किनगाव येथे एका तरूण शेतमजुराची आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0
515

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव खुर्द येथे एका तरूणा शेतमजुराची गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असुन , या घटनेची बाबत पोलीसात नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तालुक्यातील किनगाव खुर्द येथील साईबाबा मंदीर परिसरात राहणारे भगवान रघुनाथ पाटील वय४० वर्ष या तरूणाने आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ , ३० वाजेच्यापुर्वी आपल्या राहत्या घराच्या छताच्या पडतीला साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे सदरची घटना घडली त्यावेळेस मयत भगवान पाटील हे पत्नी व मुलगा शेतीकामास गेले असता एकटेच घरात होते , मागील चार वर्षापुर्वी देखील पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्रयत्न केल्याची माहीती समोर आली आहे याबाबतची खबर गावातील पोलीस पाटील दिलीप साळुंके यांनी पोलीसात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , मयताचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी केले असुन तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे . मयत भगवान पाटील यांच्या कुटुंबात पत्नी , आई , वडील , एक मुलगा असा परिवार असुन त्यांनी आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here