गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगांव जामोद:-आज दिनांक 12 मे 2021 रोजी जळगांव जामोद शहरातील विविध समस्या विषयी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर,पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण भोपळे, नगरसेवक ऍड संदीप मानकर यांच्या उपस्थितीत तसेच न प गटनेता अर्जुन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी विविध प्रकारच्या समस्या विषयी निवेदन दिले. त्यामध्ये पुढीलप्रमाणे समस्या न प प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
जळगांव जामोद शहरात व परिसरात सॅनिटायजर फवारणी करण्याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा अद्यापपर्यंत सार्वत्रिक फवारणी करण्यात आली नाही.
शहरातील व्यापारी,गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्या सोडवण्याच्या बाबतीत न प जळगांव जामोद चे प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे.
अग्निशमन ,साफसफाई तसेच ईतर अत्यावश्यक व जोखमीच्या विभागात सेवा देणारे कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पुरेसे विमा संरक्षण व कोरोना प्रतिबंधक साहित्य देण्याविषयी मागील वर्षी तक्रार दिली असूनही त्याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेण्याची संवेदनशीलता न प शासन व प्रशासनाने दाखवली नाही.
न प मलकापूर ने मागील दिवसात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मच्याऱ्यांचा सत्कार केला व त्यांना मानसिक बळ दिले,असे कार्य करण्याची सद्बुद्धी न प प्रशासन जळगांव जामोद ला केव्हा येईल?
न प प्रशासनाच्या असंवेदनशील व गलथान कारभारामुळे काही न प कर्मचारी तसेच पुष्कळ नागरिक गतप्राण झाले. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला परन्तु त्याच्याविषयी सहानुभूती या निगरकट्ट प्रशासनाने दाखवली नाही.
न प मार्फत केवळ शहरात दर्जाहीन व थातुरमातुर बांधकामे सुरु ठेवण्याचे काम होतांना दिसत आहेत .त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.त्या ठिकाणी विकास कामाविषयीचे फलक लावलेले आढळत नाहीत.
तसेच न प च्या व जळगांव जामोद शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नगरसेवकांनी म्हणजेच लोकप्रतिनिधी यांनी न प च्या अधिकारी व कर्मचारी यांना विचारणा केली असता अत्यंत पोरकट व उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा न प प्रशासनाकडून करण्यात केला जातो. मा नगराध्यक्षा यांचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसुन,लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना न प प्रशासन अजिबात जुमानत नाही हा एकप्रकारे शहरातील जनतेचा अपमान आहे.केवळ काही विशिष्ट व्यक्ती व अधिकारी यांच्या मर्जीनुसार न प चा अंदाधुंद व गचाळ कारभार सुरू आहे.
आता तरी न प प्रशासन व सत्ताधारी यांचे डोळे उघडतील का?शहरात आरोग्याच्या सुविधे अभावी आणखी किती बळी घेतले जातील?असे प्रश्न शहरवासीयांना पडत आहेत.
अश्याप्रकारे निवेदन देऊन भा रा काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने न प प्रशासनाच्या अंदाधुंद, गलथान व भ्रष्टाचारी कारभाराचा निषेध उपस्थितांमार्फत नोंदविण्यात आला.