अन्यायग्रस्त पीडित शेतकरी यांच्या सन्मानार्थ एल्गार सेना मैदानात

0
169

 

ग्राम दाढी पेढी गावातील तलाठी व कोतवाल झालेत तहसीलदार

मागण्या पूर्ण न झाल्यास तहसीलदार भातकुली यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा अल्टिमेट

उषा पानसरे असदपूर
दिनाक 6 एप्रिल
अन्याय ग्रस्त पिडीत शेतकरी यांच्या सन्मानार्थ एल्गार सेना मैदानात दाढी पेढी गावात तलाठी व कोतवाल झालेत तहसिलदार
ग्राम दाढी पेढी येथील पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात तात्काळ पैशाची रक्कम जमा करण्याकरिता दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी तहसीलदार मॅडम भात कुली यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे ग्राम दाढी पेढी
ग्रामपंचायत येथील 2021 22 ची नापिकी रक्कम मध्यापर्यंत तलाठी कोतवाल तथा शासनाने नेमलेल्या तुझी मित्र यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 108 शेतकऱ्याने नापिकी ची रक्कम मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच काही शेतकरी बांधव सगळं संदर्भात विचारपुस करण्याकरता तलाठी कोतवाल व कृषी मित्र यांच्या कडे गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वारंवार शेतकऱ्यांची टिंगल उडविली आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देऊन त्यांना ना पिकाची रक्कम त्यांच्या खात्यात पूर्ण करावी. आणि तलाठी व कोतवाल यांना तत्काळ निलंबित करावे . अन्यथा आपण सदर प्रकरणी कुठल्याही प्रकारची कामचुकारपणा करून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यास सदर प्रकरणी शेतकरी तथा एल्गार सेनेच्या वतीने आपल्या दालनात समक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा मानस सर्व शेतकरी बांधवांनी करायचा ठरवला आहे. त्यामुळे सदर प्रकरणी कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार तसेच जीवित हानी ला तालुक्याच्या तहसीलदार तथा दंडाधिकारी या नात्याने आपणच जबाबदार रहाल याची आपण दखल घ्यावी . अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here