Home Blog Page 454

यावल नगर परिषदच्या माध्यमातुन तिन कोटी निधीतुन उभारण्यात येत असलेल्या नवीन १०० एमएलडी जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम अंतीम टप्यात : अतुल पाटील

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगर परिषद व्दारे शहराला स्वच्छ योग्य व मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीकोणातुन १४ व्या वित्तीय आयोगाच्या सुमारे २ कोटी८७ लाख रुपये निधी खर्चातुन नवीन जल साठवण तलावाचे काम अंतीम टप्यात आले असुन ,या नव्या साठवण तलावामुळे शहरातील ६० हजार लोकवस्तीतील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली . यावल शहरापासुन सुमारे दोन किलो मिटरच्या लांबीवर असलेल्या जुन्या पाणी साठवण तलावाच्या बाजुस २०० मिटर लांबी आणी५० मिटर रुंद्धी व११ मिटर उंचीचे १ooएमएलडी जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम जवळपास अंतीम टप्यात आले असुन , यामुळे ३०० एमएलडी क्षमतेच्या जुन्या साठवण तलाव आणी १०० एमएलडी क्षमतेचे नवीन उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाचे काम साधारण मागील तिन महीन्यापुर्वी सुरू करण्यात आले होते आता हे काम ९० टक्के पुर्ण झाले असुन , शहराला सद्य परिस्थितीला जुन्या साठवण तलावातुन शहराला ४५ दिवस पाणी पुरवठा करता येईल ईतकाच जलसाठा उपलब्ध रहात आहे यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नापासुन आता यावलच्या नागरीकांची सुटका होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना अतुल पाटील यांनी दिली . जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरातील नगर परिषदेतील होणाऱ्या पाण्याच्या संकटात असतांना यावल शहरातील नगर परिषद हे नागरीकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणारी एकमेव नगर परिषद असल्याची माहीती त्यांनी यावेळी पाटील यांनी दिली . यावेळी अतुल पाटील यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते , नगरसेवक समिर शेख ,यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते गणेश महाजन , डॉ . युवराज चौधरी , दिलीप वाणी , राजु फालक , गिरीष महाजन , एजाज देशमुख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होती .

शिवकल्याण मराठा बिग्रेड व मराठा समाज तर्फे नानाजी पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि. 8.6.21
मराठा समाजाला आरक्षण व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे शर्थीचे प्रयत्न करावे तसेच हिंगणघाट शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व उद्यान आहे तसेच या नावाने खूप मोठे उद्यान हिंगणघाट शहरात आहे परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छेडखानी गांजा दारू पिणे तसेच मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असतात याबाबत नगरपरिषद प्रशासनास वारंवार विनंती करून सुद्धा कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही त्यामुळे आपणास विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज उद्यान याचे सौंदर्यीकरण व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गस्त मिळण्या बाबत आपणास याद्वारे विनंती करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज या उद्या या उद्यानाचे सौंदर्यीकरण मागील पाच वर्षापासून झालेले नाही त्यामुळे या उद्यानासाठी भरीव निधी देण्यात यावा तसेच या उद्यानामध्ये डाव्या बाजूला खुल्या जागेवर समाज भवन व सामाजिक कार्यक्रम व इतर समारोहा साठी निधी मंजूर करावा संबंधित निवेदन देताना अक्षय निकम (मराठा बीग्रेड अध्यक्ष ), अमित गावंडे, अक्षय भांडवलकर, प्रवीणभाऊ काळे, अक्षय गायकवाड, अभिजीत शिंगारे, आदित्य पालांडे व समाज बांधव उपस्थित होते

हात मदतीचा” सामाजिक बांधिलकी जपणारा व नवप्रेरणा देणारा आदर्श उपक्रम-नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांचे प्रतिपादन

0

 

अजहर पठाण सेलू/

“केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहीजे” या उक्तीप्रमाणे समाजाशी घट्ट नाळ जोडणारा व समाजाला नव प्रेरणा देणारा उपक्रम म्हणजे हात मदतीचा असे गौरवोद्गार नायब तहसीलदार आदरणीय प्रशांत थारकर यांनी संयोजक सुनील गायकवाड आयोजित हात मदतीचा या कार्यक्रमात केले.
कोविडमुळे ग्रस्त अशा २१ महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात जीवनावश्यक अन्नधान्य किटचे या वेळी वाटप करण्यात आले.तसेच १०१ महिलांना वाटप करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील छत्रपती शिवाजी नगरात आयोजित या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूद,तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर, विशेष उपस्थिती निर्मलाताई लिपणे,तलाठी मुकूंद आष्टीकर,ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे,रमेश दौड,प्रशांत ठाकूर, लक्ष्मण दोड , मोहन समुद्रे,वसंत शेरे,विनोद शेरे,शेख साजिद बाबासाहेब लिपणे , कुमार महाजन, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना थारकर साहेब म्हणाले की कोविडच्या या भिषण परिस्थिती मध्ये एक हात मदतीचा देवून खर्या अर्थाने आपण समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.

प्रास्ताविकात सुनील गायकवाड यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगितला.ते म्हणाले की आपणा सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे.या भिषण परिस्थिती मध्ये देखील नियती कोपली पण माणुसकी जिवंत आहे हे ब्रीद मनाशी घट्ट करून या वर्षीचा हा उपक्रम केला आहे.यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे यांनी सुनील गायकवाड यांचे कौतुक आपल्या शैलीत केले.

अध्यक्षीय समारोप करतांना शेख मेहमूद यांनी या सामाजिक उपक्रमाचा एक भाग होता आले या बद्दल समाधान व्यक्त करत असेच उपक्रम राबविले जावेत असा आग्रह व्यक्त केला.
यशस्वितेसाठी मदन मानमोडे गजानन बागल शुकाचार्य शिंदे अभिजीत गायकवाड दत्तराव किरळकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले.

यावल तालुक्यातील बोराळे चुंचाळे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस विज पडून बैल जोडी जागीच ठार.

0

 

यावल तालुका ,(प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुचाळे बोराळे : सोमवारी सायंकाळी यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात मध्ये पाऊस झाला यात चुंचाळे -बोराडे व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दोनतास तुफान वेगात सऱ्या बरसल्या तर बोराडे गावात वीज पडून सुरेश प्रल्हाद धनगर यांची बैल जोडी ठार झाली. एक लाख २० हजार रूपये किंमतीची सदरील बैल जोडी होती तर या घटनेत प्रत्यक्षदर्शी विनोद(महाराज) वानखेडे हे थोडक्यात बचावले तसेच चुंचाळे या गावात पुराचे पाणी प्रचंड वेगाने येत असतांना संजयसिंग राजपूत व रमेश पितांबर धनगर चुंचाळे या दोघांच्या दुचाकी पुरात वाहून गेल्या तसेच गायरान व चुंचाळे प्लॉट भागातील २०० हून अधिक घरात पाणी शिरले आहे.गायरान, चुंचाळे व बोराळे या गावांचा एकमेकाशी संपर्क हा रात्री उशिरापर्यंत तुटलेला होता पाऊस थांबल्यामुळे नागरिकांमध्ये थोडा दिलासा आहे.—

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास पस्ताव पारीत.

0

 

यावल ,(प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सोमवारी पारीत झाला. ग्रामपंचायत कार्यालयात तहसिलदार यांनी घेतलेल्या विशेष सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सहित नऊ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजुने मतदान करीत ९ विरूध्द एक असा प्रस्ताव पारित झाला.
चुंचाळे ता. यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या. तर गेल्या काही महिन्यापासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाहीये म्हणून ३१ मे रोजी येथील तहसील कार्यालयात त्यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता तेव्हा या प्रस्तावावर सोमवारी तहसिलदार महेश पवार साहेब यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीत सायंकाळी ४ वाजेला विशेष सभा घेण्यात आली या सभेत सरपंच यांच्या विरूध्द उपसरपंच नाजिमा अन्वदर तडवी सह सुकलाल यशवंत पाटील, अनिल पंडीत कोळी, अरमान मनवर तडवी, दगडू किताब तडवी, शारदा सुधाकर चौधरी, नवशाद सायबु तडवी, जयनूर संजय तडवी, व सिंधुबाई संजय पाटील यांनी मतदान केले व ९ विरूध्द एक असा अविश्वास प्रस्ताप पारीत झाला आहे.-पुर्ण—फोटो आहे

मोदी सरकार च्या डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मुंडन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ह्यांच्या सूचने नुसार जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ७/०६/२०२१, सोमवार रोजी, सकाळी 11 वाजता संपूर्ण राज्यात एकाच वेळी होत असलेल्या डिझेल,पेट्रोल व गॅस दरवाढ निषेध आंदोलनात जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीने सहभाग नोंदवला. जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटी आयोजित डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढ विरोधात पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी एकत्र येत स्थानिक मुंदडा पेट्रोल पंप येथे नगर सेवक श्रीकृष्ण केदार व शेतकरी समाधान नानकदे यांनी प्रथम केंद्र सरकारच्या विरोधात मुंडन करून व पेट्रोल व डिझेल ग्राहकांना गुलाबाची फुले व पेढा भरवत त्यांना अच्छे दिन ची आठवण देत जनता सहन करत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत केंद्रातील भाजपा सरकार चा जाहीर निषेध व्यक्त केला. यापुढे पक्ष आदेशानुसार तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून त्रासलेल्या जनतेला न्याय देण्याचे काम काँग्रेस चे पदाधिकारी करतील असा निर्धार करण्यात आला.
यावेळी पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर,तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर,शहर अध्यक्ष अर्जुन घोलप,बु जि काँग्रेस सरचिटणीस अमर पाचपोर,तालुका उपाध्यक्ष प्रमोद पाटील, शुभमभाऊ पाटील,नगर सेवक श्रीकृष्ण केदार, ऍड संदीप मानकर,nsui तालुका अध्यक्ष गोपाल कोथळकर,गौरव इंगळे,जामोद ग्रामपंचायत सदस्य वसंत धुर्डे,किसना दामधर,प्रविण भोपळे,युवक तालुका अध्यक्ष निशिकांत देशमुख,युवक शहर अध्यक्ष राजीक भाई, दादाराव धंदर, दिपक बंबटकार,महेंद्र बोडखे ,धनंजय बंबटकर,अनिल इंगळे,योगेश घोपे,ज्ञानेश वानखडे, संकेत रहाटे
यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी पार पडले.

मुख्यधिकारी यांना निवेदन व्यवसाय प्रतिष्ठान का कडून नागरिक व ग्राहकांनसाठी प्राथमिक सुविधा नाही चौकशी करून कारवाईची मागणी !

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि. 7.6.21
व्यवसायिक प्रतिष्ठानाला पार्किंग,शौचालय,मुतारी तसेच सुरक्षा रक्षकाची व्यवस्था नसतांना नगरपालिका या व्यावसायिक प्रतिष्ठानांना व्यवसाय करण्याची परवानगी देतेच कशी? असा प्रश्न शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन वाघे यांनी केला असून या संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठानांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली.
संबंधित प्रकरणी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती घेतली असता , माहितीमध्ये हिंगणघाट नागरी जागरण समिती अध्यक्ष सदाशिवराव राऊत तसेच एका नगरसेविकेने नगरपालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहनांसाठी पार्किंग नसल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याबद्दलचे तक्रार दिली होती यावरून मुख्याधिकारी यांनी हिंगणघाट शहरातील बँका ,मंगल कार्यालये,शॉपिंग कॉम्प्लेक्स, दवाखाने मुख्य रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याबद्दल व्यवसाय धारकास नोटीसीसुद्धा निर्गमित केल्या.
परंतु समस्या जैसे थे दिसुन येत आहे.
कोणत्याही व्यवसायिक प्रतिष्ठानास व्यवसाय सुरु करतांना पालिकेकडून ‘ना- हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते,परंतु पालिकेतील संबंधित अधिकारी कोणतीही मोकाचौकशी न करता ना-हरकत प्रमाणपत्र देते.
हिंगणघाट नगरपालिकेत अधिकारी यांना व्यवसाय धारकाने दिलेली कागदपत्रे नियमानुसार नसली तरी ना हरकत प्रमाणपत्र मिळतेच कसे?
हिंगणघाट शहरात व्यवसाय धारकाकडून पार्किंग बद्दलची कागदपत्रे दिली जातात त्यामध्ये जागेवर प्रत्यक्षात पार्किंग अस्तित्वातच नसते,
काही ठिकाणी कागदावरच पार्किंग दाखविल्या जाते परंतु प्रत्यक्षात जागेवर पार्किंगच्या जागेचा पत्ताच नसतो तसेच महत्वाचे म्हणजे यासंबंधी कुणी तक्रार केली तरी कारवाई होत नाही . तक्रार आल्यावर काही वेळेस मुख्याधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या अर्जानुसार व्यवसाय धारकास कारवाईचे पत्र दिले. मोक्यावर नागरिक व ग्राहकांकरिता मुतारी ,शौचालय , पार्किंग , सिक्युरिटी गार्ड नसल्याचे नमूद करीत नोटिस दिली, यात संबंधित प्रतिष्ठानावर कारवाई करण्याची तंबी दिल्या गेली.
संबंधित पुरावे असतानासुद्धा कारवाई होत नाही.कारण अशावेळी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हेच मदतीला धावून जातात,वेळप्रसंगी अशाप्रकारे कारवाई करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना खोट्यानाट्या आरोपावरून बदली किंवा वरिष्ठच्या चौकाशिला बळी जावे लागते.
वास्तविक पहाता शहरातील नागरिकांना विना अडथळा रस्ते,बँका किंवा अन्य व्यवसायिक प्रतिष्ठानामधे होत असलेली असुविधा याविषयी लोकप्रतिनिधिनेच आवाज उठवायचा आहे.परंतु होणाऱ्या असुविधांकड़े लक्ष देणारा जनतेचा कुणी वालीच नसल्याचे दिसुन येत आहे.
कुंपनच शेत खात असल्याने हा प्रकार असाच पुढे चालणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांस पडला आहे.

यावल चोपडा मार्गावर रात्री साईकृपा ढाब्याजवळ डंपर आणी अॅपेरिक्शाचे भिषण अपघात रिवशाचालक गंभीर डंपर चालक मात्र फरार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

येथील यावल चोपडा मार्गावर एका वाळुने भरलेल्या डंपर आणी ऑटोरिक्शाच्या झालेल्या अपघातात जखमी एक अनओळखी रिक्शाचालकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत असुन , पोलीसांचा ताफा रात्री १२ , ३० वाजता घटनास्थळी होते . या भिषण अपघातानंतर रोडाच्या बाजुस असलेल्या एका शेतात हा डंपर मोठया वेगाने घुसला असुन ,जेसीबी द्वारे त्या डंपरला काढण्यात आले आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार यावल शहरापासुन अवघ्या दोन किलोमिटर लांब चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे साईकृपा ढाब्या ढाब्याच्या काही अंतरावर दिनांक ६ जुन रोजी रात्री ११, २० वाजेच्या सुमारास चोपड्याकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी डंपर क्रमांक एमएच १९ , ३४२६या वाहनाने यावल हुन किनगावकडे जाणाऱ्या अॅपेरिक्शा क्रमांक एमएच १९ एके ६४९३या वाहनास दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातात अज्ञात अॅपे रिक्शाचालक हा गंभीररित्या जख्मी झाल्याचे दिसुन आले तर या अपघातात दुसऱ्याही व्यक्ती असल्याची माहीती मिळाल्याने पोलीसांनी त्या ठीकाणी शोध घेतले असता दुसरी व्यक्ति त्या अपघातस्थळी मिळुन आली नाही . यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस पाठविले व जेसीबी यंत्रणेच्या सहाय्याने अपघातास कारणीभुत डंपरला बाहेर काढले असुन याबाबत घटनेतील अपघातास कारणीभुत डंपर वाहनचालक हा फरार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली असुन , अपघात स्थळावरून काही तरुणांच्या मदतीने जख्मी रिक्शा चालकास उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्रथम औषध उपचार केल्यावर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले अहे . दरम्यान प्राथमिक चौकशीच्या आधारावर अपघातातील रिक्शाचालक हा रावेर तालुक्यातील असल्याचे कळते .

किनगाव बु येथे विहीरीतील पाण्यात मिळाले अन ओळखी तरुणाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील किनगाव बु गाव शिवारातील एका विहीरीत ३५ वर्ष वयाच्या तरूणाचा मिळाला मृतदेह परिसरात एकच खळबळ पोलीसांनी केला पंचनामा व केले ओळख पटाविण्याचे आवाहन . या संदर्भात पोलीस सुत्रांकड्डन मिळालेल्या माहितीनुसार किनगाव बु येथील पोलीस पाटील रेखा नायदे यांनी पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांना कळविले कि किनगाव शिवारातील लीलाधर खंबायत यांच्या खोलपाण्याच्या विहीरीत ३oते ३५ वर्ष वयोगटाच्या एका अनओळखी तरुणाचे अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आले असुन मयताच्या मृतदेहातुन दुर्गंधी येत असल्याचे माहीती ग्रामस्थांकडुन मिळाल्याने सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे आपल्या सहकारी पोलीस हेड कॉन्सटेबल सुनिल तायडे आणी पोलीस हेड कॉन्सटेबल विजय परदेशी यांच्यासह घटनास्थळी जावुन मोठया प्रयत्नांनी कुजलेले व अत्यंत दुर्गंधी येत असलेले प्रेत विहीरीतुन नागरीकांच्या मदतीने बाहेर काढल्यानंतर त्या अनओळखी व्यक्तिच्या मृतदेहाचे पंचनामा व जागेवरच यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ . शुभम तिडके व बापु महाजन यांच्याकडुन शवविच्छेदन करण्यात आलीत, दरम्यान याबाबतची पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहीतीनुसार सदरच्या या तरूणाचा मृत्यु साधारण १५ते २० दिवसापुर्वी या विहीरीत पडल्याने झाला असुन , सदर मयत इसम हा हिन्दु जातीचा असुन त्याचे व३०ते ३५च्या आत असावे अशा वर्णनाचे व्याक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे .

वाढती महागाई हे केंद्र सरकारचे अपयश- आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोल १०० रुपये लिटर चा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा गॅस ९०० रु. झाला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली असून त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. वाढत्या महागाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशान्वये मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक गणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस च्या किमतीत झालेल्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.केंद्र शासनाविरुद्ध घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यां नी परिसर दणाणून सोडला.वाढती महागाई हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी प्रतिकिया यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी दिली. महागाई आटोक्यात आणली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकार विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.गौरव पाटील, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया च्या राज्य सचिव सौ.सुनीताताई देशमुख, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.बंटी पाटील,उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील, नांदुरा शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.श्रद्धाताई गावंडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.आकाश वतपाळ, श्री.शंकर बोदडे श्री. शुभम लांडे, श्री. राजेंद्र चाभारे,श्री. सोपान वक्ते,श्री.सोपान गावंडे,श्री.महेंद्र देशमुख, श्री.संतोष घोराडे, श्री.गोपाळ भोकरे, श्री.भास्कर वाकोडे, श्री.अनिल देशमुख, श्री.शशिकांत गव्हाड,श्री.शालीग्राम तांगडे व काँग्रेस, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.