SURYA MARATHI NEWS
अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)
हिंगोली : धक्कादायक आहे ही घटना पत्नीने स्वतःचा मुलांच्या साथीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर वडिलांचा मृतदेह मुलांनी शेतात नेऊन जाळून टाकला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात हा नात्यांची लक्तरं मांडणारा प्रकार घडला आहे.हत्येनंतर पळून जाण्याच्या तयारीत असताना तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासांच्या आतच जेरबंद केलं.
काय आहे प्रकरण?
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. पुरावा नष्ट करण्यासाठी पत्नी आणि दोन मुलांनी खून केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकला. अवधूत मुधोळ असं मयत व्यक्तीचं नाव आहे.
शेतीच्या कारणावरुन घरगुती वाद
अवधूत मुधोळ आणि त्यांची दोन मुले-पत्नी यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून शेतीच्या कारणावरुन घरगुती वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला, की पत्नी आणि मुलांनी पतीचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतात जाळून टाकला. शेतात मृतदेह जाळला
सकाळी शेतात जाताना ही बाब गावातील काही नागरिकांना लक्षात आली.
त्यानंतर या घटनेची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर खुनाचा उडगला झाला. या प्रकरण मधेल तिन्ही आरोपी पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्यांना काही तासांच्या आत ताबड़तोब ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे
Surya marathi news



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



