उनाड वारा साहित्य परिवार आयोजित , कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन , सांगली येथे होणारे कवी संमेलन तात्पुरत्या काळासाठी स्थगित केलं . आणि अधूनमधून गुगलमीट अँपद्वारे आठवड्यातून , पंधरा दिवसातून , जसे जमेल तसे ऑनलाईन कवी संमेलन घेतले . आणि एक दिवस अविनाश शिंदे ( माऊली ) सरांच्या डोक्यात एक कल्पना आली की , आपण स्वतःच्या कविता सादर करतच असतो . पण आपण आपल्या दिग्गज कवी / कवयित्रीच्या कविताही सादर करायला हव्यात . हा संकल्प मनात ठेवून , त्यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे नियोजन करून , त्यांनी साहित्य क्षेत्रात एक इतिहास घडविला . आणि गुगलमीट अँपद्वारे दिग्गजांच्या कविता व नवोदितांचे सादरीकरण , अशा प्रकारे काव्यस्पर्धा यशस्वीरित्या पार पडली . या स्पर्धेचे आयोजन कवी अविनाश शिंदे यांनी केले . तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी अरविंद भामरे यांनी काम पाहिले . ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये ,
कवी – संजय जाधव – बालकवी
कवी – हरिहर आनंदहरी – विंदा करंदीकर
कवी – प्रविण पुजारी – सुरेश भट
कवी – युवराज जगताप – ग्रेस
कवी – अनिल केंगार – वामनदादा कर्डक
कवी – जयराम मोरे – सुरेश भट
कवयित्री – प्रा . त्रिशिला साळवे – मंगेश पाडगावकर
कवयित्री – वंदना राऊत – बहिणाबाई चौधरी
कवयित्री – अस्मिता इनामदार – सुरेश भट
कवयित्री – मनीषा रायजादे पाटील – इंदिरा संत
कवयित्री – रोहिणी गंधेवार – शांताबाई शेळके
कवयित्री – दिपाली अष्टुरे – मंगेश पाडगावकर
ह्या सर्व कवी / कवयित्रीनी दिग्गजांच्या प्रत्येकी दहा कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली .
सहा गटातून तीन नंबर काढणे . खरंच खूप अवघड काम होतं . पण परीक्षक कवी , अरविंद भामरे सरांनी अगदी काटेकोरपणे निरीक्षण करून तीन नंबर काढले .
*प्रथम क्रमांक.*
१) श्री. संजय जाधव
२)हरिहर आनंदहरी
( बालकवी, विंदा करंदीकर
〰️〰️〰️〰️〰️〰️
*व्दितीय क्रमांक*
१)रोहिणी गंधेवार
२)दिपाली अष्टुरे
( शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर )
*तृतीय क्रमांक*
१)प्रा. त्रिशिला साळवे
२)वंदना राऊत
( मंगेश पाडगावकर, बहिणाबाई चौधरी)
सलग सहा दिवस चालणारी ही काव्यमय शृंखला , आनंदमय , प्रेममय आणि शांतपणे पार पडली . आणि सगळ्या कविता बहारदार असल्यामुळे आनंद गगनात मावत नव्हता . कामात सगळे व्यस्त असूनसुद्धा , वेळातवेळ काढून काव्यस्पर्धा छान केली . मला माझ्या उनाड वारा साहित्य परिवाराचा अभिमान आहे . असं सांगत कार्यक्रमाच्या मान्यवरांनी सहभागी कवी / कवयित्रीना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .