अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत कोंटी येथे शेतकऱ्यांचे ऊस पिकांचे नुकसान

0
258

 

नांदुरा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून परिसरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तालुक्यातील कोंटी. येथील कामिनी बाई प्रल्हाद ठोंबरे या शेतकऱ्यांचे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्याची पाहणी करून कृषी विभागाने पंचनामा करून शेतकऱ्यांला मदत करण्याची वेळ निर्माण झाली आहे या नुकसानीमुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे . काही दिवसा आधी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी सोयाबीन मका ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे कपाशी पिकावर मावा तुला बोंड अळीचे चित्र दिसून येत आहे . अचानक जोरदार पावसामुळे पावसाने उडीद सोयाबीन मूग या पीकांची शेतकऱ्याची आधीच नासाडी झाली आहे कपाशी पिकांचे पात्या फुलं गळून पडत असून त्यामध्ये अळीने थैमान घातले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचे चे चित्र दिसून येत आहे शेतकरी हा आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेला आहे अशातच लागून बसलेली पावसाची झडी या झडीमुळे शेतकऱ्यांना पीक उत्पादनासाठी मोठा झटका बसणार आहे या सर्व प्रकारामुळे या शेतकऱ्याला तात्काळ शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे व कृषी विभागाने कृषी सहाय्यक यांनी झालेल्या नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी . जिल्हा परिषद सदस्य डॉ गोपाळ गव्हाळे . भाजप नेते श्री शांताराम बोधे .श्री संजय ठोंबरे . यांच्यावतीने होत आहे . .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here