Home Blog Page 309

संग्रामपूर शहर मध्ये मच्छर धुरळणी फवारणी करणे बाबत शहर वासियांचे निवेदन

0

संग्रामपूर नगर पंचायत अंतर्गत शहरात गेल्या 8 महिन्या पासून मच्छर धुरळणी फवारणी केल्या गेली नाही. शहरात तापीच्या साथीने थैमान घातले आहे. धुरळणी फवारणी केली नसल्याने ताप या आजारा सोबतच डेंगू मेलेरिया सारख्या आजारांना नगर वासियांना बळी पडावे लागत आहे.

लाखो रुपयांचे कंत्राट या बाबत दिले असतांना सुध्दा नगर पंचायत कडून 8 महिन्या पासून धुरळणी फवारणी केली नाही.त्यामुळेच मच्छर पैदास मोरे मोठ्या प्रमाणात झाल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.निवेदन देती वेळी याबाबत नगर पंचायत अधिकारी सोबत चर्चा केली असतांना त्यांनी सुध्दा ही बाब मान्य केली. घन कचरा ठेकेदार यांने कामे न करता बिल काढली त्या बाबत त्यांच्या वर कार्यवाही करावी ही मागणी नगर वासियांनी केली.
संग्रामपूर नगर पंचायत ने तात्काळ धुरळणी फवारणी केली नाही तर कोणत्याही क्षणी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर वासियांनी दिला आहे.

 

कोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारी टोळी हिंगणघाट डीबी पथकाची कारवाई

0

 

हिंगणघाट दि. 13/04/2022
कोल्हापुरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा चोरणारी टोळी डी. बी. पथकाने अटक करून त्यांचेकडुन 8,69,000रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हकिकत याप्रमाणे आहे की, आरोपी 1) मनोज देवीदासजी मंगाम, वय 23 वर्ष, रा. आमगांव (खडकी), पो. स्टे. सिंदी (रेल्वे), 2) सरफराज हबीब शेख, वय 23 वर्ष, रा. क्रांती चौक, वार्ड नं. 4 बुट्टीबोरी, जि. नागपूर, 3) अय्युब वहीद खान, वय 21 वर्ष, रा. क्रांती चौक, वार्ड नं. 4 बुट्टीबोरी, जि. नागपूर यांचेवर नांदगांव चौक, हिंगणघाट येथे नाकाबंदी करून चेक केले असता, त्याचे ताब्यात एक विना नंबरचा नविन महेन्द्रा कंपनीचा बोलेरो पिकअप मध्ये 23 नग कोल्हापूरी बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा प्रती प्लेट 3000 रू. प्रमाणे 69,000 रू. भरून असल्याचे आढळून आले. त्यांना बंधाऱ्याच्या प्लेटाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवा उडवीचे उत्तरे दिली व प्लेटाबाबत कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. म्हणून सदरच्या बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा या त्यांनी कोठल्या तरी कोल्हापूरी बंधाऱ्यावरून चोरून आणली असावी, व त्या चोरीची आहे, असे आढळून आल्याने त्याचे विरूध्द पो. स्टे. हिंगणघाट येथे इस्तेगासा क्र. 01/2022 कलम 41 (1) (ड) फौ.प्र.सं. अन्वये नोंद करून त्याचे ताब्यातुन बोलेरो पिकअप व 23 नग बंधाऱ्याच्या लोखंडी
प्लेटा असा एकुण 8,69,000 रू. चा माल जप्त केला. सदर जप्त कोल्हापूरी बंधाऱ्याच्या प्लेटाबाबत त्यांना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी मौजा सिंदीविहीरी, पोलीस स्टेशन कारंजा येथील शासकिय कोल्हापूरी बंधाऱ्याच्या चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने व पो. स्टे. कारंजा येथे अप. क्र. 103 / 2022 कलम 379 भा.दं.वि. नोंद असल्याचे दिसुन आले असुन, पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

यावल येथे आमदार सौ .लताताई सोनवणेंच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत धनादेश वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील चोपडा मतदार संघातील विविध गावातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील कुटुंबातील कमाविता व्यक्ति मरण पावलेल्या कुटुंबाला शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत चोपडा आमदार सौ लताताई सोनवणे यांच्या हस्ते २६लाभार्थ्यांना पाच लाख विस हजार रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आलीत. यावल तहसील कार्यालयात चोपडा मतदार संघातील लाभार्थ्यांना आज संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अनेक दिवसापासून मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना चोपडा मतदार संघाच्या आमदार सौ .लताताई सोनवणे यांच्या हस्ते व तहसीलदार महेश पवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे , यावल शहर शिवसेना प्रमुख जगदीश कवडीवाले , मोहराळा येथील सरपंच सौ .नंदा गोपाळ महाजन , सेनेचे पप्पु जोशी , नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्यासह अनेक शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते . या२६ लाभार्थांना मिळाला राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ ,१ )योगीता सुतार , रा .आडगाव ता . यावल , २ )सरलाबाई पाटील , रा . चिंचोली , ३ ) समिना तडवी , रा कासारखेडा , ४ ) दिपाली बडगुजर , रा . साकळी , ५ ) शोभा तायडे , रा .कोरपावली, ६ ) साहेराबी सैय्यद , रा . साकळी , ७ ) कैलास पाटील , रा . चुंचाळे, ८ ) वंदनाबाई भालेराव , रा .थोरगव्हाण, ९ ) सुभाबाई सोनवणे , रा .मनवेल, १० ) फातमाबाई तडवी , रा .कोरपावली , ११ ) सुगराबाई तडवी , रा . चुंचाळे , १२ ) सुरेखाबाई सोनवणे , रा .वढोदे प्र . यावल , १३ ) शोभा सोनवणे रा .वढोदे प्र . यावल , १४ ) मुक्ताबाई चौधरी , रा .वढोदे प्र . यावल , १५ ) रत्ना सोनवणे , रा .वढोदे प्र . यावल , १६ /हिरकणबाई पाटील , रा . नायगाव , १७ )सरला पवार, रा . नायगाव , १८)रिना मेढे, रा .नावरे , १९ ) सोनाबाई भालेराव , रा .मनवेल, २० ) मंगला जाधव , रा .किनगाव बु , २१ )सोनी साळुंके , रा .किनगाव बु , २२ )शांताबाई सपकाळे , रा . साकळी , २३ ) हनिफा तडवी , रा . सावखेडा सिम , २४ )रंजना कोळी , रा. डांभुर्णी, २५ ) उज्वला साळुंके , रा . चिंचोली आणी संगीता सोळुंके यांचा समावेश आहे .

हिंगणघाट शास्त्री वार्ड येथे स्वयंपाक करताना सिलेंडरचा स्फोट

0

 

हिंगणघाट दि. 12 एप्रिल
शास्त्री वार्ड, सरकारी गोदामा जवळ राहणार सौ वर्षा राजकुमार खोब्रागडे या संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान घरी स्वयंपाक करताना गॅस शेगडी चालू केली असता रेगुलेटर इथून गॅस लिकेज झाली व आग पकडली तसेच मी बाहेर आली काही वेळातच गॅसचा स्फोट झाला. घरातील भिंतीला गड्डा तसेच फ्रीज ,कूलर ,फॅन, मिक्सर , भांडी ठेवायची रॅक व इतर सामाना चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही लगेच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला .
सिलेंडरचा स्फोट माहिती घेतली असता सिलेंडर हे सत्यश्री गॅस एजन्सी येथून दुपारी 4 वाजता आणण्यात आले तसेच ते लावले 8 वाजताच्या दरम्यान स्वयंपाकासाठी गॅस शेगडी चालू केली असता रेगुलेटर पासून पेट घेतला.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

गाडऱ्या गावातील एका आदीवासी अविवाहीत तरुणीचा विषारी सर्पदंश झाल्याने जागीच मृत्यु

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल:- तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या गावातील एका आदीवासी अविवाहीत तरुणीचा विषारी सर्पदंश झाल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार गाडऱ्या तालुका यावल या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम गावात राहणाऱ्या फुगली भाया बारेला ही २२ वर्ष ही तरूणी आज दिनांक १२ एप्रील रोजी आपल्या कुटुंबा सोबत गाडऱ्या शिवारातील आपल्या शेतात सकाळी ९ते ९ , ३oच्या सुमारास तुर कापणीचे काम करीत असतांना अचानक एका विषारी सर्याने तिच्या उजव्या हातावर दंश केला , सदर दंश करणारा साप हा अत्यंत विषारी असल्याने त्या तरूणीचा जागेवर मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सदरची तरूणीला सर्पदंश झाल्याची माहीती मिळताच गावातील सरपंच भरत छ्तरसिंग बारेला पोलीस पाटील तेरसिंग गाठु बारेला व ग्रामस्थांनी यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या तरुणीचा जागीच मृत्यु झाल्याचे दिसुन आले , यावेळी सरपंच आणी पोलीस पाटील यांनी वेळेवर रूग्णवाहीका मिळुन शकल्याने सुमारे सहा तासाचे प्रवासाच्या ८० किलोमिटरचा अंतरावरून एका खाजगी वाहनाने त्या मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असुन , या संदर्भात पोलिस पाटील तेरसिंग बारेला यांनी पोलीसांना खबर दिल्यावरून अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी व पोलीस करीत आहे . मरण पावलेल्या तरूणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज तडवी यांनी केले

श्रीराम नवमी निमित्त हिंगणघाट शहर झाले भगवामय

0

 

हिंगणघाट :श्री राम नवमी शहरात भगव्या मय व धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोरोना काळ संपल्यानंतर दोन वर्षांनी श्री राम नवमी उत्सव सकाळी बाईकवरून रॅली काढून भगवा ध्वज हातात घेऊन भव्य रॅली काढली तसेच सांयकाळी ठिक 5 वाजता शहरातील मुख्य श्री राम मंदीरातुन पालखी चे पूजन करून मिरवणूकीची सुरवात झाली या या मिरवणूकीची विषेश वारकरी दिंडी तसेच यवतमाळ येथील पथक तसेच मोठ्या प्रमाणात विविध झाकी काढून शहर भगवामय करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले शहरातील मुख्य मार्गात व्यावसायिक तसेच प्रत्येक व्यक्तीने सहभाग नोंदवला या श्री राम नवमी यशस्वी करण्यासाठी एक श्री राम उत्सव समीती नेमणूक करण्यात आली त्यात प्रामुख्याने अध्यक्ष बाबु सतीजा,उपाध्यक्ष,प्रदीप जोशी,विनोद झाडे,संघटक- सुनिल डोंगरे कोषाध्यक्ष संजय बोथरा,गोपाल पुरोहित, प्रसिद्धी प्रमुख दिनेश वर्मा,राकेश शर्मा ,सजावट समीती,सुनिल येनकर, धर्मा धात्रक किरीट शेषपाल,बबलु खेनवाल,कांतु करवा,गोविंद तिवारी,पंकज देशपांडे,रवी रोहनकर,राजू जोशी,संदीप जोशी, हर्षल जगताप, अनिल गहरवार ,मार्गदर्शक समीर कुनावार,सुधीर कोठारी,राजु तिमांडे,अतुल वांदीले,अजय करवा,प्रेम बसंतानी यांनी केले तसेच असंख्य कार्यकर्ते राम नवमी उत्सव समीती उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी ए.सी. सी.चांदा सीमेंट कंपनीत पकडलेल्या 22 ट्रक मधील कचरा अतिशय घाणेरडा व वापरण्यायोग्य नसल्याचा प्रदूषण विभागाचा अहवाल !

0

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

तामिळनाडू- चेन्नई शहराच्या(परप्रांतातल्या) कचऱ्याची विल्हेवाट चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग,कुठलीही प्रक्रिया न करता बॉयलर मध्ये या कचऱ्याचा वापर करीत आहे,त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे.!
आज तामिळनाडूच्या चेन्नईहून आलेले २४ घाणेरड्या कचरा भरलेले ट्रक एसीसीत पकडले.
दि. 9 एप्रिल 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी ए. सी. सी चांदा सीमेंट कंपनी घुग्घुस /नकोडाच्या वाहनतळावर असलेल्या जवळपास 25 कचऱ्याच्या ट्रक पकडल्या, ज्यात अतिशय घाणेरडा व सडलेला,निकृष्ट दर्जाचा,कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा भरलेला होता, यात घाणेरडे चिखलाने भरलेले कपडे, मातीने माखलेल्या प्लॅस्टिकच्या पन्न्या,औषध टॅबलेट,औषधांची ऍल्युमिनियम पाकिटे, केसं,मेलेली जनावरं, लोखंड असा मिक्स असलेला आणि पूर्णतः सडलेला कचरा होता, या विरुद्ध राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, दिलीप पित्तलवार, सुरेश पाईकराव, महेश लढ्ढा, यांनी लिखित तक्रार स्थानिक पोलीस स्टेशन घुग्गुस येथे दिली,आज जिल्हा प्रदूषण विभागाच्या कार्यालयाला जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी याविरुद्ध एक तक्रार दिली, त्यानुसार जिल्हा प्रदूषण विभागाचे उप प्रादेशिक अधिकारी श्री. अ.पु.सातफळे क्षेत्र अधिकारी श्री.वी.ध. शुक्ला,सहा.पोलीस निरीक्षक संजय सिंग, आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,दिलीप पित्तलवार, सुरेश पाईकराव, महेश लढ्ढा,ए.सी.सी.चे प्रदूषण विभागाचे व्यवस्थापक व्ही.नागभूषण,सुरक्षा अधिकारी, या सर्वाच्या उपस्थितीत तक्रारीची शहानिशा करण्यात आली,या ट्रक मधील कचऱ्याची तपासणी करण्यात आली,प्रदूषण विभागाने घालून दिलेल्या नियमानुसार शहरांमधून निघणारा कचऱ्यावर प्रक्रिया करून प्लास्टिक वेगळे,कपडे वेगळे,औषधांचे अल्युमिनियम चे फॉयील वेगळे, असा कचरा वेगवेगळा करून त्याला लागलेली माती, घाण साफ करून स्वच्छ करून मग त्याला कॉम्प्रेस करून त्या कचऱ्याचे सॉलिड ब्लॉक करून असा कचरा बॉयलर मध्ये वापर करण्याची प्रदूषण मंडळाच्या २/०२/२०२२च्या पत्रानुसार परवानगी दिली आहे असं प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली,परंतु ज्या २५ ट्रकची तपासणी करण्यात आली, या कचऱ्यात,सडलेले नालीच्या घाणीत भरलेले कपडे,औषधांचे पाकीट,अल्युमिनियम फॉईल,केसं,प्लॅस्टिकच्या पन्न्या,लोखंड, माती,इत्यादी इत्यादी हे सर्व मातीने माखलेला कचरा प्रदूषण विभागाच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांना आढळून आला,आणि त्यांनी हा कचरा अजिबात वापरण्या योग्य नसल्याचे एसीसी च्या प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले,त्यानुसार वस्तुनिष्ठ अहवाल प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लिखित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळास दिले,त्यात ए.सी.सी.सिमेंट उद्योगात अश्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा कुठलाही प्रकल्प नाही,त्यामुळे जसा कचरा आला तसा ही कंपनी बॉयलर मध्ये टाकून जिल्ह्यात व उद्योग परिसरात प्रदूषण वाढवीत आहे,त्यामुळे नियमबाह्य पद्धतीने अश्या कचऱ्याचा वापर केल्याबद्दल ए सी.सी. व्यवस्थापणाविरुद्ध प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार कारवाही करावी अशी मागणी यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली.*
*सर्वात धक्कादायक बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योग असा निकृष्ट दर्जाचा स्वस्त दरात मिळणारा कचरा,त्यांच्या त्यांच्या उद्योगांच्या बॉयलर मध्ये वापरून आपले काम भागवत आह,आणि आपल्या जिल्ह्यात प्रदूषण पसरवीत आहे. आणि चंद्रपूर जिल्ह्यातील कचरा न वापरता हे उद्योग आपला जिल्हा सोडा,महाराष्ट्र सोडा परराज्यातून म्हणजे तामिळनाडूच्या चेन्नई शहरातील कचरा आपल्या जिल्ह्यात आणून आपल्या जिल्ह्यात प्रदूषण पसरवीत आहेत.आणि चेन्नईच्या कचऱ्याची सोय लावत आहेत.*

मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी.

0

 

(चंद्रपूर घुग्घुस )प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या महात्मा फुल्यांचे विचार समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे – भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
घुग्घुस येथील मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्त्री शिक्षणाचे प्रणेते, महान समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली केली. विधवा पुनर्विवाह सारख्या चांगल्या प्रथेचे त्यांनी समर्थन केले. देशात अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर घणाघात करुन त्यांनी प्रबोधनाची चळवळ उभारली. शेतकरी, कष्टकरी, महिला व उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत त्यांना लढण्याचं बळ दिलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वप्रथम महात्मा फुल्यांनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.
समाजातील पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा जोतिबा फुल्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे विचार खऱ्या अर्थाने समाजाला उन्नतीच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. असे मत याठिकाणी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी उपसरपंच संजय तिवारी, माजी ग्रामपंचायत सिनू इसारप, सागर आकापेल्ली, सौ. शारदाताई झाडे, सौ. सुनंदाताई लिहीतकर, अमोल तुळसे, शितल कामतवार, खुशबू मेश्राम, लता आवारी, भारती पर्ते, स्वाती गंगाधरे यांसह आदि मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

 

उषा पानसरे मू.का. संपादक असदपूर मो.992140042

देगलूर, नांदेड : पोलीस विभागातील सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने आपले कर्तव्य बजावित असतात. दिवाळी आली पोलीस, होळी आली पोलीस, ईद आली पोलीस, राजकीय नेते आले पोलीस, हत्या झाली पोलीस, भांडण झाले पोलीस, अपघात झाला पोलीस, मतदान प्रक्रिया पोलीस, चोरी झाली पोलीस, मारामारी झाली पोलीस अशा विविध ठिकाणी पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते. काहीवेळा स्वतःच्या कुटुंबांसाठीही वेळ देता येत नाही. म्हणून पोलिसांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली मा मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना उपजिल्हाधिकारी कार्यालय, देगलूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनूरे, तालुका संघटक मारोती देगावकर, मनोज बिरादार, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गज्जलवार, तालुका सचिव संतोष मनधरणे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर देशमुख, देगलूर शहर अध्यक्ष उमाकांत कोकणे, अनिल पवार, दादाराव वेळीकर, मल्लिकार्जुन कडलवार, अमित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा संपर्क प्रमुख विशाल पवार यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील तमाम पोलीस बांधवांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. मागण्या अशा : पोलिसांना सुंदर कॉर्टर बनवून देणे, पोलिसांना टी. ए. वाढवून देणे, पोलिसांची ड्युटी आठ तास करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना पगार वाढवून देणे, एखादा पोलिस कर्मचारी ड्युटीवर शहीद झाला तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे व त्यांच्या वारसाला तात्काळ नोकरीत समाविष्ट करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना २००५ पासून बंद झालेले पेन्शन पूर्ववत करणे, महाराष्ट्रातील पोलीस ठाणेमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना पोलीस नोकरी मध्ये पाच टक्के आरक्षण देणे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे अमरावती

शेगांव पंचायत समितीवर प्रहार

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

शेगाव : गायगाव बु येथे भीषण पाणीटंचाई असल्यामुळे दिनांक 15 मार्च 22 राजी bdo साहेब पंचायत समिती शेगांव यांना समस्या निराकरण होण्या साठी ग्रामस्थ व प्रहार शाखा अध्यक्ष वव कार्यकर्ते यांनी दिले परंतु प्रशासनाने दाखल न घेतल्यामुळे प्रहार कार्यकर्ते तसेच गावकरी महिलां च्या वतीने पंचायत समिती कार्यालयात हांडे बजाव आंदोलन करून मागण्या मंजूर होईपर्यत ठिया दिला या आंदोलनात प्रहार जिल्हा उपाध्यक्ष निलेश घोंगे, दीपक ढगे, विलास वानखडे,महादेव सेलरकर, रेखा शेलरकर, वत्सला ढगे, सखुबाई सोनोने,रामा बोरसे,विलास शेलरकर,गजानन अडायकर, देवलाल ढगे,स्वप्नील सोनोने,संतोष निकडे,नावलसिंग पवार,शिवा अडायकर,गोपाळ शेलार