यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील साकळी येथे लावण्यात येत असलेला बालविवाह प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी.अर्चना आटोले वेळीच दखल घेतल्याने तात्काळ थांबविण्यात आला , याबाबत वधु आणी वर पक्षांची पोलीस ठाण्यात समज दिल्यानंतर दोघ भावी पती पत्नी यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की आज दिनांक २३ मे रोजी साकळी तालुका यावल येथे मनिषा बुधा भालेराव वय १७ वर्ष६ महीने राहणार देवगाव तालुका चोपडा या अल्पवयीन मुलीचा विवाह गोपाळ ज्ञानेश्वर आढाळे वय२७ वर्ष यांचा विवाह ठरलेल्या प्रमाणे होणार होता मात्र नवरीच्या मावस भाऊ रविन्द्र शालीक सोनवणे यांनी यावल येथे दिनांक २२ मे २०२२रोजी येथील महिला व बालविकास प्रकल्पच्या प्रभारी अधिकारी अर्चना आटोले यांच्याकडे या होत असलेल्या बालविवाह संदर्भात अर्ज दिल्याने या अर्जाची तात्काळ दखल घेत संबधीत विभागाच्या वतीने अर्चना आटोले यांच्या मार्गदर्शना कत्पना तायडे आणी मंगला नेवे यांनी साकळी येथील भवानी माता मंदीर हॉल लग्नास्थळी जावुन हा होणारा बालविवाह थांबविला . वधु आणी वर कडील मंडळींना महिला व बालविकास प्रभारी अधिकारी अर्चना आटोले, कल्पना तायडे पर्यवेक्षीका व साकळी अंगवाडीच्या सेविका मंगला नेवे यांच्या मदतीने यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी हा विवाह थांबविला व लग्न लावणाऱ्या दोघ कडील मंडळीला अखेर पोलीस ठाण्यात यावे लागले , या ठिकाणी पोलीसांच्या मदतीने महिला बालविकास अधिकारी अर्चना आटोले यांच्या मध्यस्थळीने मुलगी ही अल्पवयीन असल्याने सदरचा विवाह लावता येणार नाही तसे झाल्यास आपल्या विरूद्ध गुन्हे दाखल होतील अशी माहीती वधु वराच्या मंडळींना पोलिसांकडुन मिळाल्याने अखेर हा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला या संदर्भात पोलीसांनी वधु आणी वर मडंळीचे जाब जबाब घेतल्याने दोघ लग्न लावणारी मंडळी ही आपआपल्या गावी निघुन गेली . मानापानाचा विषय नडला व वधुचा मावसभाऊ रविन्द्र शालीक सोनवणे याच्या अर्जाने हा विवाह रखडला, आपल्या बहीणीच्या विवाह व्हावा या साठी धावपळ करणाऱ्यांनीच महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सदरचा विवाहीतील नवरी ही अल्पवयीन असल्याचे दाखले व अर्ज दिनांक २२ मे२०२२ रोजी येथील कार्यालयात दिल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले .