प्रतिनिधी सचिन वाघे
Relvenews:हिंगणघाट :- भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला १७१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे वतीने हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यांनी भारतीय रेल्वेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देत भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे विभागीय वाणिज्य निरीक्षक मंगेश तितीरमारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर बसंतकुमार बल, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, नारायण सेवा मित्र परिवाराचे महेश अग्रवाल, आर.पी.एफ. ठाणेदार हरीवंशसिंग,
RevenueNews /अवैध रेती माफिया विरोधात पुरावे! अधिकारी कार्यवाही करणार का ?
विनोद पोतदार, युनुस भाई आणि वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे संघटक राजेश अ. कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार रेल्वे लाईन ची पूजा करून झाली. रेल्वे ची लाइन ही केवळ लोखंडाचे रूळ नसून ती भारतीय रेल्वेच्या कार्याचा आणि कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आधारस्तंभ आहे, ही भावना या पूजेतून व्यक्त करण्यात आली.
यानंतर वर्धा-बल्लारशाह यात्री संघाच्या सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन यथोचित स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि रेल्वे सुविधा तसेच गाड्यांच्या थांब्यांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप बालपांडे यांनी तर संचालन बाबुसिंग गहेरवार यांनी केले.
Relvenews:उपस्थितांचे आभार डी.के. गुरुनुले यांनी मानले. या कार्यक्रमाला लिलाधर मडावी, रवी जुमडे, राष्ट्रपाल कांबळे, चंद्रशेखर खापरे, सचिन वाघे अब्दुल कदिर बख्श, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे सदस्य आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.