Home Blog Page 524

पेठगावच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल तथागत युवा प्रतिष्ठानच्या वतिने सत्कार !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

दि: 23/02/21 रोजी
तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका, सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन वाळवा तालुका सांगली जिल्हा येथे मा.चंद्रकांत पवार साहेब यांची पेठ गावच्या उपसरपंच पदी निवड झालेबद्दल त्यांचे तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने वाळवा तालुका अध्यक्ष मा. अनिकेत (भाऊ ) पवार यांनी अभिनंदन केले.
येथील फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पेठ तालुका वाळवा येथील मा. चंद्रकांत पवार यांची पेठ गावच्या उपसरपंच पदी निवड झालेबद्दल त्यांचे वाळवा तालुका तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन वाळवा तालुका अध्यक्ष अनिकेत पवार यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

यावेळी उपस्थित मान्यवर :विशाल भाऊ कुर्णे, जयकुमार कांबळे, रविराज आढाव, अजय गायकवाड, सुशांत कांबळे, सागर आढाव, आणि इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असलेले साखरखेर्डा येथील शवविच्छेदन केंद्र 15 वर्षापासून धूळखात !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील शवविच्छेदन केंद्र डॉक्टरांच्या व साहित्याच्या अभावी गेल्या पंधरा वर्षांपासून धूळ खात पडलेले आहे,साखरखेरडा हे सर्वात मोठे गाव असल्यामुळे परिसरातील ५२ खेडे या गावची जोडलेले आहेत,साखरखेर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ‘अनेक लोक उपचारासाठी साखरखेर्डा येथे दवाखान्यामध्ये येत असतात .परंतु एखांदा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करावयाचे असल्यास सिंदखेड राजा येथे न्यावे लागते .त्यामुळे नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो व आर्थिक भुर्दंड पडतो,कारण साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे ७० किलोमीटर अंतर असून,लवकर नंबर लागत नसल्यामुळे तासन तास सिंदखेडराजा येथे शवविच्छेदन केंद्रावर ताटकळत बसावे लागते,कधी तर शवविच्छेदन केंद्रावर नातेवाईकाचे व डॉक्टरचे वाद सुद्धा झालेले आहे,व वादाचे रूपांतर मारहाणीत सुद्धा झालेली आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो,म्हणून शवविच्छेदन करताना प्रेताची विटंबना झाल्या सारखीच आहे ‘म्हणून साखरखेर्डा येथील गेल्या पंधरा वर्षापासून शवविच्छेदन केंद्राची इमारत धूळखात पडलेली आहे,शवविच्छेदन केंद्राची इमारत बांधून पूर्ण तयार आहे परंतु डॉक्टर व साहित्याच्या अभावी अजूनही शवविच्छेदन केंद्र सुरू झालेले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, सिंखेडराजा मतदारसंघाचे आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या घटनेकडे लक्ष देऊन शवविच्छेदन सुरू करावे अशी मागणी नागरिकानी केली आहे,त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळेल, — – – -(गेल्या पंधरा वर्षापासून शवविच्छेदन केंद्र सुरू झाले नसून हे केंद्र सुरू झाली तर परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळेल व वादविवाद होणार नाहीत हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू – – -राजू ठोके माजी पंचायत समिती सभापती साखरखेर्डा )

– …हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आपण पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत . – …सय्यद रफिक ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार साखरखेर्डा ‘

नांदुरा येथील तहसील कार्यालयाची ईमारत बांधकामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान-आमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नांना यश.

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून नांदुरा येथे तहसील ईमारत बांधकामस महसूल विभागाच्या दिनांक १७ फ्रेब्रू.२०२१
रोजीच्या शासन निर्णय निर्णयान्वये
( रु.८,०९,८९,२९) प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यासोबतच तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासस्थान बांधकामासाठी देखील रु.२,४८,०८,३९१ निधी उपलब्ध झाला आहे.तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा शहरातील तहसील कार्यालयाच्या ईमारतीमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कामासाठी यावे लागते त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने सध्या कार्यान्वित असलेले तहसील कार्यालयाची ईमारत ही अपूर्ण,सोइ सुविधाचा अभाव असणारी होती. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विशेषता महिला कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये त्यांना कार्यालयात बसण्यासाठी मुबलक जागा असावी. त्याच प्रमाणे तहसील कार्यालय येणाऱ्या तालुक्यातील अभ्यंगतांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार श्री. राजेश एकडे यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री.बाळासाहेबजी थोरात यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सदर तहसील कार्यालयाची ईमारत व तहसीलदार,नायब तहसीलदार यांची निवासस्थान यांना प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे.
मतदार संघातील विकास कामे जसे मोठी रस्ते व पूल, अंतर्गत रस्ते,शेत रस्ते,जलसंधारणाची कामे,नांदुरा एम.आय.डी.सी.
साठी पाठपुरावा ईत्यादी बाबत सुक्ष्म नियोजन करुन, नियोजनबद्ध पद्धतीने एक-एक विकास काम मार्गी लागत असल्याने जनमानसात व मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरबीड येथील सचिन वाईन बार मध्ये चोरी 

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोना च्या वाढता प्रादुर्भाव बघता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत नियम व अटी घालून दिल्याप्रमाणे लॉक डाऊन सुरू आहे ‘ कोरोना ची संख्या वाढली तर परत पहिल्यासारखे कडक लॉक डाऊन होईल ‘या भीतीपोटी चोरीचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसून येत आहे .तालुक्यातील दुसरबीड येथील मुंबई – नागपूर या हायवेवर असलेल्या सचिन वाईन बार मध्ये अज्ञात चोरट्यांनी 23 फेब्रुवारी च्या मध्यरात्री 2 वाजता चोरी करून काही विदेशी दारू व १५७३० असा एकूण ३० ते ३५हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला,अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेली सचिन वाईन बार होती ‘दुसरबीड मधील सतत चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .सचिन बारचे मालक संदीप देसाई यांनी किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली . व तक्रार दाखल होताच ‘किनगाव राजा चे पीएसआय माळी साहेब व दुसरबीड बीड बीट जमदार चाटे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल बारगजे यांनी घटनास्थळी घटनेचा जाऊन पंचनामा केला ‘गावांमध्ये होणारे चोऱ्या याला आळा घालण्यात यावी अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली आहे . ‘

विजवितरण कंपनीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0

 

देवरी-शैलेश राजनकर

देवरी २३: चिचगड पासुन १२ कि अंतरावर पलसगाव येथिल ओमप्रकाश हरिभाऊ वाढई वय ४२ या व्यक्तिने काल दि.२२-२-२०२१ ला घरीच छताला दोर बाधुंन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मागे १मुलगी व १मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे.

विद्युत विभागाचे चक्करा मारुन सदर व्यक्ति कंटाळला होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. १५ एकर जमिनीवर त्याने रब्बी लावली होती तसेच विद्युत पोलसाठी डिमांड भरला होता तो त्या साठी रोज देवरी ला येत जात होता आणि विद्युत विभागातिल अधिकारी त्याला वारंवार फिरवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रबी पिकाची पाण्याविणा परिस्थिति खालावत गेल्यांने त्याने ही टोकाची भुमिका घेतली असे मृत व्यक्तिचे मोठे भाऊ खेमराज वाढई यांनी सांगितले.

सदर घटनेची सखोल चौकसी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणीकुटुंबीयांनी केली आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार होरे आणि पो.ना विजय सलामे करित आहेत.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथील प्रतिष्ठाने कडकडीत बंद . ।

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढता कोरूना चा उद्रेक बघता जिल्हाधिकारी यांनी 21 फेब्रुवारी पासून शहरी व ग्रामीण भागामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत काही प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही नियम व अटी घालून लॉकडाऊन ची घोषणा केली आहे ‘दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे ।या पार्श्वभूमीवर सिनखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले साखरखेर्डा येथे पाच वाजेपासून दुकानदार व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने नियोजित वेळेच्या आत बंद करून प्रशासनाला सहकार्य केले आहे ।साखरखेर्डा येथील संपूर्ण दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद आहेत ‘तशीही साखरखेर्डा येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे हे आपल्या माध्यमातून जनतेला वेळोवेळी मास्क लावण्याचे आव्हान करीत आहेत .

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी यात्रा यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रद्द !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे या मध्येच शासनाने 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत संचार बंदी व अनेक नियम व अटी घालून दिलेले आहेत ‘वाढता कोरोना चा उद्रेक बघता ‘बुलढाणा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्रासाठी वप्रतिबंधित क्षेत्र वगळून निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत ‘त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदी च्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक राजकीय मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील तसे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेले आहेत ‘आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे ज्या आर्थिक दिनांक 25 मार्च 2021 ते दिनांक 6एप्रिल 2021 पर्यंत चालणारी बुलढाणा जिल्ह्यातील तथा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे सैलानी यात्रा होईल .या सैलानी यात्रेसाठी देशभरातून ६ लाख भाविक भक्त यात्रे मध्ये दाखल होत असतात .परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ‘यात्रेमध्ये गर्दी जमणार या लोकांमुळे कोरोना चा प्रादुर्भाव आणखीन वाढू शकतो ‘म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये ‘जिल्हाधिकारी बुलढाणा मा . एस राममूर्ती यांनी सैलानी यात्रेला स्थगिती दिली आहे ‘

तांदुळवाडी येथील श्रामनेर शिबिर व धम्मपरिषद सोहळा संपन्न…

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तांदुळवाडी, तालुका सिंदखेडराजा येथे दि. ११फेब्रुवारी २०२१ पासून सुरू असलेल्या अंशकालीन श्रामनेर शिबिराचा सांगता समारंभ आणि भव्य बौद्ध धम्म परिषद सोहळा पुज्य भिक्खु संघ आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थित दिनांक २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

या सोहळ्याला उपस्थित असणारे पुज्य भिक्खु प्रा..डॉ.एम सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पुज्य भिक्खु संघ, धम्मपिठावर विराजमान झाल्यानंतर भीमाई महिला बचत गट व मीराबाई महिला बचत गट यांनी पुज्य भिक्खु संघाचे स्वागत केले.
त्याचबरोबर या सोहळ्याला आवरजून उपस्थित असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ सविताताई मुंढे सौ लताताई खरात, उपसभापती पंस सि×राजा वंचित नेते मेजर अनिल दादा खरात शरद ससाने अमोल खरात अॅडव्होकेट प्रदीप सोनकांबळे जयद्रत खरात दिपक सरदार व इत्यादी मान्यवरचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुकर शिंदे सोनोषी वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा यांनी केले
या परिषदेला उपस्थित असलेले पुज्य भिक्खु बोधी पालो महाथेरो , पुज्य भिक्खु प्रा.डॉ.एम.सत्यपाल महाथेरो, धम्म परिषदेचेअध्यक्ष: पुज्य भिक्खु इंदवंस महाथेरो , पुज्य भिक्खू ज्ञान रक्षित थेरो, यांनी आपल्या धम्म देसणेच्या माध्यमातून धम्म सोप्या भाषेत समजावून सांगितला व मानवाच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म हाच विशाल धम्म आहे असे ते म्हणाले सायंकाळी कविसंमेलन भरवुन कवितेतून धमाचेच विचार कविंनी माडले व श्रोत्यांचे मने जिंकली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
आयोजक समिती: प्रकाश खरात,दिलीप खरात,गजानन काळे,दीपक खरात, सीताराम जाधव , सुनील खरात ,विजय काळे, अनिकेत काळे, राजरत्न खरात.यांनी परिश्रम घेतले

विशेष सहकार्य: भींमाई महिला बचत गट व मीराबाई महिला बचत गट तांदुळवाडी.

डोंगर कठोर येथे भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावर मार्गदर्शन

0

 

 

(यावल प्रतिनीधी) विकी वानखेडे

आज दिनांक 23/2/21रोजी डोंगर कठोरा येथे भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गतडोंगर कठोरा उपकेंद्रा चे मेडिकल ऑफिसर डॉ श्री हर्षल चौधरी यांनी कोरोना कोविड 19 हा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत कार्यालयात येथे सर्व सदस्य सरपंच उप सरपंच पोलीस पाटील यांना कोरोना संदर्भात माहिती दिली व कोरोनाचे लक्षण कसे ओळखले जातात त्या बद्दल माहिती दिली ते पुढे म्हणाले की मागील कोरोना पेक्षा हा आता वाढता कोरोना खूपच भयंकर आहे त्या साठी आपण आपल्या गावातील ग्रामस्थांची कश्या प्रकारे काळजी घ्यायची आहे ते समजावून सांगितले व सदस्य डॉ श्री आर सी झाबरे यांनी सुद्धा कोरोना पासून कसा बचाव करावा ही माहिती दिली ते पुढे म्हणाले मी माझ्या हॉस्पिटल मध्ये मोफत टेम्परेचर व ऑक्षिमिटर ने सर्व गाव कऱ्यांची मोफत तपासणी करीत आहे ज्यांना काही लक्षण असतील त्यांनी माझ्या हॉस्पिटल ला येऊन मोफत तपासणी करून घ्यावे व तसे काही आढळ्यास पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर ला रेफर करून ट्रीटमेंट करावी व आपली व परिवाराची काळजी घ्यावी व गावातील ग्रामस्थ यांनी मास्क न वापरल्यास प्रत्येकी 50 रुपये दंड वसुल करून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करू असे ते बोलत होते नवनिर्वाचित सदस्य दिलीप तायडे जुम्मा तडवी यांनी सुद्धा कोरोना संदर्भात व गावात कश्या प्रकारे सुरक्षितात राहील या बद्दल माहिती मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले कि आपले गाव आपली जबाबदारी म्हणून ग्रामविकास अधिकारी यांचा सल्ला घेऊन पुढील गावात कोरोना संदर्भात जनजागृती करावी असे सांगितले व बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची बस स्टॉप वर ओक्षिमीटर ने व टेम्परेचर घेऊन च गावात प्रवेश द्यावा व रात्री बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करावी असे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाला सर्व नवनिर्वाचित सरपंच श्री नवाज तडवी, उप सरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी आर सी पवार सदस्य श्री दिलीप तायडे,मनोहर झाबरे, डॉ आर सि झाबरे, जुम्मा तडवी, कल्पना राणे,कल्पना पाटील, शबनम तडवी, शकीला तडवी, हेमलता जावळे, एश्वर्या कोलते, आशा आढाळे, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, क्लर्क प्रदीप पाटील, शिपाई खेमचंद्र पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी सोमा कोल्हे,उपकेंद्राचे कर्मचारी डॉ हर्षल चौधरी, आरोग्य सहाय्यक चेतन कुरकुरे, श्रीमती एल व्ही चौधरी,आदींची उपस्थिती होती

अट्रावलच्या प्रसिद्ध मुंजोबा देवस्थान विश्वस्थातांना कोवीड१९ शासन आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तहसीलदारांनी केले दहा हजार रूपयांचे दंड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

जिल्हयात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरी तालुक्यात सुरू असेलेल लग्न समारंभ, बाजारपेठा यामधे नागरीकांची गर्दी राहत असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा महाराज देवस्थानवर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रौत्सव रद्द असतांनाही सोमवारी (ता.२२) येथे भाविकांची गर्दी ऊसळून कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत तहसीलदार महेश पवार यांनी विश्वस्त समितीकडून दहा हजार दंड वसूल केला.
याशिवाय लग्न समारंभ विविध धार्मिक कार्यक्रमांत उपस्थितीतचे निर्बंध लावण्यात आले असताना देखील गर्दी होत आहे. येथे गंगानगरमध्ये एका विवाह सोहळ्यात आणि माधवनगरात एका जाऊळाच्या समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळुन आल्याने नगर पालिका प्रशासनाकडुन दोघं ठिकाणी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.तसेच शहरात तेरा दुकानदारांकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे एकूण साडे सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.येथे तब्बल साडे सव्वीस हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई करत ३१ जणांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे रुपयाचा दंड वसुल केला आहे. तर गेल्या दोन दिवसात ३० जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे १५ हजाराचा दंड वसुुल केला होता .

जिल्हाधिकारी यांनी जनतेला सुरक्षिततेच्या नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश दिले असले तरी नागरीक मात्र अजुनही गाफील राहत असल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या वतीने पोलीस पाटील, पोलीस व संबधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेवून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कडक कारवाईचे आदेश दिल्याचे तहसीलदार महेश पवार यांनी सांगीतले . त्यानुसार पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून यापुढे नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघा्न केल्यास कडक कारवाइ करण्याचा येईल असा इशारा पो. नि. सुधिर पाटील यांनी दिला आहे.