Home Blog Page 614

हिंगणी गावात सिलेंडरचा भड़का

0

 

तेल्हारा -प्रतीनीधी अमोल जवंजाळ

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बु या गावात सिलेंडर चा भडका झाल्याची माहिती आहे.प्राप्त माहिती नुसार हिंगणी बु गावातील एका घरात सिलेंडर चा भडका झाला.हा भडका एवढा भयानक होता की यात चार ते पाच घरे जळाल्याची माहिती आहे.

घटनास्थळी असलेल्या व्यक्तीनं प्रमाणे यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस आपल्या ताफ्या सह घटनास्थळी दाखल झाले होते.तसेच अग्निशमन दल सुद्दा दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.या आगीत लाखोंचा नुकसान झालं आहे.सद्या परिस्तिथी नियंत्रणात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार

0

 

ऋषी जुंधारे, वैजापूर प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान,वैजापूर च्या वतीने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने प्रतिष्ठानच्या वतीने सौ वैशाली नामदेव पगारे मॅडम नगरपालिका मौलाना आझाद हायस्कूल, वैजापूर यांना सन्मानित करण्यात आला. या वेळी उपस्थित सन्मानीय  आमदार श्री रमेश पा. बोरणारे सर,वैजापूर नगराध्यक्ष सौ शिल्पा ताई परदेशी,उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा. जगताप सचिव श्री ज्ञानेश्वर गिरगणे,अध्यक्ष श्री सोपान पगार,श्री संतोष शेलार आदि उपस्थित होते

खासदार प्रतापराव जाधव कोरोना पॉझिटिव्ह;

0

 

आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. परंतु, यापूर्वीच लोकसभेचे १७ खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, यात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचाही समावेश आहे. खासदार जाधव यांची १२ सप्टेंबर रोजी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती श्री. जाधव यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. खासदार जाधव यांना सध्यातरी कोरोनाची कोणतेही लक्षण नसल्याने दिल्लीत त्यांच्या निवासस्थानीच त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. त्यांची तब्येत ठणठणीत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आज पहिल्या दिवशी प्रतापराव जाधव यांनी अधिवेशनाला हजेरी लावली नाही.

शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकट

0

 

नासिर शहा
पातूर तालुका प्रतिनिधी

पातुर तालुक्यातील शेतकरी बांधवांवर आस्मानी संकटासह सुलतानी संकटाचे सावट निर्माण झाले असल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे यामध्ये नगदी व अल्पावधीत येणाऱ्या मुग उडीद पीक पासुन पेरणी खर्च ही वसुल झाला नसल्याची वास्तविकता आहे तर पातुर तालुक्यात नुकतीच ढगफुटी झाल्याने शेती पीकासह खरडून गेली आहे तर वन्य प्राणी यांच्या मुक्तसंचारामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपीकाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये बाळापूर तालुक्यातील हातरूण येथील शेतकऱ्यांचे ज्वारी पीकांची प्रचंड नासाडी केली असल्याची वास्तविकता आहे तसेच कपाशी पिकावर बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बांधवांच्या समोर आस्मानी संकटासह सुलतानी संकट उभे ठाकले असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे खरडून गेलेल्या शेतीचे तसेच वन्य प्राणी यांच्या मुक्तसंचारामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण संमनधीत विभागाकडून करण्यात येवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे

अतिवृष्टीमुळे पातूर तालुक्यातील केळीचे नुकसान राहेर

0

 

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या अतिवृष्टि मूळे पातूर तालुक्यातील राहेर या गावामधील उतावडी नदीला मोठा पुर येउन राहेर येथील विजय पाचपोर यांच्या शेतातील केळीचे पीक वाहुन गेले असता त्या पिकाची पाहणी करताना जि.प.सदस्य पती पंजाबभाऊ पवार ग्रामसेवक मेहरे साहेब मा. सरपंच दिनेश पाचपोर शिवसेना शा. प्र. दिपक जावळे मा.सरपंच गौतम वानखडे बंडु पाटील डाँ सोळंके गणेश पाटील व गावातील नागरीक उपस्तीत होते

देऊळगाव साकर्शीच्या डॅम वरील धबधब्यावर नागरिकांची तोबा गर्दी वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

0

 

 

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील धरण भरल्यानंतर ओसंडून वाहणारा कालवा हा जणू काही पर्यटकाचा लक्ष आकर्षित करताना दिसतय हजारोच्या संख्येने रोज त्या ठिकाणी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे जिल्ह्यातीलच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील सुद्धा नागरिक याठिकाणी येताना दिसत आहे आणि त्या ठिकाणी येऊन त्या कालवून पडणाऱ्या पाण्यामध्ये मनसोक्त आनंद त्या कालव्यावर घेत आहेत अनेकांचे फोटोशूट, पावसात पडताना चे व्हिडिओ मस्ती करतानाचे व्हिडिओ हे जरी आपल्याला पाहतांना चांगलं वाटत असले ही व आपल्या परिसरात एक निसर्गरम्य वातावरण तयार झाले की काय असे जरी वाटत असल पण हे सध्याच्या घडीला धोकादायक ठरू शकते कारण जिल्ह्यांमध्ये झपाट्याने कोरोणाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढतो आहे आणि अशा वेळेस हजारोच्या संख्येने पर्यटक एकाच ठिकाणी येत असतील आणि त्यामध्ये कोणीकडुन ही कोणत्याही गोष्टींचे पालन केल्या जात नसेल तर अशा वेळेस तो स्पॉट कोरोनाच्या हॉटस्पॉट ठरण्याची भीतीही नाकारता येत नाही म्हणून नागरिकांना आव्हान आहे की अशा वेळेस आपण स्वतःची आपल्या परिवाराची व मित्रपरिवार याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटत नाही का ? आणि म्हणून त्याठिकाणी जात असताना सर्व गोष्टीचा पालन करावे पण खरच असं होताना त्या ठिकाणी दिसत नाही म्हणून संबंधित प्रशासनाने त्या ठिकाणी जाऊन या संबंधित बाबींवर अंकुश लावावा जेणेकरून संभाव्य धोका आपल्याला टाळता येईल अन्यथा आता मोठा धोका त्या ठिकाणाहून बाहेर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.आणि तोच परिसर कोरोणाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती सुद्धा नाकारू शकत नाही म्हणून संबंधित प्रशासनाने त्या ठिकाणावर जाऊन काही निर्बंध लावावेत अशी मागणी परिसरातील नागरिका करताना दिसत आहे.

सोयाबीन पिक पाहणी करुन पीक विमा मंजुर करण्याबाबत

0

 

 

आम्ही सर्व शेतकरी मोजे जस्तगाव ता. तेल्हारा जी.अकोला येथील रहीवासी ‌असुन आम्ही‌‌ तहसीलदार साहेबाला निवेदन देतो की शेतकरीने कर्ज ‌व सोने गव्हाण ठेवुन सोयाबिनचा पेरा केलेला ‌आहे व सदर ‌पिकाचा विमा सुध्दा काढलेला आहे पण सततच्या ‌पाऊसामुळे अतोनात ‌नुकसान झाले व एन वेळेवर‌‌ बहारावरच पाण्याने मुसंडी मारल्यामुळे ज्या‌‌‌ झांडाना ‌भरघोष सेंगा ‌यायला हव्या ‌ते झाड मात्र वांझोटेच राहीले या‌ मुळे शेतकरी कासावीस झाले आम्ही ‌शेतकरी चे सोयाबीनचे पीक हेच मुख्य आहे आमची वार्षीक ‌आर्थीक परीस्थीती हे याच ‌पीकावर अवलंबुन आहे म्हनुण हा‌ पिक वीमा त्वरीत मंजुर ‌करण्यात यावा ही विनंती अन्यथा आम्हाला आत्महत्या केल्या शिवाय ‌पर्याय राहणार ‌नाही. यावेळेस गावातील सेर्व शेतकंरी‌चे निवेदनावर स्वाक्षरी आहेत व नीवेदन देतेवेळी ‌डाॅ. किशोर जवंजाळ , निलेश जवंजाळ, गोपाल जवंजाळ ,गजानन पुंडे, रवी जवंजाळ,गोपाल कवळे‌ ,नीतीन गावंडे, व लोकजागर मंचचे तालुकाअध्यक्ष अमोल दि.जवंजाळ होते

विदर्भ क्षेत्राच्या विकासाकरिता अतिरिक्त निधी द्या-आ.कोरेटे

0

 

 

शैलेश राजनकर गोंदिया

 

देवरी,दि.14 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंदिया जिल्ह्यातील समस्या मांडून क्षेत्राचा सर्वागिण विकास घडवून आणण्यासाठी अतिरिक्त निधी देण्यात यावे, अशी मागणी केली. या संदर्भात मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून विनंती केली.
आमगांव/देवरी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीन विकासाकरिता ३१ करोड. रुपयाच्या निधीचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहे. या प्रस्तावामध्ये विधानसभा क्षेत्रातील देवरी नगरपंचायत, सालेकसा नगर पंचायत व आमगांव नगर परिषद ह्या विकासाच्या दृष्टीकोनातून माघारल्या आहेत. राज्यातील इतर क्षेत्राच्या तुलनेत विकास झालेला नाही. आजही या क्षेत्रात रस्ते, नाली व अन्य मुलभूत सोयी सुविधा तसेच आवश्यक विकासकामाकरीता निधीची आवश्यकता आहे. यासाठी क्षेत्राचे आमदार यांनी विधीमंडळाच्या सत्रादरम्यान मदद व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून क्षेत्राच्या विकासासंदर्भात चर्चा केली. तसेच अतिरिक्त निधी देण्यात यावा, अशी विनंती केली

पातुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ( ढगफुटी ) सारखा पाणी झाला पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान

0

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील खालील गावांमध्ये काल दिनांक 13 सप्टेंबर 2020 ला सायंकाळी अचानक अतिवृष्टीमूळे(ढगफुटीमूळे) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शारुख खान वजीर खान यांच्या पूर्ण शेतात पाणी शिरल्या ने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तरी वरिष्ठांनी या घटनेची दखल घ्यावी असे सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे , तरी झालेल्या नुकसानाचे भरपाई म्हणून पंचनामे करण्यात यावे

पातुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे ( ढगफुटी ) सारखा पाणी

0

 

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील खालील गावांमध्ये काल दिनांक 13 सप्टेंबर 2020 ला सायंकाळी अचानक अतिवृष्टीमूळे(ढगफुटीमूळे) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता, बाळापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य दक्ष आमदार श्री नितीन बाप्पू देशमुख, त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी बाळापूर, तहसीलदार साहेब,पातूर, गट विकास अधिकारी साहेब,पातूर, तालुका कृषी अधिकारी,पातूर उपस्थित राहणार आहेत. व पिकाची पाहणी करणार आहेत
दौरा कार्यक्रम खलील प्रमाणे आहे. 1) पिंपलडोळी दु.01.00वा. 2) चोंढी दु.01.30वा. 3) झरंडी दु.02.00वा. 4) चारमोळी दु.02.30वा. 5) सावरगाव दु.03.00वा. 6) उमरा दु.04.00वा. 7) राहेर दु.04.30वा. 8) अडगांव सा.05.00वा.