कृषियोद्धा संघटनेचे ज्ञानेश्वर खरात पाटील यांचे शेतकऱ्यांसह कृषिधन सिड्स जालना या कंपनीवर मुक्कामी ठिय्या आंदोलन

0
688

 

गेल्या खरीफ हंगामात शेतकऱ्यांनी कृषिधन सिड्स या कंपनीचे बियाणे खरेदी केले.ते बियाणे उगले पण त्याला शेंगा लागल्याचं नाही त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन झालेच नाही.
संबंधित प्रकरणाची शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी लोणार जि.बुलडाणा यांच्याकडे तक्रार केली.तालुका कृषि अधिकाऱ्यांनी या बाबीची तपासणी केली असता त्यामध्ये 74 % पेक्षा जास्त भेसळ आहे असं लेखी निरीक्षण नोंदवले.
हा संबंधित प्रकार लक्षात घेता कृषिधन कंपनीने सर्टीफाईड बियाणे म्हणून हे बियाणे विकले परंतु शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे. की जर ह्यामध्ये 74 % भेसळ आहे तर मग हे बियाणे सर्टीफाईड कसे असेल कारण सर्टीफाईड बियाण्याला आनुवंशिक आणि भौतिक शुद्धता ही 98 ते 99 % पाहिजे.
म्हणून ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी कृषिधन या कंपनीच लायसन्स कॅन्सल करावे, कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, आणि बीज प्रमाणीकरण एजन्सी मध्ये ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून बोगस बियाण्याला सर्टीफाईड ची मान्यता दिली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here