Home Blog Page 369

हिंगणघाट फ्रॅंचायजी फुटबॉल प्रीमियर लीग टूर्नामेंट च्या खेळाडूची निवड प्रक्रिया संपन्न

0

 

हिंगणघाट:
स्थानीय GVM भवंस कॉन्वेंट येथे फ़्रेंचायज़ी फुटबॉल लीग टूर्नामेंट चे आयोजन डिसेंबर महिन्यात होत आहे. आय पी एल सारख्या अश्या अनोख्या लीग टूर्नामेंट साठी शहरात चांगली चर्चा सुरू आहे,

या लीग टूर्नामेंट मध्ये 10 संघाचे फ्रॅंचायजी राहणार आहे.
या टूर्नामेंट मध्ये वर्धा जिल्हातील सर्व खेळाडूंना नामांकित करण्यात आले. 21 आणि 22 नवंबर 2021 ला भवंस कॉन्वेंट च्या पटांगणावर या खेळाडूची ट्रायल घेण्यात आली होती. ज्यामध्ये जास्त गुण प्राप्त खेळाडूंची निवड करण्यात येईल.
सदर टूर्नामेंट 22, 23, 24 आणि 25 दिसंबर 2021 ला आयोजित होत आहे.
ज्यामध्ये एकूण 10 संघाचा सहभाग राहणार आहे. या संघाचे मालक या प्रमाणे
मुफ़ज़्ज़ल हुसैन, नाज़िम खान, सुनील डोंगरे, डॉ. निर्मेश कोठारी प्रवीण फटिंग, नीरज शर्मा, अब्दुल कदीर बख्श, कुणाल मानधनिया, अबरार फारूकी, करन कोचर, अंकुश ठाकुर, रहमत खान, असे आहेत. या आयोजन समिति मध्ये मोहम्मद ऐतबार अली, मोहसिन बावा दिनेश खियानी, कुमैल अजानी, स्टार प्रचारक राकेश शर्मा , दीपेश खियानी, मोहम्मद अजानी, व समस्त रज़ा स्पोर्टिंग क्लब चे खेळाळू आहे।
आयोजन समिति ने या स्पर्धे मध्ये मोठ्या संख्येने खेळाडू प्रेमींना सहभागी होण्या चे आव्हान केले आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

भाजपचा धुव्वा उडाला; पण देशमुखांना सहकारात विरोधकच नाही, हा समज खोटा ठरला

0

डी एस पिंगळे निलंगा प्रतिनिधी

जिल्हा बॅंकेची सत्ता देशमुखांनी कायम राखली असली, तरी भाजपच्या टोकाच्या विरोधाने आगामी काळात काॅंग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीत भाजपला रोखण्यात काॅंग्रेसला पुन्हा एकदा यश आले. लातूर जिल्ह्यात विशेषतः विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूर शहर आणि ग्रामीण हे दोन मतदारसंघ वगळता अन्यत्र भाजपने चांगला जम बसवला आहे. जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून काॅंग्रेसचे वर्चस्व असलेल्या या भागात देखील शिरकाव करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. त्यासाठी भाजपने निकराचा लढा दिला, यातून देशमुखांना विरोधकच नाही हा समज देखील निलंगेकरांनी खोटा ठरवला.
जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने मतदारांपर्यंत पोहचत भाजपने गावागावात काॅंग्रेस विरोधक तयार केले हेच या निवडणूकीचे फलीत म्हणावे लागेल. त्यामुळे जिल्हा बॅंकेत मोठे यश मिळाले नसले तरी भाजपला जे साध्य करायचे होते, ते त्यांनी साध्य केले हे मात्र निश्चित
गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा बॅंकेच्या चाव्या देशमुखांच्याच खिशात राहिल्या. यंदा बिनविरोध निवडणूकीचे काॅंग्रेसचे प्रयत्न फसले, भाजपने कधी नव्हे ते संपुर्ण पॅनल उभे केले, त्यामुळे काॅंग्रेसचे सर्वेसर्वा आणि सहकारातील मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप देशमुख यांनी सावध खेळी केली.
जिल्हा बॅंकेत वर्षानुवर्ष सत्ता भोगत असलेल्या काॅंग्रेसच्या विरोधात भाजपने उमेदवार मिळवल्यानंतर त्यांचे अर्जच तांत्रिकदृष्ट्या कसे टिकणार नाही? अशी योजना आखली गेली. भाजपसह सर्वच विरोधकांचे अर्ज छानणीत बाद झाले आणि सहकार क्षेत्रात प्रवेश करू पाहणाऱ्या भाजपला पहिला धक्का काॅंग्रेसने तिथेच दिला.
मतदानाच्या दोन दिवस आधी भाजपच्या पॅनलचे सर्वेसर्वा संभाजी पाटील निलंगेकर यांनी काॅंग्रेसच्या नेत्यांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. बॅंक चांगली चालवल्याचा दावा करणाऱ्यांनी निवडणूक का होऊ दिली नाही, विरोधकांचे अर्ज बाद का करायला लावले? आम्ही मतदानाचा अधिकार न्यायालयीन लढाई लढून कसा मिळवून दिला? हे सांगत मतदारांना आवाहन केले. निलंगेकर यांना आपला पराभव होणार हे समजले होते.
पण जिल्हा बॅंकेचा कारभार कसा डबघाईला आला, त्याला देशमुख कुटुंब कसे जबाबदार आहेत? हे त्यांनी जिल्हा बॅंकेच्या पाच लाख सदस्यांपर्यत पोहचवण्याचे काम केले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरून देशमुखांना विरोध आणि त्यातून आगामी जिल्हा परिषद निवडणूकीच्या सर्व सर्कलमध्ये चाचपणी या निमित्ताने भाजपच्या नेत्यांनी केली. त्यामुळे भाजपने देशमुखांच्या विरोधात आज जे पेरले ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उगवेल, अशी आशा भाजपचे जिल्ह्यातील नेते बाळगून आहेत.
तस पहायला गेले तर भाजपने काही गमावले असे म्हणता येणार नाही. उलट जिल्हा बॅंकेची निवडणूक घ्यायला लावून, प्रचाराच्या निमित्ताने भाजपने काॅंग्रेसच्या कारभाराचे वाभाडे काढले. जिल्हा बॅंकेची सत्ता देशमुखांनी कायम राखली असली, तरी भाजपच्या टोकाच्या विरोधाने आगामी काळात काॅंग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विक्रमी १७५३ रक्तदात्यांचे रक्तदान व सेवा शिबीर संपन्न.

0

ठिकठिकाणच्या रक्तदान शिबीरांत भाजपा कार्यकर्त्या समवेत मित्रपरिवारासह सर्वपक्षीय भाच्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

भाजपचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, वाढदिवसानिमित्त मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शक कार्यपद्धतीला साजेसे उपक्रम राबविण्यात आले ,प्रामुख्याने यामध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरांमध्ये तब्बल १७५३ रक्तदात्यांनी रविवारी रक्तदान केले.* एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करून रक्तदात्यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी रक्तदानाचा हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

देवराव दादा भोंगळे मित्रपरिवार तसेच शासकीय रक्तपेढी अमरावती, अहेरी, चंद्रपूर आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील घुग्घुस, कोरपना, राजुरा, बल्लारपूर, जुनगाव, भद्रावती, चंदनखेडा व वरोरा येथे या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये, सतरा वर्षापासुन अविरत परंपरा चालवणार्‍या घुग्घुस शहरात सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या शिबीराचा शेवट रात्री नऊ वाजता शेवटच्या १०१९ व्या रक्तदात्याकडून झालेल्या रक्तदानाने झाला.

कोरपना येथे १२१, वरोरा येथे १०२, बल्लारपूर येथे ५२, भद्रावती येथे ३७, चंदनखेडा येथे ५१, जुनगाव येथे ७० रक्तदात्यांनी रक्तदान करून कोविड महामारीसारख्या कठीण काळात जो रक्ताचा तुटवडा झाला आहे त्याला आपल्यापरीने भरून काढण्यासाठी योगदान दिले.

राजूऱ्यात विविध पक्षसंघटनांच्या तसेच अराजकीय भाच्यांनी ‘लाडक्या देवराव मामासाठी’ प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले नाही, तर शहराच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्याच्या वाढदिवशी तब्बल ३०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

चंद्रपूर शहरात उपमहापौर राहुल पावडे मित्रपरिवारातर्फे विविध योजनांचा मेळावा तथा आरोग्य तपासणी व एकदिवसीय लसीकरण शिबीर घेण्यात आले, याचा ७१३ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसेच राष्ट्रवादीनगरात सुभाष कासनगोट्टूवार यांच्या पुढाकारातून १११ ई-श्रम कार्डचे वितरण, ७२ बांधकाम कामगारांच्या कार्डचे रीनिवल आणि ७६ नविन मतदारांची नोंदणी करण्यात आली. तसेच इंदिरानगर येथे आकाश मस्के मित्रपरिवाराने ४० उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप केले. तसेच प्रवीण उरकुडे यांचेमार्फत बगड खिडकी परिसरात ४० उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले. यासोबतच लालपेठ परीसरातील शाळकरी मुलांना नोटबुक व पेनचे वाटप मित्रपरिवाराकडुन करण्यात आले.
तसेच भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने बल्लारपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांना भोजनदान तर जि. प. सदस्य राहूल संतोषवार यांनी देवाडा-केमारा जि. प. क्षेत्रात कोरोणा योद्ध्यांचा सत्कार केला. तसेच पं.स. सभापती अल्का आत्राम यांनी घनोटी व गंगापूर येथिल शालेय विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे वाटप केले.

याप्रसंगी जिल्ह्यात ठिकठिकाणी बोलताना, आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्याने जिल्हाभर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यानी व तसेच मित्रपरिवाराने असे महारक्तदानाचे व जनसेवेचे कार्यक्रम राबवून आजचा दिवस सेवामय केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी रक्तदान पार पडले. कार्यकर्त्यांनी माझ्यावरील प्रेमापोटी मेहनत घेतली, माझ्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल मला सदैव तुमच्या ऋणात रहायला आवडेल.

राजूऱ्यामध्ये न भूतो असा रक्तदानाचा कार्यक्रम माझ्या सर्वपक्षीय भाच्यांनी घेतलाच नव्हे तर मोठ्या संख्येने रक्तदात्यांना त्यात सहभागी होत यशस्वी केला. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि आपणा सर्वांचे प्रेम, सहकार्य आणि साथ माझ्याबरोबर सदैव राहो अशीच प्रार्थना ईश्वरापाशी करतो. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.

यावल येथे ३३३ मतदारांपैकी २९५ मतदात्यांनी आपले हक्क बजावले आहेत. यावेळी ८८.५८ टक्के मतदान मतदारांनी केले आहे.

0

 

यावल,( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी यावल येथे ३३३ मतदारांपैकी २९५ मतदात्यांनी आपले हक्क बजावले आहेत. यावेळी ८८.५८ टक्के मतदान मतदारांनी केले आहे.

यावलात विविध विकास सोसायटी मतदार संघाचे ४८ मतदारांपैकी ४८ मतदारांनी तर इतर संस्थाच्या मतदार संघा मधील एकुण २८८ मतदारांपैकी २४७ अश्या दोन्ही संस्था मतदार संघाच्या ३३३ मतदारांपैकी २९५ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावल येथील जिल्हा परिषदच्या ऊर्दू शाळेच्या मतदान प्रक्रिया राबविली गेली. केंद्रावर जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर उमेदवार, गुलाबराव देवकर , विद्यमान संचालक गणेश गिरधर नेहेते , रवींद्र पाटील , विद्यमान संचालक विनोदकुमार पाटील या मतदारांनी भेटी दिल्या. तसेच मतदान शांततेत पार पडले. या मतदानाव्दारे सहा उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर उमेदवारासह विविध पक्षाचे पदधिकारी हे उपस्थित होते. दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी होईल असी अशा व्यक्त केली आहेत.

राष्ट्रीय महामार्ग ते जुने घाटसावलि पांदन रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

0

 

घाटसावलि :-  महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्याकरिता महाराजस्व अभियाना अंतर्गत प्रत्येक गाव शिवारातील पांदन रस्त्याचे लोकसहभागातून मातीकरण करणे ,पांधन रस्ते अतिक्रमणमुक्त करणे चा उपक्रम जिल्हाधिकारी वर्धा यांचे मार्गदर्शनात हिंगणघाट तालुक्यात राबविल्या जात आहे याच उपक्रमात हिंगणघाट उपविभागीय अधिकारी श्रीमती शिल्पा सोनाले यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग ते जुनी घाटसावलि पांधन चे मातीकरण व अतिक्रमणमुक्त करण्याकरिता भूमिपूजन करण्यात आले.
अन गावकऱ्यांच्या पांधन बाबतच्या समस्या जाणून घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले दलदलीचा रस्त्याने दोन किलोमीटर पायदळ जाऊन स्वतः पाहणी करून महसूल अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले .
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय घाट सावली चे सभागृहात उपविभागीय अधिकारी यांनी महाराजस्व अभियानाअंतर्गत महसूल विभाग कडून राबविण्यात येणाऱ्या फेरफार अदालत व इतर उपक्रमाची सविस्तर माहिती गावकऱ्यांना दिली. या भूमिपूजन कार्यक्रमात श्री समशेर पठाण नायब तहसीलदार हिंगणघाट, संजय भोंग मंडळ अधिकारी अल्लीपूर, दीपक अंधारे तलाठी कुटकी, सौ निलीमा डेहने सरपंच , ग्रामपंचायत सचिव हिवज, गजानन डेहणे ,रवी उमक ,माजी सरपंच गाढवे यासह मोठ्या प्रमाणात गावकरी हजर होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची जळगाव जामोद तालुका कार्यकारणी गठीत…

0

 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद येथील आर सी २४ न्युज चँनल च्या हॉल मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्यकारणी गठित करणे याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जळगाव जामोद तालुका अध्यक्ष पद नियुक्ती करण्यासाठी पत्रकार संघाचे अभिमन्यू भगत महाराष्ट्र राज्य सचिव व मंगेश राजनकार महाराष्ट्र राज्य कार्यालय संपर्कप्रमुख यांना जबाबदारी दिली होती त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची जळगाव जामोद तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली त्यामध्ये जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी गणेश भड यांची नियुक्ती करण्यात आली तर सचिव म्हणून अनिल भगत यांची नियुक्ती करण्यात आली यांच्यासह तालुका संघटक पदी अमर तायडे तर जळगाव जामोद तालुका सहसंपर्क प्रमुख पदी अमोल भगत यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी बैठकीला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र सचिव अभिमन्यू भगत, महाराष्ट्र राज्य कार्यालय संपर्कप्रमुख मंगेश राजनकार,आर सी२४ न्युजचे संपादक राजेश बाठे,प्रविण टाकळकर, गणेश भड,अमोल भगत, अमर तायडे, यशवंत झुंझारे,अनिल भगत,गौरव वानखडे न्युज२४ सातपुडा चे तंत्र निर्देशक यावेळी उपस्थित होते. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले. व संघटनेचे कार्य अविरत सुरू राहील अशी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी ग्वाही दिली.

निलंबनाचा धसका एसटी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू

0

 

डी एस पिंगळे निलंगा प्रतिनिधी

राज्यात गेल्या २० दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. असे असतानाच निलंग्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. निलंगा एसटी आगारातील कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
निलंगा आगारातील तांत्रिक कर्मचारी शिरापुरे शिवकुमार (वय ३२ रा.देवणी ता. निलंगा) असे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे. राज्य सरकार वारंवार विनंती करुन देखील राज्यातील एसटी कर्मचारी संप मागे घेतला जात नसल्याने अखेर सरकारकडुन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. राज्यात अनेक कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. आपल्यावरही कारवाई होईल अशी भीती शिवकुमार शिरापुरे यांना वाटत होते. कारवाईच्या भीतीमुळे ते तणावात होते. अति तणावामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला यातच त्यांचा मृत्यू झाला.
राज्य परिवहन महामंडळाचे सरकारमध्ये विलिनीकरण करावे, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत क दर्जा द्यावा, महागाई भत्त्यामध्ये वाढ करावी, अशा विविध मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. मात्र जोपर्यंत एसटीचे विलनिकरण होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत अनेकांचे निलंबन देखील करण्यात आले आहे.

बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

0

 

यावल ,(प्रतिनिधी) विकी वानखेडे

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील साकळी येथील रहिवासी व मुळ मध्य प्रदेशात राहणाऱ्या आदिवासी मजूर कुटुंबियातील बारा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला (रा. वराडसीम, ता. भुसावळ) अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पिडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान फिर्यादीत माझी बारा वर्षीय अल्पवयीन बहीण तिच्या बहिणी सोबत शेतात गेलेली असताना. त्याठिकाणी सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला याने माझ्या बहिणीस शेतात ओढत कपाशीच्या शेतात नेऊन विनयभंग केला. याप्रकरणी पिडीतेच्या भावाने पोलिस स्थानकात सखाराम उर्फ अक्रम भिलाला यांच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला सखाराम भिलाला यास अटक केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

गुरुनानक देवजी  के प्रकाश पर्व के उपलक्ष में गुरुद्वारा सिंघ साहेब कमिटी की ओरसे 552 वी जयंती  पर  तलेगांव गुरुद्वारा में  नगर कीर्तन ,मनाया गया 

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक)

महाराष्ट्र का वर्धा जिला के तलेगांव जहां पर सिख धर्म के पहिले गुरु नानक देवजी के जयंती पर तलेगांव के गुरुद्वारा में 552 जयंती पर लाखों सिख ने गुरुद्वारा को जगमग लाइट से सजाया ओर फटाके की आतिशबाजी की ,नगर कीर्तन में  सभी प्रकार , से फूलो की बारिश की गई है इसी तरह गुरुनानक देवजी की लंगर ओर गुरुबानी से सभी तलेगांव के सिख इक्क्ठा होकर शांति पूर्वक ये नगर कीर्तन में सभी गावो से सिख समुदाय एकजुट होकर बड़े धूमधाम से नगर कीर्तन क्या है और लंगर का आयोजन मनाया है इस गुरु नानक देवजी की अवसपर पर विधायक दादाराव केचे पूर्व विधायक अमर काळे, अंसारभाई आर्वी, राठी, सरपंच खंडारे , जिल्हा सदस्य अंकिता होल, पति सचिन होले , तलेगांव पत्रकार सभी ने मत्था टेककर उपस्तिति रहे.

गुरूद्दारा कमिटी का कहना है कि गुरुनानक देवजी सभी धर्म के लोगो को साथ मे लेके चलते थे लेकिन गुरुनानक देवजी ने कभी भी एक दूसरे धर्म से जात भेद नही करते थे इसलिये गुरुनानक देवजी का संदेश  देने के काम किया करते थे इसलिये आज तलेगांव में लाखों सिख समुदाय के जरिये गुरुनानक देवजी के 552 वी जयंती बडी धूमधाम से मनाई है

घुग्घुस वाहतूक पोलिस कौतुकास्पद काम

0

 

(चंद्रपूर घुग्घुस प्रतिनिधी)
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील राजीव रतनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर जाम झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी संध्याकाळी कोळसा मालगाडी गेल्यानंतर रेल्वे फाटक बंद झाले, जे सुमारे 30 मिनिटे बंद होते. यादरम्यान रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूचे फाटक बंद केल्याने लोक जाममध्ये अडकले होते.

रेल्वे क्रॉसिंग ही लोकांची डोकेदुखी बनली आहे. घुग्घुस रेल्वे साईडिंगवरून दररोज 40 हून अधिक कोळसा रेल गाड्यांची येन-जाना होत असते रेल्वे फाटक बंद असल्याने वाहतूक ठप्प होतो. दर तासाला 10 ते 15 मिनिटे फाटक बंद असल्याने गाड्यांच्या पासिंगमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात हि परिस्थिती आहे.

गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मालगाडीसाठी रेल्वे फाटक बंद करण्यात आले. ट्रेन गेल्यानंतर बराच वेळ होऊनही फाटक उघडता आले नाही. रेल्वे फाटकात बसवण्यात आलेला पाईप खराब झाल्याने जवळपास 30 मिनिटे ते बंदच राहिले दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तीन वाहतूक पोलीस हवालदार विनोद लोखंडे, पोलिस नाईक गजानन झाडे, पोलीस अमलदार माणिकचंद चौधरी यांनी पुढाकार घेऊन रेल्वे फाटकाची तात्पुरती व्यवस्था केली, रेल्वे फाटकात बसवलेले लोखंडी पाईप खराब झाल्याने बराच वेळ लागले. वाहने सुरळीत चालावीत यासाठी प्रयत्न करत वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सांभाळून आपली जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत आहे.