गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-
स्थानिक जळगांव जामोद नगर परिषद कंत्राटदारांकडून होत असलेल्या हलगर्जीपणा मुळे शहरवासीयांना नगर परिषदे कडून होत असलेल्या दुर्लक्षित पणाला सामोरे जावे लागत आहे.
जळगाव जामोद नगर परिषदे मार्फत उचलला जाणारा घनकचरा हा वेळेवर उचलला जात नाही कचरा 4 ते 5 दिवस विलंबाने उचलला जात आहे गल्ली बोळात जाणारे छोटे वाहन कार्यरत नाही शहरातील नाल्या सफाई योग्य वेळी साफ केली जात नाहीत. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे शहरामध्ये सफाई वेळेवर केली जात नाही वरील प्रमाणे सफाई मध्ये निष्काळजी दिसून येत असून कंत्राटदार जास्तीत जास्त नफा कसा राहील या उद्ध्येशाने काम करीत आहे. परिणामी जळगांव शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे तसेच कंत्राटदरांचा निष्काळजीपणा हा कोविड 19 साठी पोषक होत आहे.
कोविड महामारी फार वाढत आहे
ओला व सुका कचरा गोळा करणे आवश्यक असतांना अश्या कोणत्याही प्रकारची बाब सदर कंत्राटदार याच्याकडून होतांना दिसत नाही मात्र त्या सदरखाली अनावश्यक बिल मात्र काढल्या जात आहे., covid 19 चा प्रादुर्भाव असतांना सुध्दा सदर घंटा गाडीवर जे मजूर काम करतात त्याना कोणत्याही प्रकारची साहित्य जसे की हँड वॉश, हात मोचे, सॅनिटायझर, मास्क इ दिले जात नाही त्यामुळे सदर मजूर हे तोंडावर मास्क न वापरता घरोघरी जाऊन रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते त्यामुळे सदर मजूर व नागरिक यांच्या जीवितास धोका संभवतो , तसेच सदर घनकचऱ्या बाबत अधिकाऱ्याकडून ही योग्य कारवाही होत नसल्याने
स्मार्ट सिटी चे काम सर्वत्र घाण असे म्हणावयास चुकीचे होणार नाही कारण कचरा व सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. परिणामी कंत्रादार व स्मार्ट सिटी चे संबधीत अधिकारी यांनी सुरू असलेल्या अस्वच्छते कडे पाठ फिरवली आहे.याकडे संबंधित अधिकारी व कत्राटदार लक्ष देतील का अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.