(चंद्रपूर घुग्घुस प्रतिनिधी)
रमेश सुध्दाला
घुग्घुस येथील राजीव रतनजवळील रेल्वे क्रॉसिंगवर जाम झाल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गुरुवारी संध्याकाळी कोळसा मालगाडी गेल्यानंतर रेल्वे फाटक बंद झाले, जे सुमारे 30 मिनिटे बंद होते. यादरम्यान रेल्वे क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूचे फाटक बंद केल्याने लोक जाममध्ये अडकले होते.
रेल्वे क्रॉसिंग ही लोकांची डोकेदुखी बनली आहे. घुग्घुस रेल्वे साईडिंगवरून दररोज 40 हून अधिक कोळसा रेल गाड्यांची येन-जाना होत असते रेल्वे फाटक बंद असल्याने वाहतूक ठप्प होतो. दर तासाला 10 ते 15 मिनिटे फाटक बंद असल्याने गाड्यांच्या पासिंगमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात हि परिस्थिती आहे.
गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मालगाडीसाठी रेल्वे फाटक बंद करण्यात आले. ट्रेन गेल्यानंतर बराच वेळ होऊनही फाटक उघडता आले नाही. रेल्वे फाटकात बसवण्यात आलेला पाईप खराब झाल्याने जवळपास 30 मिनिटे ते बंदच राहिले दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तीन वाहतूक पोलीस हवालदार विनोद लोखंडे, पोलिस नाईक गजानन झाडे, पोलीस अमलदार माणिकचंद चौधरी यांनी पुढाकार घेऊन रेल्वे फाटकाची तात्पुरती व्यवस्था केली, रेल्वे फाटकात बसवलेले लोखंडी पाईप खराब झाल्याने बराच वेळ लागले. वाहने सुरळीत चालावीत यासाठी प्रयत्न करत वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सांभाळून आपली जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत आहे.