अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक
धोंडराई या ठिकाणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित केलेला होता सदर मेळाव्यास जिल्ह्यातील पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणा मध्ये बोलताना रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख म्हणाले की, गेवराई तालुक्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ते खराब झालेले आहेत, नागरिकांना आरोग्य सेवा पुरवली जात नाही, पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती बऱ्याच गावांमध्ये निर्माण झालेली आहे, कोविढ काळामध्ये गोरगरिबांना कुठल्याही पद्धतीची सुविधा मिळाली नाही, शेतकऱ्यांच्या मुलांना अद्यापपर्यंत रोजगार उपलब्ध करुन दिलेला नाही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना बाबत जाणून-बुजून राजकारण करून बँकांचे कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही, हे जर चित्र बदलायचे असेल तर तुमच्या आमच्यातील शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा आमदार होणे गरजेचे आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभेला मी सुनील ठोसर याला रयत शेतकरी संघटना माध्यमातून विधानसभेला उभा करणार आहे. मला खात्री आहे की सर्व गोरगरीब जनता सुनील च्या पाठीमागे ठामपणे उभे राहील व येणाऱ्या विधानसभेला त्याला निवडून देईल.
या सभेस रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर ,पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास कोतवाल , पुणे जिल्हा कार्यअध्यक्ष हेमंत चौधरी,सहचिटणीस अंकुश हंबीर, तालुका अध्यक्ष राजेंद्र मोरे, युवक आघाडी तालुका प्रमुख गुरु हतागळे, बंडू सगळे बीड जिल्हा संपर्क प्रमुख, बाबुराव भोईटे सर तालुका प्रमुख, बाळराजे जाधव बीड जिल्हा कार्याध्यक्ष, प्रदीप झोडगे उप जिल्हा प्रमुख, सोनाली येवले महिला आघाडी जिल्हा प्रमुख, अर्जुन भाऊ चाटे अंबेजोगाई तालुका प्रमुख, महेश शेळके बीड तालुका प्रमुख, प्रमोद सर डोंगरे बीड जिल्हा सचिव सह विविध मान्यवर व्यक्ती, शेतकरी व मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते