Home Blog Page 613

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रहारची मागणी- ज्ञानेश्वर घोडके

0

 

ऋषी जुंधारे प्रतिनिधी,वैजापूर

वैजापूर तालुक्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या फळबागा व पिकांचे सरसकट पंचनामा करून मदत करण्याची मागणी तसेच नुकतेच जाहीर केलेल्या कांदा निर्यातबंदी चा फेरविचार करून कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी प्रहरचे वैजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके,गणेश सावंत,विशाल शिंदे आदींच्या शिस्टमंडळाने बुधवारी राज्यमंत्री बच्चु कडू यांची भेट घेत त्यांना याबाबद निवेदन देऊन मागणी केली,त्यावर राज्यमंत्री बच्चु कडू यांनी तात्काळ दखल घेऊन लवकरच याबाबत योग्य निर्णय करण्याचे आश्वासन शिस्तमंडळाला दिले

कांदा निर्यातबंदी तातडीने माघे घ्या-छगन भुजबळ

0

 

ऋषी जुंधारे ,वैजापूर प्रतिनिधी

कांदा निर्यायतबंदी संदर्भात आज राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. यासंदर्भात केंद्राला तातडीने पत्र पाठविण्यात येईल तसेच पाठपुरावा करून निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात आपले विचार मांडले.
यावेळी प्रधान सचिव अनुप कुमार यांनी माहिती दिली की 2018-19 मध्ये 21.83 लक्ष मेट्रिक टन, 2019-20 मध्ये 18.50 लक्ष मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे सांगितले.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जेएनपीटीमध्ये सध्या 4 लाख मेट्रिक टन कांदा पडून आहे. बांगला देश, नेपाळ सीमेवर 500 ट्रक्स थांबून आहेत.

स्टेट बैंक ATM मधून 500 ची नोट नकली

0

 

धक्कादायक

चक्क 500 ची नोट नकली

संग्रामपुर येथील स्टेट बैंक ATM मधून आज एका ग्राहकाला ATM मधून पैसे काढण्या करिता गेला असता त्या ATM मधून चक्क 500 ची नोट नकली बाहेर आली ATM मधे गार्ड नसल्या मुळे ग्राहका न संग्रामपुर स्टेट बैंक मधे जायुन विचारपुस केली असता पहिले तर बैंकेत कर्मचारी, अधिकारी ग्राहकावर गरम झाल्याची घटना घडली परतु ग्राहक न कर्मचारी, अधिकारी ला सांगितले की तुम्ही पहिले आपल्या ATM सीसीटीवी चेक करा , ATM समोर गार्ड का ठेवत नाही अस बोल्यावर ग्राहका कडून परसपर 500 ची नोट बदलून देण्यात आली आहे

एटीम ची सुविधा सुरळीत करा

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

आज दि 16/09/20/रोजी पिंपळगाव काळे येथील सेंट्रल बँक चे A T M सुविधा नियमीत करण्याबाबत आज सेंट्रल बॅंक मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले सेंट्रल बॅंक शाखेच्या एटीएम मध्ये बऱ्याच दिवसांपासून चलनाचा तुटवडा आहे पिं काळे हे गाव 20 ते 25 हजार लोकसंख्येचे गाव आहे व 15 ते 16 खेड्यातील लोक सुध्दा या शाखेमध्ये येतात आपल्या या बँकेच्या एटीएम मध्ये नियमितपणे चलनाचा भरणा करुन जनतेची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी या बाबत आठ दिवसांच्या आत सकारात्मक दुष्टया प्रश्न सुटला नाही तर आपल्या बँक समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी या मागणीसाठी निवेदन देताना अजय ताठे मयुर राऊत योगेश जाधव रामा वानखेडे गोलु अवचार आकाश दळवी शिवा सुडके रमेश बोडखे ज्ञानु जाधव

कांदा निर्यात बंदी हटवा व सोयाबीन पिक वीमा मंजूर व्हावा यासाठी प्रसेनजीतदादा विचारमंच च्या वतीने निवेदन देण्यात आले

0

 

जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन.
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कोरोनाच्या संकट काळात आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांवर प्रचंड अन्याय केला आहे. प्रसेनजीतदादा विचारमंच च्या शेतकरी विरोधी धोरणाचा व केंद्र शासनाचा निषेध करून कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवन्यात यावी तसेच चालू हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकासन झाले असल्यामुळे शेतकऱ्यांचा पिक वीमा तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन मा.पंतप्रधान भारत सरकार, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्यामार्फत देण्यात आले.
यावेळी बाळु पाटिल डिवरे, संजय देशमुख,रेहमत ट्रांसपोर्टवाले, ईमरान खान, अजहर देशमुख,मोहसीन खान, आशिष वायझोड़े, ईरफान खान, पंजाब वाघ, सिद्धू हेलोडे,निज़ाम राज,मोहजीर मौलाना,सतिश तायड़े,भागवत अवचार,निजाम सर,सैय्यद नफिज़, सुरेश पाचपोर,आकाश जाने, सतिश डोंगरदिवे,ताहेर माही, साजिद,फाट्यासिंग पावरा, गरीबसीमा पावरा,गज्यासिंग पावरा, रेहान शाहा, खुमसिंग पावरा सह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

या तालुक्यात एकाच दिवसी पांच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार

0

 

मुख्य संपादक

अनिलसिग चव्हाण

सोलापुर ,उपळाई बुद्रूक

धक्कादायक ही घटना मन हिलावनारी आहे तसेच या राज्यात महिला व मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असताना, आता यात अल्पवयीन मुलांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. महिला व मुलींबरोबरच आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक अशी घटना सोलापूर जिल्ह्यातील महातपूर (ता. माढा) येथे घडली आहे. दोन युवकांनी गावातीलच पाच अल्पवयीन मुलांवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी (ता. 15) उघडकीस आली आहे. याबाबत माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, महातपूर गावातील दोन युवक ज्यांचे वय 18 व एक अल्पवयीन 16 वर्षांचा आहे, त्यांनी शनिवारी (11 सप्टेंबर) गावातील एका अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने घरातून नेऊन लैंगिक हेतूने अनैसर्गिक कृत्य केले.
तो पीडित अल्पवयीन मुलगा घाबरलेल्या स्थितीत घरी गेला. आजोबांनी घाबरण्याचे कारण विचारले, परंतु संशयित आरोपींनी कोणालाही सांगितल्यास सपकाविन, अशी धमकी दिली असल्याने त्या मुलाने घरी काहीच सांगितले नाही.

परंतु त्या संशयित आरोपींनी पुढे दोन-तीन दिवस सतत हे कृत्य केले. तेव्हा पीडित मुलाने ही माहिती सोमवारी (14 सप्टेंबर) त्याच्या आजोबांना सांगितली. त्याचबरोबर हे संशयित युवक गावातील इतर आणखी काही अल्पवयीन मुलांसोबत देखील लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पीडित अल्पवयीन मुलाच्या आजोबाने माढा पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना माढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे करत आहेत.

याबाबत माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने म्हणाले, की संबंधित घटनेची खातरजमा करून संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

शिक्षक व ग्रामसेवक रहिवास बाबत खोटे दस्तावेज सादर केल्याप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी उपोषण सुरू..

0

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात मात्र मुख्यालय रहिवाशी चे खोटे दस्तावेज पंचायत समितीला सादर केले आहे त्यामुळे सचिव शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक व सरपंच यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अर्जुन दामोदर सपकाळ यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद कार्यालयासमोर दिनांक 14 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे अर्जुन सपकाळ यांनी यापूर्वीच जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता गटविकास अधिकारी जळगाव जामोद व संग्रामपूर यांच्याकडे जुलै 2020 रोजी लेखी तक्रार केली आहे या प्रकरणात जळगाव जामोद येथील वरिष्ठ अधिकारी यांनी या प्रकरणाची थातुरमातुर चौकशी करून कर्तव्यात कसूर केला आहे संबंधितांवर कारवाई केली नाही वास्तविक पाहता जि.प.शिक्षक व ग्रामसेवक हे शहरी भागात राहत असून त्यांनी ग्रामपंचायत कडून खोटे रहिवासी दाखले व ठराव पंचायत समिती जळगाव जामोद ते सादर केले आहे याबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कोणतीही चौकशी केली नाही या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा 14 सप्टेंबर पासून अधिकारी म्हणून काम करावे लागेल असा इशारा दिला होता त्यानुसार त्यांनी दिनांक 14 सप्टेंबर पासून उपोषणाला सुरुवात केली आहे….

सातळी रस्त्याचे डांबरीकरण त्वरित व्हावे या मागणीसाठी सरपंच पतीचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सातळी गावाला जोडणाऱ्या या रोडचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे तसेच गावाला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नाली वरील पाईप फुटल्याने गावकऱ्यांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे त्यामुळे गावातील नागरिकांनी दळणवळण कसे करावे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यामुळे सातळी येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊनही आजपर्यंत ही या रस्त्याचे काम सुरळीत झालेले नाही त्यामुळेच सातळी गावचे सरपंच पती हे दिनांक 15 सप्टेंबर पासुन जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत जोपर्यंत रस्त्याचे काम सुरळीत होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असा हट्टच सातळी गावचे सरपंच पती यांनी धरलेला आहे तसेच उपोषण मंडपाला जळगाव जामोद नगरपरिषदेचे शिवसेना नगरसेवक रमेश भाऊ ताडे तसेच गाडेगावचे सरपंच रमेश नाईक यांनी सुद्धा भेट देऊन या उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. तरी संबंधित विभागाने या सातळी गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून गावकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वैजापूर येथील नारंगी सारंगी धरण दहा वर्षांनंतर पहिल्यांदा एका दिवसात 10टक्के वाढ , धरण 50 टक्यावर

0

 

ऋषी जुंधारे,वैजापूर प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यात काल झालेल्या पावसात नांदगाव येथील नारंगी सारंगी नदी दुधडी भरून वाहत आहे त्यामुळे कालच्या पावसामुळे नारंगी सारंगी धरणामध्ये 10 टक्के वाढ झाली आणि एकूण पाणीसाठा 50 टक्के वर पोहचला, त्यामुळं वैजापूर शहराची चिंता मिटली

कांदा निर्यात बंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या – छगन भुजबळ

0

 

सागर जैवाळ सिल्लोड

कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याबाबत छगन भुजबळ यांची पक्षप्रमुख खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा

मुंबई,नाशिक,केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचबरोबर हजारो क्विंटल कांदा मुंबई बंदरात अडकला असून त्याची निर्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासंदर्भात पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली असून कांदा निर्यात बंदी तातडीने हटवावी यासाठी केंद्र सरकारकडे ते स्वतः प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट ओढवल्यानंतर आता कुठेतरी बाजार सुरळीत होत होते. त्यातून अत्यंत कष्टाने पिकविलेल्या कांद्याला चांगला भाव मिळत असतांना केंद्र शासनाने अचानकपणे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे चाळीमध्ये साठविलेला कांदा खराब होत आहे. त्याचा शेतकऱ्यांना मोठा तोटा होत असतांना कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक फटका बसत आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी पक्षप्रमुख खासदार शरदचंद्र पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून केंद्र सरकारकडे बाजू मांडली जाणार आहे.

त्यानुसार केंद्र सरकारबरोबर स्वतः शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने स्वतः मध्यस्ती करत असून तातडीने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी संयम ठेवावा असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.