गजानन सोनटक्के जळगाव जा
जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे अवकाळी पावसाने फार मोठ्या प्रमाणात गहू व हरभरा पिकाचे नुकसान केले आहे गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने या परिसरात पाण्याची पातळी चांगली आली होती त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी पीक म्हणजेच गहू हरभरा मोठ्या प्रमाणात परिसरात पेरणी केली होती व गहू हरभरा हे पीक चांगल्या प्रमाणात येईल अशी आशा शेतकर्यांना होती परंतु काढणीस आलेला हरभरा व गहू पीक हे जागेवरच ओले झाले व जोरदार असलेल्या वाऱ्यामुळे गहू पीक हे पूर्णतः पसरलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घासही निसर्गाने हिरावला आहे व शेतकऱ्यांचे या वर्षी प्रत्येक पीक हे पावसाने नुकसान केलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे तरी शासन स्तरावरून या पिकाचे पंचनामे व्हावे व शासनाकडून काही मदत मिळावी असे अपेक्षा सूनगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मनाशी बाळगली आहे