Home Blog

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक, भरपावसात राष्ट्रीय महामार्गावर दोन तास रस्ता रोको आंदोलन.(sharadpawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नांदगाव चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला चार वर्षात दुसऱ्यांदा मोठा भगदाड पडलेले आहे. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा भगदाड अपघातास निमंत्रण देतो आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग भगदाड प्रकरणात समिति नेमून चौकशी करीत संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर तातडीने कारवाई करा याप्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात नांदगाव चौक येथिल उडानपुलावर भरपावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)

कृषी उत्पन्न बाजार समिती ते सेंट जॉन कॉन्व्हेंट पर्यंत उड्डाणपूल मागील चार वर्षापूर्वी निर्माण करून वाहतुकीसाठी सुरू केला. मात्र, त्यानंतर अनेकदा बंद करून वाहतूक वेगळ्या रस्त्याने वळवण्यात आली. अनेकदा पुलाची डागडुजी ही करण्यात आली. त्या खड्यात पडून तिथे जर अपघात झाले, त्याचे जबाबदार कोण राहणार, आम्ही जबाबदार कोणाला ठरवायचे ?

याबाबत आम्हाला ठोस आश्वासन देण्यात यावे. या आधी सुद्धा महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. याकडे आपल्या राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यानी दुर्लक्ष केले. दुर्लक्ष केल्यामुळे आता आणखी हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर नांदगाव चौक येथील उडानपुलावर दुसऱ्यांदा भगदाड पडले आहे. आज अनेक नागरिक अपघात होता होता वाचले. जर तिथे कोणत्याही नागरिकांचा अपघात झाला असता तर त्यांचे जबाबदार कोण राहले असते?

त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भगदाडाची तात्काळ दुरुस्ती करावी व तातडीन या प्रकरणात समिती नेमन संबधीत अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नांदगाव चौक येथील उडानपुलावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात भरपावसात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ आंदोलन स्थळी उपस्थित झाले.

महामार्ग अधिकाऱ्यांनी पुलाचे पूर्ण ऑडिट केले जाईल व संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले..
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहर निरीक्षक महेश झोटिंग पाटील, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, शहर अध्यक्ष बालू वानखेडे, मो.रफिक, समाजसेवक सुनील डोंगरे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी नगरसेवक दिनेश देशकरी, अमोल बोरकर, जिल्हा महासचिव मिलिंद कोपुलवार, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,विजय तामगाडगे, श्रीकांत भगत, सुनील भुते, सिमा तिवारी, सुजाता जांभुळकर, मीना सोनटक्के, दिपाली रंगारी, आचल वकील,नितीन भुते, प्रवीण कलोडे,हेमंत घोडे, जितेंद्र रघाटाटे,नाना पुंड, जगदीश वांदिले,सुनिल घोडखांदे,मनोज मुरार, संजय गांभुळे, पप्पू आष्टीकर,समीर बाळसराफ,अन्सार शेख, विपुल थुल,सुशील घोडे,राहुल जाधव, राजू मुडे,प्रशांत मेश्राम,अमर धनविज,अमित रंगारी,अभिजित साबळे,नईम शेख,विपुल वाढई,छोटू वानखेडे,रवी बोरकर,मंगेश सातघरे, हुकेश ढोकपांडे,मयूर तपासे, राहुल बोरकर,मनीष मुडे, वैभव भुते,आदित्य तडस,सौरभ घोडखांदे आदी उपस्थित होते.

गांजा अंमली पदार्थाची विक्री करीता वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.(crimenews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :– 01/07/2025 रोजी स्था.गु.शा. वर्धा येथील पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीवरून मौजा रिमडोह शिवार, जामकडुन हिंगणघाट कडे येणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वरील हॉटेल संस्कार जवळील मोठा मारोती मंदिर देवस्थान समोर सापळा रचुन एन.डि.पी.एस. ॲक्ट अंतर्गत कार्यवाही केली असता.

आरोपी 1) अंकित भाविक वावरे, वय 19 वर्ष, रा. फुकटा, आजनसरा, जि. वर्धा, ह.मु. शहालंगडी रोड संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, जि. वर्धा, 2) खेमेश भेरूदास भुते, वय 21 वर्ष, रा. टेलंग पेट्रोलपंप मागे, संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट, हे मोक्कावर रंगेहाथ गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करतांना मिळुन आले असुन, आरोपी अंकित वावरे याचे पाठीवर असलेल्या एका स्कुल बॅगमध्ये गांजा अंमली पदार्थ मिळुन आला.

Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

सदर गांजा अंमली पदार्थ आरोपीतांनी 3) फैजान नावाचा ईसम रा. मोमीनपुरा नागपुर याचेपासुन खरेदी केल्याचे सांगितल्याने, जागीच जप्ती पंचनामा कार्यवाही करून, ताब्यातील दोन्ही आरोपीतांचे ताब्यातुन 1) निव्वळ गांजा अंमली पदार्थ 1.037 किलोग्रॅम कि. 20,740 रू 2) एक मोरपंखी निळ्या रंगाची टि.व्ही.एस. ज्युपीटर मोपेड क्रमांक एम.एच. 49 बी.एन. 6498 कि 1,00,000 रू 3) एक सॅमसंग कंपनीचा ॲन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू 4) एक रिअरमी कंपनीचा ॲॅंन्ड्रॉईड मोबाईल कि. 15,000 रू, 5) एक स्कुल बॅग कि. 250 रू, असा जु.कि. 1,50,990 रू चा मुद्देमाल जप्त करून, तिन्ही आरोपीतांविरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे कलम 8(क), 20(ब) ii(ब), 29 एन.डी.पि.एस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन, जप्त मुद्देमाल व दोन आरोपीतांना पो.स्टे. हिंगणघाट यांचे स्वाधीन करण्यात आले आहेत.

crimenews/सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. अतुल थुल(पो.स्टे. हिंगणघाट), पो.उपनि. प्रकाश लसुंते, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, दिनेश बोथकर, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे स.फौ. अनिल साटोणे, अजित धांदरे, पो.हवा. मंगेश धामंदे यांनी केली.

मनसे कडून नांदगाव पुलावर पडलेल्या भोगदाडला श्रदांजली अर्पण करून निषेध (brekingnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

brekingnews/30/6/25 रोजी तब्ब्ल तिसऱ्यांदा नांदगाव चौरस्त्यावरील पुलाला बघदाळ पडलेले आहे आणि 3 ते 4 फुटाचे आर पार छिद्र झालेले आहे.

Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

यात मोठा भ्रष्टाचार झाला असून नेहमी प्रमाणे लिपा पोथी चे काम पुन्हा पुन्हा होऊन होणाऱ्या मोठ्या अनर्थला टाळण्याकरिता मनसेने श्रद्धांजली वाहत निषेध केला व मनसे शहर अध्यक्ष केतन ता्यवाडे यांनी सांगितले.

brekingnews/कि एकदाची या पुलाची नवीन बांधणी करून उच्च दर्जाचा पूल बांधण्यात यावा व जुन्या ठेकेदारावर कारवाही करावी

Uddhavthakre /शिवसेना (उबाठा गट कडून धरणे व निषेध आंदोलन

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Uddhavthakre/२९ जून २०२५ रोज रविवारला शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख *मा. माजी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्रात शाळेतील इयत्ता पहिलीपासून हिंन्दीसक्ती बाबत च्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्याचे आदेश देण्यात आले.

त्याप्रमाणे पश्चिम विदर्भ संपर्क नेते खा. अरविंद सावंत तसेच वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख रमेश जाधव यांनी जिल्ह्यात धरणे आंदोलन करण्याच्या सूचना केल्या.

यावल येथील अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे.चुंचाळे या महिलेचे निधन संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त(Yavalnews)

फडणवीस सरकारच्या विरोधात वर्धा येथील हिंदू सूर्य श्रीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे यांच्या नेतृत्वाखाली,तसेच भारती कोटंबकर, उपजिल्हा प्रमुख सतीश धोबे,युवा सेना जिल्हा प्रमुख प्रशांत सातपुते ,सतीश नवरखेले प्रमोद भोमले,तालुका प्रमुख संजय पांडे आणि शहर प्रमुख मिलिंद गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रातील या फडणवीस सरकारच्या काळातील विविध व महत्त्वाचे प्रश्न असताना सुध्दा हे भाजप वाले आपल्या छुपा एजेंडा वर काम करून जाती – जाती, धर्मा – धर्मा मध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी शेकण्याचे काम करीत आहे. या राज्यात महत्वाचे प्रश्न जसे की, शेतकऱ्यांचे प्रश्न, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे प्रश्न, आरोग्य बाबतचे प्रश्न, महागाईच्या प्रश्न असताना या प्रमुख विषयावर जनतेचा आक्रोश तयार होऊ नये!

म्हणून आता हिंदी भाषिक आणि मराठी भाषिक लोकांच्या मनात ऐकामेकाच्या विरोधात तेढ निर्माण व्हावे यासाठी या सरकारने शाळेतील इयत्ता पहिली पासून हिंदी शक्ती बाबत अध्यादेश काढण्यात आले. म्हणून शिवसेना सतत या राज्यातील मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढत आहे व राहील. व काढलेला हिंदी सक्ती होऊ देणार नाही . या ठिकाणी धरणे आंदोलन निषेध सभेत वर्धा शहर प्रमुख मिलिंद गांधी यांनी प्रास्ताविकपर केले.

मनीष देवडे ,उपजिल्हाप्रमुख सतीश धोबे, उपजिल्हा संघटिका वर्धा,भारती कोटंबकर ,त्यानंतर जिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे यांनी या निषेध सभेत आपले मनोगत व्यक्त केले. हिंदी सक्तीच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन पक्षा तर्फे करण्यात आले. तथा शासनाच्या शासन निर्णय विरोधात शासन निर्णय पेटवून होळी करण्यात आली.

तसेच आम आदमी पार्टीचे माजी उपजिल्हाप्रमुख प्रमोद भोमले वर्धा यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे यांनी त्यांच्या हाताला शिवबंधन बांधून त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. त्यांना पक्षातील सर्व पदाधिकारी शिवसैनिकांतर्फे पक्षात प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

Uddhavthakre/या वेळी पक्षातर्फे प्रकाश अनासाने, मनीष देवडे,गजानन काटवले,शंकर झाडे, सुनील आष्टीकर,तालुका संघटक लक्ष्मण डंभारे, सुभाष कडे,श्रीधर कोटकर,भास्कर ठवरे,शंकर मोहमारे, धीरज फुंडकर, धरमा शेंडे, नरेश भावरे, गणेश उरकुडे, धनश्री थोरात,शकील अहमद, भास्कर मानकर, गोपाल मेघरे,दिनेश धोबे, लक्ष्मण बकाने,सुरेश चौधरी,संजय पिंपळकर, बंडू मोरशे, चगेंज खान,नईम शेख, अमोल वादाफळे,हिरामण आवारी, संदीप नरड, डॉ. आनंद जगताप,बलराज डेकाटे,विजय कोरडे, भास्कर भिसे,दिलीप वैद्य, निलेश भगत,विलास धोबे, बाळा थोरात, विकी हातगडे, सुरज लोंढे, सिंधू पात्रे, अमन लोंढे ,वीरू शेंडे, रितिक नाडे, विनय शेंडे, संदीप नाडे, बावी शेंडे, ईशान शेंडे, अंगद शेंडे, विलास हातगडे, आकाश हातगडे, प्रथमेश कुरील, स्वानंद खपली, युधिष्ठिर थोरात , संजय बारई,श्याम वाघमारे,सचिन वावधने, श्रीकृष्ण रामगडे, दुर्गा कातोरे, जयमाला सोनगडे, शुभांगी कबळी, विद्या पाटील, विद्या वाघमारे,इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

यावल येथील अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे.चुंचाळे या महिलेचे निधन संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त(Yavalnews)

0

 

विकी वानखेडे तालुका प्रतिनिधी

Yavalnews:यावल दि.२८ यावल येथील आठवडे बाजाराच्या दिवशी अतिक्रमणामुळे कस्तुराबाई सावकारे या महिलेचे निधन झाल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून ट्रक ट्रक चालक विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली नागरिकांनी केली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की,तालुक्यातील चुंचाळे येथील कस्तुराबाई चैत्राम सावकारे वय ५८
यांचा काल यावल येथे शुक्रवारच्या बाजारात रस्त्यावरील अतिक्रमणामुळे झालेल्या अपघातात पायाला गंभीर दुखापत झाली असता त्यांच्यावर तातडीने औषधोपचार सुरू असताना काल शुक्रवार दि.- २७ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी निधन झाले,त्यांची अंत्ययात्रा आज शनिवार दि.२८ रोजी दुपारी ५ वाजता चुंचाळे येथील राहत्या घरापासून निघेल त्या चैत्राम सावकारे यांच्या पत्नी होत तर किरण व विजय चैत्राम सावकारे यांची आई होत.

आ.मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी(mlamanojkaynde)

कस्तुराबाई काल यावल येथील आठवडे बाजारात बाजार करण्यासाठी आल्या असता बऱ्हाणपूर- अंकलेश्वर ( यावल चोपडा रोडवर ) या महामार्गावर भरत असलेल्या बाजाराच्या आजूबाजूला व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे एका वाहनाच्या चाकाखाली त्यांचा पाय दाबला जाऊन गंभीर दुखापत झाली असता त्यांच्यावर यावल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव हॉस्पिटलमध्ये तातडीने रवाना करण्यात आले होते.

परंतु औषध उपचार सुरू असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. यावल नगरपालिकेच्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि संबंधित सर्व यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे यावल येथील अतिक्रमणाचा पहिला बळी चुंचाळे येथील कस्तुराबाई सावकारे या ठरल्याने चुंचाळे ग्रामस्थ यांच्यासह यावल शहरात,तालुक्यात वाहनधारकांचे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

यावल येथील बऱ्हाणपूर अंकलेश्वर या महामार्गाच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण आता तरी संबंधित सर्व शासकीय यंत्रणेने काढायला पाहिजे आणि यात काही मोजक्या ठराविक राजकीय पुढार्‍यांनी,समाजसेवकांनी अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप न करता शासकीय अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याबाबत सहकार्य करावे अन्यथा यापुढे फार मोठी अप्रिय घटना घडू शकते याची समय सूचकता बाळगून तात्काळ अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

यावल शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे जागोजागी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने वाहतुकीस रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो हे या अधिकाऱ्यांना आणि काही लोकप्रतिनिधींना दिसत नाही का..? आणि अतिक्रमण का काढले जात नाही.? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Yavalnews /गेल्या महिन्यात अतिक्रमण काढणे संदर्भात काही प्रमाणात सुरुवात करण्यात आली असता यावल शहरातील व बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावरील अतिक्रमण का काढले गेले नाही याबाबत सुद्धा यावल शहरात चर्चा सुरू आहे.

आ.मनोज कायंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी(mlamanojkaynde)

0

 

सय्यद जहीर लोणार /बुलढाणा

प्रतिनिधी आपल्या अतिशय साधी राहणे आणि जनसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे चर्चेत असणारे सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार मनोज भाऊ कायंदे हे वेगवेगळ्या सामान्य घटनेने चर्चेत असतात. 27 जून वार शुक्रवार अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीच्या सर्वे करत असताना त्यांनी अनेक गावांना भेटी दिल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.

विकास विद्यालय, सतोद येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप(Yavalnews)

त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संवाद साधून समस्या सोडविण्याचे आदेश दिले सरसकट नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी वरच्या स्तरावर बोलणे केले हे सगळं सुरू असताना सकाळी आठ वाजेपासून घराच्या बाहेर पडलेले आमदार एक वाजता सहज मजाक मध्ये बोलले मला भूक लागली आहे.mlamanojkaynde

शेजारी असलेल्या मायमाऊलीने लगेच टोपली मधून पाच-सहा भाकरी काढल्या ठेचा लोणचं आमदार साहेबांच्या हातावर टेकविल्या आमदार साहेब तात्काळ तेथेच बांधावर न्यारीचा आनंद घेतला. आणि तात्काळ पुढील गावाच्या बांधावर जाण्यासाठी पुढे निघाले आमदार साहेबाचा हा साधेपणा बघून सामान्य लोक आवक होत आहे.

सामान्य चा आमदार अशी प्रतिमा जोपासत आमदार साहेब नक्कीच मतदार संघाचा विकास करतील ही अपेक्षा जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात बळावली आहे. अधिकाऱ्यांचा ताफा शोभत असल्याने अधिकाऱ्यांची चांगली तारांबळ उडाली आमदार साहेबांसोबत चिखल तुडवत शेतात जावं लागलं.

mlamanojkaynde/मात्र या कृतीमुळे शेवटच्या घटकातला व्यक्तिमत्व सुखावून गेला यावेळी प्रामुख्याने नितीन कायदे प्राध्यापक सदाशिव मुंडे प्राध्यापक अरविंद चव्हाण विठ्ठल पाटील आटोळे अंबादास खंड परमेश्वर खंदारे विष्णू भाऊ केंद्रे नंदाजी कांगणे दिनकर फड चिखला सरपंच गणेश काकड देउळगाव कोळ सरपंच गणेश फड व इतर कार्यकर्ते प्रामुख्याने साहेबांसोबत उपस्थित होते

विकास विद्यालय, सतोद येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप(Yavalnews)

0

 

विकी वानखेडे यावल

Yavalnews:सतोद, 26 जून 2025 – ग्रामीण शिक्षण मंडळाच्या वतीने विकास विद्यालय, सतोद येथे गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम ग्रामीण शिक्षण मंडळाचे चेअरमन मा. श्री. अशोक त्र्यंबक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

Sharadpawar /राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट नगर परिषदेवर धडक.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. पराग महाजन (मानसोपचारतज्ज्ञ, भुसावळ) यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. त्यांच्या सामाजिक जाणिवेचा व सेवाभावाचा हा अभिनंदनीय नमुना ठरला.

कार्यक्रमास ग्रामीण शिक्षण मंडळाचे सचिव श्री. प्रकाश धांडे, व्हाईस चेअरमन श्री. गोपाल फेगडे, डॉ. लखिचंद महाजन, माजी चेअरमन श्री. नितीन महाजन, अथर्व मेडिकल एजन्सीचे संचालक श्री. कैलास चौधरी तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक, विद्यालयाचे सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Yavalnews:कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. के. आर. सोनवणे यांनी केले, तर सर्व दाते व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक श्री. एस्. डी. पाचपोळे यांनी केले.

Sharadpawar /राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हिंगणघाट नगर परिषदेवर धडक.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, व सामाजिक संघटना कडून शहरातील विविध समस्यासाठी नगर परिषदेवर धडक आंदोलन करण्यात आले.

हिंगणघाट शहरातील १४२ कोटी रुपयांच्या अमृत योजने अंतर्गत मल निसारण भुयारी गटार योजना व पाणी पुरवठा योजनेचे कामे झाली असून व नंतर ५० कोटीचे वाढीव कामे करण्यात आली अमृत योजना फेस १ चे काम संतोष कॅन्स्टशन कंपनी नांदेड यांना ६१ कोटी ची कामे दिली व २०१७ झाली या कामाला सुरुवात झाली.

Prakashambedkar/ प्रकाश आंबेडकरांना न्यायालयाकडून मोठा धक्का; वाढीव मतदानावर न्यायालयाने फेटाळली याचिका

फेस २ चे काम गुजरात येथील कंपनीला ५० कोटीची कामे दिली व ती सुरू आहे. व सन २०१८ साली मल निस्सारन योजना ८१ कोटीचे काम लक्ष्मी कॅन्स्टशन गुजरात यांना देण्यात आली. व ते कंपनीने काम सन २०२२ साली पूर्णता करून गेली. परंतु आजही हि कामे शहरात पूर्ण झालेली नाही. शहरात मल निसारण योजने अंतर्गत रस्ते खोदकाम केले असून रस्त्याचे कामे अजूनही अपूर्ण आहे.

तसेच रोड वरील चेंबर बनविण्यात आले त्या चेंबर चे झाकन पूर्ण पणे तुटलेल्या स्थितीत आढळून येत आहे. तसेच शहरातील काही प्रभागात नळाचे काम झाले आहे. तर काही प्रभागातअजून हि कामे झालेले नाही असे आढळून येत आहे. तर कुठे झालेल्या कामात नळाला तोट्या देखील लागल्या गेल्या नाही. एकंदरीत या झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला आहे असे दिसून येत आहे.

या झालेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधित कंत्राकदारावर कारवाई करण्यात यावी.
तसेच शहरातील सन २००८ साली वना नदीच्या पात्रात ५ कोटी ३४ लाख रुपयांचा बंधारा बांधण्यात आला. व सन 2011 साली तो बंधारा पाण्यात वाहून गेला या कामात संबंधित कंत्राटदार यास प्रगती पुस्तके प्रमाणे रक्कम देण्यात आली होती. व त्या वेळेला अधिकारी व राजकीय पुढारी यांच्या हस्तशेप असल्यामुळे या बंधाराच्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार करण्यात आला.

तसेच या बंधाऱ्यासाठी आलेली शासकीय निधी प्रशासनानी कोणत्या बँकेत ठेवली होती यांची सदर माहिती देण्यात यावी. तसेच संपूर्ण काम झाल्याची ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते का? आणि एकाच कामाला दोन वेळा निधी मंजूर होत असतो का ? यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असे दिसून येत आहे. यामुळे या बंधाऱ्याची चौकशी करून त्यावेळेसचे संबंधीत अधिकारी व राजकीय पुढारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच नवीन बंधारा ५९ करोड रुपयाचा आहे तर त्यांचे स्वागतच आहे.

परंतु नवीन बंधाराचे काम निकृष्ट दर्जाचा न होता चांगल्या दर्जाचे व्हावे. याकरिता निरीक्षणासाठी वेगळी समिति नेमून त्या कामावर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. जर हा बंधारा निकृष्ट दर्जाचा बनविण्यात आला व त्यात परत भष्ट्राचार झाला तर आम्ही शासन / प्रशासनाला जबाबदार ठरवु. तसेच नवीन बंधाऱ्याच्या कामात कुठलाही भ्रष्टाचार होऊ न देता या बंधाऱ्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात यावे.

तहसील कार्यालय ते रुबा चौक दरम्यान १८ कोटी ७० लाख रुपये निधी देऊन ९०० मिटर चा रस्ता निर्माण केला जात आहे. हा रस्ता शासनाच्या कोणत्या निकषाप्रमाणे निर्माण करण्यात येत आहे, त्यांचे विवरण आम्हाला द्यावे. १८ कोटी रुपये हा जनतेचा पैसा असून या कामांत भष्ट्राचार होत असेल तर या रस्त्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. बस स्टॉप समोरील ट्रॅव्हल्स पॉईंट पासून ते झांसी राणी चौक पर्यंत संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे.

हा रस्ता रहदारीचा असून या रस्त्यावर बस स्टॉप, महाविद्यालय, शासकिय कार्यालये आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या रस्त्याच्या खड्याच्या प्रश्न मार्गी लावावा.मनसे चौक ते डांगरी वार्ड पूला पर्यंत रस्त्याचे काम मागील दोन वर्षापासून संथ गतीने सुरू झाले आहे. परंतु आज पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावर मुख्य आठवडी बाजार भरत असतो. तसेच रस्त्याच्या मधोमध्ये दुभाजक अजून पर्यंत उभारलेले नाही. या रस्त्यामुळे नागरिकाना नाहक त्रास सहन कराया लागत आहे. त्याकरिता आपण या विषयाला गांभीर्याने घेऊन या प्रश्न तात्काळ मार्गी लावावा.शहरातील डांगरी वार्ड येथील समर्थ रामदास आखाडा पासून ते लौटन चौक पर्यंत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन एक वर्ष अगोदर करण्यात आले परंतु आज पर्यंत या रस्त्याचे काम अध्यापही झालेले नाही. करीता या रस्त्याच्या कामा कडे जातीने लक्ष घालून या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे.

सर्व विषयाला गांभीर्याने घेऊन वरील सर्व प्रश्न तात्काळ मार्गी लावावे अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तीव्र ठोस भूमिका घेईल नंतर जे काही पडसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन, प्रशासन राहील असे निवेदन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मुख्याधिकारी मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

Sharadpawar/यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, शहर निरीक्षक महेश झोटिंग पाटील,हाजी मोहम्मद रफिकभाई, तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे,समाजसेवक सुनील डोंगरे,माजी नगरसेवक अशोक पराते, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर,दिव्यांग सेल प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर,वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव,जिल्हामहासचिव मिलिंद कोपुलवार, महिला तालुका अध्यक्ष कविता वानखेडे,अंकिता गहलोत, गोमाजी मोरे,श्रीकांत भगत,राजेश भाईमारे,विजय तामगाडगे,सुधाकर वाढई, नितीन भुते,साहेबराव येडे,जगदीश वांदिले, नाना पुंड, रवी गिरसावले,उमेश नेवारे,सुनिल घोडखांदे,रमेश चतुर,प्रवीण भुते,अनिल लांबट, कुणाल येसबरे, प्रशांत एकोणकर,सुशील घोडे,विपुल थुल, हुकेश ढोकपांडे,देवा गवई, किशोर गायकवाड,पंकज भट्ट,राजू मुडे, आकाश हुरले,अन्सार शेख, पप्पू आष्टीकर,दिपक अंबरवेले,शेखर निखाडे, घिमेकर गुरुजी, मोहम्मद शाहिद,अनिल भुते,राहुल जाधव,वैभव साठोने, प्रशांत मेश्राम,छोटू वानखेडे,संजोक टेभोंर्ने, निखिल शेळके, रवी बोरकर,सौरभ घोडखांदे,सचिन घोडे, विपुल वाढई,रोहीत लेदे,मंगेश सातघरे,नंदू वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Prakashambedkar/ प्रकाश आंबेडकरांना न्यायालयाकडून मोठा धक्का; वाढीव मतदानावर न्यायालयाने फेटाळली याचिका

0

 

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक ७६ लाख अधिक मतदारांची नोंद झाली असल्याच्या वाढीव मतदानाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका २५ जून २०२५ रोजी न्यायालयाने फेटाळली आहे.Election

या निर्णयामुळे प्रकाश आंबेडकरांना मोठा धक्का बसला आहे आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर उठलेल्या गंभीर प्रश्नांवर न्यायालयाने थोडासा विरोध दर्शविला आहे.

Foreshtnews/सामाजिक वनीकरण देऊळगाव राजा वनक्षेत्रपाल यांचा मनमानि कारभार गैरहजर राहून काढले पगार बिले

 

याचिकेत या ७६ लाख वाढीव मतांवरील आकडेवारीवर संशय व्यक्त केला गेला होता की ती निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीशी जुळत नाही आणि त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही अपवित्र प्रवृत्ती घडली असण्याची शक्यता लक्षात घेतली गेली होती.

प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्ष नेत्यांना पत्र लिहून ईव्हीएमच्या वापराचा आणि १९६१ च्या निवडणूक नियमांत झालेल्या बदलांविरुद्ध एकत्रित लढा देण्याचा आवाहन देखील केला होता.Election

न्यायालयाने हे प्रकरण दोन्ही बाजूंच्या मतांवर ऐकून तपासून निकाल दिला असून, त्यानुसार याचिका फेटाळण्यात आली. न्यायालयाने या याचिकाकारणाने वेळ वाया गेला असल्याचा उल्लेख करत प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पुढील निर्णयासाठी निकालाचे सविस्तर कारण पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देण्याचे आश्वासन दिले आहे.

 

या निर्णयामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या प्रश्नावरुन विरोधी पक्षांच्या टीकांचा भडका कमी होण्याची शक्यता आहे, पण निवडणुकीतील वाढीव मतदानाचा भान राहण्याचे प्रश्न अजूनही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील.

या याचिकेनंतर निवडणूक समितीच्या कार्यपद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित होण्याची गरज असल्याचे मतही काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.Election

Prakashambedkar / या याचिकेच्या फेटाळण्यामुळे प्रकाश आंबेडकरांसह विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला आहे, तरीही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा प्रश्न अजूनही कायम आहे, ज्यावर पुढील काळात अधिक चर्चा होणार आहे.

Foreshtnews/सामाजिक वनीकरण देऊळगाव राजा वनक्षेत्रपाल यांचा मनमानि कारभार गैरहजर राहून काढले पगार बिले

0

 

दोघेही एकाच ठिकाणी असल्याचा गैर फायदा – शेतकऱ्याचे कामे प्रलंबित

या आधी ही विभागीय वन अधिकारी यांना तब्बल पुराव्या सहकार्यालय बंद असल्या बाबद तक्रार करण्यात आली होती मात्र त्यांनी कुठलीच ठोस कारवाई न केल्याचे स्पष्ट

Foreshtnews:देऊळगाव राजा : तालुक्यातील सामाजिक वनीकरण कार्यालची प्रतिक्रिया त्यांच्या कर्मचाऱ्या कडून उघडकीस सविस्तर माहिती अशी कि वनक्षेत्र पाल (RFO) हे दोघे पती पत्नी एकाच ठिकाणी असल्याने कर्तव्यात कसूर करत असून कार्यालयाचा कारभार मनमानी करत आहेत तसेच शेतकऱ्याचे वृक्ष लागवड बांदावरील वृक्ष लागवड असे कामे मात्र अद्याप ही प्रलंबित आहेत.

पतंजली योग परिवार द्वारा आयोजित योग शिबीराला अतुल वांदिले यांची उपस्थित (Hingnghat)

तसेच कार्यालयीन लिपीक नामे सोसे साहेब व दुसरे कर्मचारी श्री गजानन पोटे यांनी सुद्धा स्पष्ट बाईट द्वारे बोलतानी कळविले कि वनक्षेत्रपाल हे कधीच कार्यालयात चमकले नाहीत ते फक्त १ मे, २६जानेवारी व १५ ऑगष्ट या दीना निमित्त च कार्यालयात येतात नंतर मात्र कधीच आले नाहीत या उलट कार्यालचा कारभार हा घरूनच कसा चालतो आवक जावक रजिष्टर, असेल काही शासकीय कामकाज पत्रव्यवहार, पगार बिल घेण्यासाठी त्याच्या घरीच जावे लागते.

तसेच कार्यालयाचे चाबी सुद्धा शासकीय कर्मचारी यांच्याकडे नसून ही सर्व कामे एका खाजगी व्यक्ती मार्फत केली जातात असे स्पष्ट सांगितले तसेच त्यांना फोन द्वारे संपर्क केला आसता फोन सुद्धा घेत नाही असे सांगितले तसेच हे कार्यालय महिनाभर कर्तव्यात कसूर करून बंद असल्या बाबत विभागीय वन अधिकारी यांना पुराव्यासह तकरार करण्यात आली होती

मात्र त्यांनी ही सुद्धा थातूर मातुर कारवाई करून पाठीशी घातल्या मुळे सबधिताला मात्र आपले काहीच होत नाही या गुर्मीने परत ही मनमानी सुरूच आहे यांना वरिष्टा चा धाक न राहिल्या मुळे भय राहिले नाही मात्र आता नागरिकांना प्रश्न पडला आहे कि दोघे ही पती पत्नी अधिकारी एकाच ठिकानि असल्याचा गैर फायदा घेऊन मनमानी करून कर्तव्यात कसूर करत असल्याने ते आर्थिक गैरव्यावहारात अग्रेसर आहेत.

 

तसेच शासकीय निधीचा अपहार च्या तक्रारी असंख्य वाढत आहे व ते वादग्रस्त असून ते आर्थिक बबिशी निगडित असलेल्या पदायोग्य नसून येथून त्यांना दुय्यम पदाच्या जसे कि कार्या यौजना, प्रशिक्षण संस्था बांबू संशोधन केंद्र, अशा ठिकाणी बदली करून त्यांना आर्थिक व शासकीय निधी मिळणाऱ्या पदा पासून दूर ठेवण्यात यावे.

Foreshtnews /व तात्काळ त्याची विभागीय चौकशी करून त्याच्यावर दोषारोप करून नियमोचित कार्यवाही व्हावी व कार्यवाहीच अहवाल सार्वजनिक रित्या जाहीर व्हावा अशी देऊळगाव राजातील प्रतिनिधी व समाज माध्यमाची दाट चर्चा सुरु आहे