यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे
यावल तालुक्यातील भोरटेक जवळील दुर्घटना
यावल : मुलाच्या लग्नाच्या बस्त्यासाठीजाणारे नवरदेवाचे वडील आणि काकू रिक्षा अपघातात ठार झाले, तर तीन जण जखमी झाले.ही घटना भोरटेक, ता.यावलनजीक रविवारी दुपारी १२.३० वाजता घडली. दिलीप दिनकर तायडे (५०) आणि ज्योत्स्ना गोकूळ तायडे (४५) अशी मृत वडील आणि काकूची नावे आहेत.आंदलवाडी, ता. रावेर येथील शुभम दिलीप तायडे याचा बस्ता रविवारी भुसावळ येथे होणार होता.त्यासाठी कुटंबीय आणि नातेवाईक रिक्षाने भुसावळकडे निघाले होते. वाटेत भोरटेक, ता. यावल जवळ रस्त्यावरील खडे चुकवताना चालकाचा ताबा सुटला व अचानक रिक्षा उलटली.
भरधाव असल्याने रिक्षा तीन वेळा उलटली, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.यात नवरदेवचे वडील आणि काकु जागीच ठार झाले, तर ज्योती बुधाकर तायडे, ललिता संतोष तायडे आणि बुधाकर भास्कर तायडे हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच
फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भुसावळ येथील
हॉस्पिटलमध्ये दाखल केले.