खुशखबर, शेतकऱ्यासाठि बातमी , चार दिवसात जमा करा कागदपत्रे तरच येतील 4000 हजार रुपये

0
1598

 

SURYA MARATHI NEWS

केंद्र सरकारकडून पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) योजनेत मोठे प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. तरी या योजनेमार्फत होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठं पाऊल उचललं आहे.
की आता या किसान योजनेत (PM KISAN Installment) रजिस्ट्रेशन साठी रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच रेशनकार्डशिवाय आता किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही.
तर आजच व आता या योजनेचा लाभ पीएम किसान पोर्टलवर रेशनकार्ड क्रमांक टाकल्यानंतरच मिळणार आहे.व आता या योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक (Ration Card Mandatory) देणे बंधनकारक असेल.व त्याच वेळी, रेशन कार्डच्या अनिवार्य गरजेसोबतच, आता रजिस्ट्रेशनच्या वेळी केवळ कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी (PDF) बनवून पोर्टलवर अपलोडही कराव्या लागतील. मगच या
रजिस्‍ट्रेशनमध्ये नाव राहणार व कोणत्याही त्रुटी :- राहणार नाही मग
याअंतर्गत खतावणि , आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारकही रद्द करण्यात आले आहे. आता लाभार्थ्यांना या कागदपत्रांची पीडीएफ (PDF) फाइल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच नवीन प्रणालीमध्ये योजना अधिक पारदर्शक होणार आहे.

रजिस्ट्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे :-

1. तुमच्याकडे बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य आहे, कारण सरकार DBT द्वारे शेतकऱ्यांना पैसे ट्रांसफर करते.
2. तुमचे बँक खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
3. तुमच्यासाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. त्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
4. पीएम किसानच्या वेबसाइट pmkisan.gov.in वर तुमची कागदपत्रे अपलोड करा.
5. आधार लिंक करण्यासाठी तुम्ही फार्मर कॉर्नरच्या (Farmer Corner) पर्यायावर जा आणि आधार तपशील (Edit Aadhaar Detail) संपादित करा या
पर्यायावर क्लिक करून अपडेट करा.
शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 4 हजार रुपये ? या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 9वा हप्ता त्यांच्या खात्यात जमा झाला नाही तर त्यांना आता पुढील हप्त्यासोबत मागील रक्कमही मिळणार आहे. व म्हणजेच शेतकऱ्यांना आता 4000 रुपये हप्ता मिळणार आहेत. व लवकरच
ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी रजिस्ट्रेशनसाठी केलं आहे. तुम्ही अर्ज केला असून जर तो स्वीकारला गेला असेल तुम्हाला 4000 रुपये मिळतील.
म्हणजे या शेतकरी ला दहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत :-
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आता शेतकरी दहाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. व या
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येकी 2,000 रुपयांचे तीन हप्ते, म्हणजेच 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. व मग देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना थेट आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश राहणार आहे.
Surya marathi news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here