तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे
बोराळे (ता. यावल) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कार्य व विचारांवर प्रकाश टाकण्यात आला.
या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच संध्या बाई उज्जैनसिंग राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंह राजपूत, उपसरपंच मायाबाई राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच ग्रामपंचायत सदस्य गौतमाबाई वानखेडे, दिपाली चौधरी, भरत राजपूत, पोलीस पाटील माधुरी राजपूत, अंगणवाडी सेविका रेणुका वानखेडे, अंगणवाडी मदतनीस सुवर्णा राजपूत यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी कैलाससिंग राजपूत, नितीन राजपूत, विवेकानंद तायडे, विनोद वानखेडे, राजू वानखेडे, शरद वानखेडे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अमर वानखेडे, टोपलू वानखेडे, विकी वानखेडे प्रदीप वानखेडे,यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण, समता, बंधुता आणि न्याय या विचारांची आजच्या समाजात किती गरज आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
Yavalnews /त्यांच्या विचारांचा अंगीकार करून समाज प्रगत करण्याचे आवाहन करण्यात आले.
या जयंती उत्सवात गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमामुळे सामाजिक एकात्मता व जागरूकतेचा संदेश संपूर्ण गावात पोहोचला.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








