हिंगणघाट येथे भाजपला धक्का !

0
658

 

सचिन वाघे वर्धा
21.6.21
हिंगणघाट :– भाजपचे नगरसेवकांनी मुख्यमंत्रीच्या वर्षा बंगल्यावर बांधले शिवबंधन ; स्थानिक नेतृत्वावर दाखविली नाराजी
हिंगणघाट नगरपालिकेची निवडणूक चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना भाजपच्या नऊ नगरसेवकांनी पक्षत्याग करून शिवबंधन बांधले आहे, त्यांच्यासोबत एक अपक्ष नगरसेवक, भाजपयुमो शहर सचिव आणि दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश घेतला आहे.. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे. हिंगणघाट नगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे. मागील निवडणुकीत भाजपला 38 पैकी 28 जागा विजय मिळवता आला होता. त्यांच्या मित्रपक्ष आरपीआयने दोन जागा मिळवल्या होत्या. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला चार, शिवसेनेला एक आणि तीन अपक्ष नगरसेवक असे संख्याबळ होते. भाजपच्या 28 नगरसेवकांपैकी नऊ नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकल्याने भाजप वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या नगरसेवकांनी स्थानिक नेतृत्वावर आपली नाराजी व्यक्त करीत पक्ष त्याग करीत असल्याचे म्हटले आहे . आज सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक सतीश धोबे, नीता धोबे, नगरपालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, मनीष देवढे, निलेश पोगले, भास्कर ठवरी, सुनिता पचोरी, शिक्षण सभापती संगीता वाघमारे, स्वीकृत नगरसेवक मनोज वरघने या नऊ नगरसेवकांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे अपक्ष नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, भाजप भाजयुमोचे शहर सरचिटणीस बंटी वाघमारे हे शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दोन माजी नगरसेवक प्रतिभा पडोळे व देवेंद्र पडोळे यांनीही प्रवेश घेतल्याचे वृत्त आहे. भाजपचे काही नगरसेवक पक्ष सोडण्याची चर्चा अधूनमधून सुरु होती.त्यांची नाराजी दूर करण्यात भाजपच्या नेतृत्वाला अपयश आले. त्याचवेळी जिल्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी संधी साधून या नगरसेवकांना आपल्या गळात अलगद अडविले.या प्रवेशाने भाजपला मोठा हादरा बसलेला आहे.आणखी काही आजी माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.या एकूण घडामोडी बाबत नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना विचारले असता ते म्हणाले की, हे संधी साधू नगरसेवक असून त्यांना येत्या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला असावा. त्यांनी नाराजी व्यक्त केली असती तर ती सोडवता आली असती, त्यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्षाला कोणताही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here