Home Blog Page 622

रावणवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत गाव गारा (गात्र) गेल्या अनेक दिवसांपासून गावात अवैध दारूची विक्री

0

 

 

शैलेश राजनकर प्रतिनिधि गोंदिया

होत असल्याची माहिती पोलिस स्टेशन रावणवाडी येथे देण्यात आली. गारा (गात्र) व सावरी या गावात दारूची अवैध विक्री बेबनाव पद्धतीने सुरू झाली आहे, त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुलूपबंदी सुरू झाली आहे, अशी माहिती आहे की, गरारा (गात्र) सावरी या गावात अवैध दारू विक्री सार्वजनिक आणि पोलिसांच्या नजरेत सुरू आहे. तरीही संबंधित विभाग कोणतीही ठोस पावले उचलत नाही. गरारा (गात्रा) सावरीच्या ग्रामीणने रावणवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली पण आजपर्यंत अवैध दारू व्यावसायिकाविरोधात कोणतीही कारवाई झालेली नाही. कोणाची भीती न बाळगता अवैध दारूची विक्री खुप खुली होत आहे. ज्यामुळे गावाचे वातावरण बिघडत आहे आणि जेव्हा तरुणांकडे पैसे नसतात तेव्हा व्यसनींनी आपल्या मुलांना, पत्नीला आणि पालकांना मारहाण केली आणि घरापर्यंत ठेवलेले धान्य, दारूसाठी भांडेही विकले. . आजची नवीन पिढी 15 ते 20 वर्षे वयोगटातील नशेच्या आहारावर चालली आहे. ग्रामीणोच्या माहितीनुसार, ग्राहकांवरुन भांडणेही होतात. अशा परिस्थितीत बरेच नुकसानही होऊ शकते.
दारूची ही

सरपंच व पुत्र कोरोना पॉझिटिव्ह

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत आहे व ग्रामीण भागात जास्त प्रमाणात वाढत आहेत असेच तालुक्यातील ग्राम खेर्डा येथील महिला सरपंच व त्यांचे पुत्र कोरणा पॉझिटिव निघाले आहेत सरपंच कोरोना पॉझिटिव निघाल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे कोरणा बाधित व्यक्ती राहत असलेला परिसर शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे सरपंच यांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी गोळा करण्यात येत आहे

स्टेट बँक साखर खेर्डा येथे होत आहे ग्राहकांची गैरसोय

0

सिं.राजा/प्रतिनिधी

पावसाळ्याचे दिवस सुरु असून शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत दररोज येरझारा घालत असून साखरखेर्डा शाखेमध्ये ग्राहकांना योग्य ती वागणूक मिळत नसल्याने ग्राहकांची खूप धावपळ व ग्राहक खूप त्रस्त झाले आहेत याठिकाणी ग्राहकांना उन्हात उभे राहावे लागते त्या ठिकाणी बँकेने कसलीही सोय केलेली नाहीये. दि.04 सप्टेंबर रोजी दरेगाव शाखासंघटक मनसे राधेश्याम बंगाळे पाटील यांनी विचारपूस केली असता कर्मचारी बँकेतील कर्मचारी यांनी त्यांचे सोबत गैरवर्तणूक देऊन उडवा उडवी ची उत्तरे दिली तसेंच शेतकरी बांधव त्यांना सुद्धा योग्य ती वागणूक मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी देखील सांगितले आहे याठिकाणी ग्राहकांचे खूप हाल होताना दिसून आले असून बँकेत काउंटर सुद्धा कमी आहेत ते काउंटर चे प्रमाण देखील वाढले पाहिजे अशी ताकीद शाखा संघटक यांनी दिली तसेच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे ग्राहकांची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेतली गेली पाहिजे असे व्यवस्थापक यांना सांगून आज त्या कामाची दखल घ्यायला लावली येणाऱ्या काही दिवसात जर योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे राधेश्याम बंगाळे पाटील मनसे स्टाईलने आंदोलन असा इशारा देण्यात आला.

राजे प्रतिष्ठान तर्फे परभणी जिल्ह्यातील नियुक्त्या करण्यात आल्या

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

आज राजे प्रतिष्ठान परभणी जिल्हा अध्यक्षपदी डॉ.रामकिशन शेळके यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी* श्री.प्रल्हादराव जाधव ( मराठवाडा विभागीय अध्यक्ष राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य).श्री.बालाजी चां.दळवी(जि.उपाध्यक्ष हिंगोली)श्री.वैभव बेंडे(ता.अध्यक्ष वसमत) मुरली पाटील ,आदी.

मनब्दा येथे दोन वृध्द शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0

 

अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे

तेल्हारा तालुक्यातील मनब्दा येथिल शेतात विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने दोन वृध्द शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ची घटना शुक्रवार ४संप्टेबर रोजी सकाळी दहा वाजता सुमारास घडली पांडुरंग अमृता पाथ्रीकर वय ७०व रामकृष्ण संपत शिखरे वय ७४अशी मृतकाचे नावे आहेत मनब्दा येथिल पांडुरंग पार्थिकर व रामकृष्ण शिखरे हे दोघेही मित्र असुन ते नेहमी सोबत राहायचे शुक्रवारी हे दोघेही गावातील सहदेव खराबे यांच्या शेतात अंबाडी ची भाजी आणायला गेले होते तेथे विहीर जवळ च्या विजेच्या विघुत खांबाला स्पर्श झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी यांनी शेतात धाव घेतली दोघेचेही मृतदेह विहीर जवळ पडलेले आढळुन आले तेल्हारा पोलिस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथे पाठविण्यात आले या घटनेमुळे मनब्दा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

रियाची घरी NCB, सर्च ऑपरेशन सुरु, मिरांडाला घेतले ताब्यात

0

 

मुंबई, सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्ज कनेक्शन असल्याचं समोर आल्यानंतर आता रिया-शोविक आणि सॅम्युल मिरांडा समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. शोविक आणि रियाचे ड्रग्ज विषयी चॅट समोर आल्यानंतर नार्कोटिक्स विभागाची एका टीमनं रियाच्या घरी शुक्रवारी सकाळी छापा टाकला आहे. तर दुसरी टीम सॅम्युल मिरांडाच्या घरी दाखल झाली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

सॅम्युल मिरांडाविरोधात NCB टीमकडे पुरावे असल्यानं त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर रिया आणि शोविकला अटक होणार का? हे पाहाणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दोन्ही ठिकाणी NCBकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड(रेल्वे)येथील दोन युवकांचा साकोली तालुक्यातील शिवणीबांध तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना

0

 

शैलेश राजनकर प्रतिनिधि

(दि.3 सप्टेंबर)ला घडली.सदर युवक हे पोहण्यासाठी त्या तलावात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.मृतामध्ये सौंदड निवासी नितेश धनिराम सूर्यवंशी(वय 20) व श्रीरामनगर रहिवासी अमर शामराव कुंभारे(वय 20)या मुलाचा समावेश आहे.घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या नागरिकांनी तलावावर एकच गर्दी केली होती.ते बुडत असल्याचे दिसताच त्याठिकाणी हजर असेलल्या स्थानिकांच्या सहकार्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.हे दोन्ही युवक आयटीआयचे शिक्षण घेत होते.तब्बल दहा वर्षानंतर शिवनीबांध जलाशय भरल्याने पर्यटकांची सध्या त्याठिकाणी मोठी गर्दी बघावयास मिळत आहे.त्यातच पोहण्याचा आनंद घेण्यासाठीही युवक तिथे जाऊ लागले आहेत.

बुलडाणा टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन ची नवीन जम्बो जिल्हा कार्यकारणी गठीत…

0

 

जिल्हाध्यक्षपदी वसीम शेख सचिव युवराज वाघ तर कार्याध्यक्ष फहिम देशमुख….

खामगाव – पत्रकारांवर होत असलेल्या अन्याय , अत्याचार व त्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 12 वर्षापासुन टिव्ही जर्नालिस्ट असोसिएशन जिल्ह्यात एक लढाऊ संघटना म्हणून काम करत आहे, आज खामगाव येथील विश्राम भवन येथे
असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आधीचे जिल्हाध्यक्ष अमोल गावंडे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केला , यावेळी असोसिएशन ची नविन कार्यकारणी करीता असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वानुमते संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी वसीम शेख, सचिव पदी युवराज वाघ, तर जिल्हा कार्याध्यक्ष पदी फहिम देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

तर जिल्हा कार्यकारिणी पुढीलपणे – जिल्हा उपाध्यक्ष संदिप वानखडे, गोपाल तुपकर, जिल्हा समन्वयक कासिम शेख, संदिप सावजी, जिल्हा संघटक देवीदास खनपटे, राजेश वाढे, कोषाध्यक्ष दिपक मोर, राजेश बाठे ,जिल्हा प्रसिद्धी प्रमूख नितीन कानडजे पाटील, अनिलसिंघ चव्हाण,सोशल मिडिया प्रमूख संदिप मापारी, सुरज देशमुख,आंदोलन समिती प्रमुख मुबारक खान, गजानन काळुसे, आरोग्य समिती प्रमुख संतोष मालोसे, महेंद्र मिश्रा, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती योगेश शर्मा, गौरव खरे,

जिल्हा प्रवक्तापदी – अमोल गावंडे, श्रीधर ढगे पाटील, संदिप शुक्ला, गणेश सोळंकी, इश्वरसिंग ठाकुर,

जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी – मोहम्मद फारुक,अमोल सराफ , विनोद वानखडे,सिद्धार्थ गावंडे,सागर झनके, संजय दांडगे, देवानंद सानप, किशोर सोनोने, सुनिल मोरे, विजय हिवराळे, शिवाजी भोसले, जका खान, कुणाल देशपांडे,

तालुका समन्वयक पदी – शेगाव – राजवर्धन शेगावकर , संग्रामपुर – शाम वाघ, जळगाव – जामोद गणेश गिर्हे , नांदुरा – संतोष तायडे , मलकापुर – समाधान सुरवाडे , मोताळा – गोपाल काटे, बुलडाणा – निलेश राऊत, चिखली – संदिप सावळे, देऊळगाव राजा – विलास जगताप, सिंदखेडराजा – महेंद्र मोरे, लोणार – सागर पनाड, मेहकर – रमेश चव्हाण, खामगाव – निखिल शहा. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी अनिल भगत,शिवदास सोनोने,गणेश भड, विलास बोडखे,आदेश कांडेलकर, गोपाल अवचार ,शिवाजी भोसले,राहुल गवई यांच्यासह आदींची उपस्थिती होती अशी माहिती असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख नितीन कानडजे पाटील यांनी दिली

एक स्पॉट व सोन्यासारख कुटुंब उध्वस्त

0

मुख्य संपादक

अनिलसिंग चव्हाण

(कोल्हापूर) : एक स्पोट व सर्व संसार उध्वस्त गॅस हा स्फोटक पदार्थ असल्याचे माहीत असूनही निष्काळजीपणाने रेग्युलेटर सुरू ठेवल्याने उडालेल्या भडक्‍यात दोघांच्या मृत्यूस आणि दोघांच्या गंभीर जखमी होण्याला कारणीभूत ठरल्याबद्दल पोलिसांत एकावर गुन्हा दाखल केला. उमेश वसंत मोहिते (वय ३५, मांडेकर गल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, ११ ऑगस्टला मोहिते याच्या घरी सत्यनारायण पूजा व आंबील कार्यक्रम होता. यानिमित्त मोहिते याने शेजारच्या दीपक बामणे यांच्या घरातील सोप्यात जेवण केले होते. त्यासाठी गॅस शेगड्या आणि सिलिंडर आणले होते. जेवण केल्यानंतर मोहिते याने भांडी, शेगडी आणि सिलिंडर तेथेच ठेवले.
रात्री जेवण गरम केले. त्यानंतर मोहिते याने रेग्युलेटर बंद केले नव्हते. त्याच दिवशी रात्री गॅस गळती होऊन पणतीमुळे गॅसचा भडका उडाला. त्यात दीपक बामणे (वय ४९), पत्नी सौ. संगीता, मुली उत्कर्षा आणि आरती हे चौघेही गंभीर भाजले. त्यांना उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना आधी दीपक यांचा तर, काही दिवसांनी उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू आहेत.

पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. गॅस हा स्फोटक व ज्वलनशील असल्याची कल्पना असूनही त्याच्या हाताळणीत हयगय आणि निष्काळजीपणा करून दोघांच्या मृत्यूस आणि गंभीर जखमीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सरकारतर्फे पोलिस हवालदार पी. बी. गोजारे यांनी संशयीत मोहिते याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद करीत आहेत.

दरम्यान, गॅसच्या भडक्‍यात पती-पत्नीसह दोन मुली भाजून गंभीर जखमी झाल्या. पती आणि मोठ्या मुलीचा मृत्यू झाला. पत्नीचीही प्रकृती गंभीर आहे. पाच वर्षांची मुलगी ३० टक्के भाजली आहे. पत्नी व मुलगी घरीच आहेत. आर्थिक स्थितीअभावी पुढील उपचाराला अडचण आल्याचे कळताच तपासकामी कुटुंबाच्या घरी गेलेली खाकी वर्दी गहिवरली अन्‌ त्या मुलीला वर्गणी काढून खासगी दवाखान्यात दाखल केले.

हे पण वाचा – ह्रदयद्रावक! नव्या दुचाकीचे पासिंग होण्याआधीच काळाने घातला घाला

गडहिंग्लज पोलिसांनी दाखवलेली माणुसकी प्रेरणादायी आहे. मांडेकर गल्लीतील दीपक बामणे यांच्या घरी ११ ऑगस्टला गॅसचा भडका उडाला. त्यात स्वत: दीपक, पत्नी संगीता आणि उत्कर्षा व आरती या दोन मुली भाजून जखमी झाल्या. उपचार सुरू असताना दीपक व उत्कर्षाचा मृत्यू झाला. संगीता व आरतीवर उपचार सुरू होते.

हे पण वाचा – धगधगती स्मशानभूमी ; चोवीस तासात तब्बल शंभर अंत्यसंस्कार

दरम्यान, तपासकामी गडहिंग्लजचे पोलिस बामणे कुटुंबीयांच्या घरी गेले. संगीता व आरती यांची स्थिती पाहून त्यांनाही गहिवरून आले. त्यांनी मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी काढून आरतीला दवाखान्यात दाखल केले आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक निरीक्षक दिनेश काशीद यांच्यासह सहकाऱ्यांनी केलेल्या या कार्याचे कौतुक होत आहे.

बिडीओ भरत चव्हाण यांनी स्वीकारला ग्रामपंचायत सिरसोली चा प्रशासक म्हणून पदभार

0

 

अडगांव बु प्रतिनिधी :दिपक रेळे

 

सिरसोली तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सिरसोली येथील ग्रामपंचायत ची मुदत 25 ऑगस्ट रोजी संपल्यामुळे प्रशासक पदावर प्रभारी गटविकास अधिकारी भरत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी दिनांक 2 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत सिरसोली चा पदभार स्वीकारला त्या वेळी जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता अढाऊ पंचायत समिती सभापती रफत सुलताना पंचायत समिती सदस्य मो इद्रीस प स संजय हिवराळे ग्रामसेवक गजानन मेतकर रतन दांडगे सरपंच सौ सरिता प्रशांत काईंगे उपसरपंच विजय वाघ ग्रामपंचायत सदस्य अहमद शहा सादिक पटेल राजू पाटील गावंडे विजय भारसाकडे इरफान अली पत्रकार विनोद सगणे ग्रा प कर्मचारी शंकर अनासने नागसेन भारसाकडे दीपक वानखडे जिल्हा परिषद मुख्याध्यापक सौ सुनंदा गावंडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते पाच वर्षातील समस्या ग्रामस्थांनी प्रशाषकापुढे मांडून ते कशा प्रकारे मार्गी लागतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे