले की, जर बहिणींना 40-50 हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध झाले, तर त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकतील आणि कुटुंब आर्थिकदृष्ट्या सबळ होईल.

शासनाने ही योजना सुरू केली असून त्यासाठी 45 हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

योजनेला विरोधकांच्या अफवा असूनही तो चालूच राहणार असल्याची खात्री पवार यांनी दिली. याशिवाय, शेतकऱ्यांसाठी कृषी पंपावरील वीज बिल शासन भरण्याचा उपक्रमही सुरू असून त्यासाठी महिना 20 हजार कोटी रुपये खर्च होतो.

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

यामुळे दिवसा सुद्धा शेतकऱ्यांना वीज पुरवठा होईल असा सोलार पॅनेल लावण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ladkibahinyojna :याप्रकारे महाराष्ट्र सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंब्यासाठी लाडकी बहिण योजनेतून नव्या मार्गाने कर्ज देऊन व्यवसायाची संधी वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Fire News / जळगाव जामोद: राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग; दुकान खाक

0

 

Fire News:जळगाव जामोदमध्ये 12 मे रोजी पहाटे पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील राधे कोल्ड्रिंक्स दुकानावर भीषण आग लागली.

या आगीमुळे लाखोंची नासाडी झाली आणि संपूर्ण दुकान जळून खाक झाले.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

पोलीस स्टेशनला लागूनच असलेल्या या प्रतिष्ठानात आग लागल्याने पोलीस तात्काळ धावून आले आणि अग्निशमन दलाला कळवण्यात आले. मात्र, टँकरमध्ये पाणी कमी असल्यामुळे आगीतला वेळ लागला.

Fire News / जळगाव जामोद: राधे कोल्ड्रिंक्स दुकानात भीषण आग; दुकान खाक

त्यानंतर शेगाव येथील अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली आणि सात वाजता आग विझवण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. आगीदरम्यान दोन-तीन वेळा स्फोटही झाले,

Fire News:मात्र पहाटेची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळ नसल्याने आगी इतरत्र पसरली नाही.

Drbabasahebambedkar / श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे वाढदिवसानिमित्त आर.ओ. फिल्टरचे उदघाटन

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Drbabasahebambedkar:दि 10 मे रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजन हृदयसम्राट आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमान दिवस म्हणून दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा होत असतो.

परंतु या वर्षी भारत देशात झालेल्या पहलगाम हल्यामुळे स्वतःहा आदरणीय बाळासाहेब यांनी सांगितल्या प्रमाणे यावर्षी वाढदिवसानिमित्त कोणताही बडेजाव न करता सर्व कार्यकर्त्यांनी पहलगाम येथील दहशतवादी हमल्यात शहीद झालेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त कराव्या व समाजातील गोर गरिबांची सेवा होईल असे उपक्रम राबवावे, त्या प्रमाणे ग्राम नायदेवी ता.खामगांव येथील सरपंच श्रीमती वत्सलाबाई तायडे यांचे पुढाकाराने गावातील सर्व जाती धर्मातील गावकऱ्यांसाठी आर.ओ. फिल्टर बसविण्यात आले जेणे करून सर्व गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळेल.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

कार्यक्रमाच्या सुरवातीला पहलगाम येथील शाहिद झालेल्या भारतीय नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजरत्न तथा वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशचे साहेबराव तायडे व बुलढाणा जिल्हा नेते समाजभूषण प्रशांत वाघोदे, नागवंशी संघपाल पनाड मेहकर-लोणार विधानसभा नेते यांची होती.

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष मोहितराजे दामोदर, बुलडाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे, चिखली शहर अध्यक्ष बाळासाहेब भिसे, ता.अध्यक्ष संजय धुरंधर, महिला आघाडी मा.जिल्हा उपाध्यक्ष वर्षाताई इंगळे, अख्तर भाई, आमीर भाई सुलतानपूर, राज इंगळे, वकीलभाई, जिल्हा उपाध्यक्ष तथा नायदेवी उप सरपंच अरविंद खंडारे, भिमराव अवसरमोल, सागर तायडे महसुल विभाग, समर्पन ईंगळे,

सुनील खरात पोलिस पाटील, विद्यानंद कस्तुरे, संजय बगाडे माळीमहासंघ सत्यशोधक समिती सचिव, अतुल तायडे, विश्वदीप तायडे, प्रविण तायडे, विष्णू घनमोडे, दीपक धुरंधर, तंटामुक्त अध्यक्ष मानसिंग भाऊ सोळंके, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष तेजरावभाऊ तायडे हरिभाउ तायडे, सुर्यप्रकश तायडे, जिवन तायडे, सुमित पवार, निर्मलाबाई वाकोडे, देवानंद वाकोडे, सुनिल सोळंके, शिवा डाबेराव, भिमराव बोरकर,

काळेसर खामगाव, गायकी सर खामगाव, अणिल तायडे, दीनकर वानखेडे, अमर तायडे, गौतम सरदार, पंकज तायडे, प्रशिक मिसाळ, गवई परिवार, कडुबा तायडे, विनोद सावदेकर शेगाव जवळा, भगवान कोल्हे, पवन कोल्हे, संजु तोंडे, प्रल्हाद पाटेखेडे परिवार,अमोल डाबेराव, गुलाब देशमुख, साहेबराव

Drbabasahebambedkar:दौलत तायडे, साहेबराव बोरकर, संतोष तायडे, धम्माल तायडे, प्रविण प्रल्हाद तायडे, निरंजन खंडारे, प्रशांत तायडे, अमोल भा तायडे, मिलींद तायडे, आकाश तायडे, आमोल गौतम तायडे, ज्ञानू तायडे, प्रदीप हीवराळे, शैलेस राजेश तायडे, प्रमेश्वर वाकोडे, गणेश इंगळे इ तसेच गावातील महिला मंडळ व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

0

 

courtnews:(दि. ९ मे २०२५) माऊली फाटा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवणाऱ्या टिप्पर चालक सागर फुंडकर याच्या बेजबाबदारपणामुळे दोन निरागस बालकांचा मृत्यू झाला, तर दोन प्रौढ गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे, एवढ्या गंभीर प्रकरणातही आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असून त्यामुळे समाजातील विविध स्तरांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

RapeNews /  डॉ.गोयनका यांच्या विश्वत्रिवेणी टेक्सटाइलमध्ये किशोरवयीन मुलीवर बलात्कार..

प्रकाश महादेव खेडकर (वय 60) व साधना प्रकाश खेडकर (वय 55, रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) हे मोटारसायकल वरून प्रवास करत असताना त्यांच्यासोबत पार्थ अक्षय चोपडे (वय 6, रा. राजापेठ, अमरावती) व युवराज मोहन भागवत (वय 5, रा. जुनी वस्ती, बडनेरा, अमरावती) ही दोन बालके होती. अपघातात दोन्ही बालकांचा जागीच मृत्यू झाला.

सागर फुंडकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र न्यायालयाने त्याला जामीन दिला आहे. या निर्णयामुळे मृतक बालकांचे नातेवाईक संतप्त झाले असून, त्यांनी आज जळगाव येथे जाऊन काही वकिलांची भेट घेतल्याची माहिती ‘दैनिक देशोन्नती’च्या जळगाव जामोद प्रतिनिधीस मिळाली आहे. त्यांनी कोर्टाच्या निर्णयाविरोधात कायदेशीर पर्यायांचा विचार करण्यास सुरुवात केली आहे.

courtnews / दोन बालकांचा मृत्यू – आरोपी सागर फुंडकर याला जामीन दिल्याने समाजातील विविध स्तरांत नाराजी

courtnews:दरम्यान, या प्रकरणातील तपास अधिकारी शेंडगे मॅडम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन सतत नॉट रिचेबल येत आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या संदेशांनाही त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. पत्रकारांना माहिती न मिळाल्याने अधिकच संभ्रम व नाराजी निर्माण झाली आहे