शेगाव: पिक विमा काढलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामधील पीक नुकसानीचा पंचनामा न करताच पंचनामा केल्याचे खोटेच सांगितल्याचे समजताच शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले गजाननराव बिलेवार यांनी तहसील कार्यालय मध्ये झालेल्या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन रिलायन्स पिक विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकाला दूरध्वनीवरून भर बैठकीतच धारेवर धरले त्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली होती. शेगाव येथील तहसील कार्यालयात शेगाव तालुक्यातील माटरगाव व मनसगावपरिसरातील 2020 चा पीक विमा काढलेल्या परंतु मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या बाबत तहसीलदार समाधान सोनवणे तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये शेगाव तहसील कार्यालयामध्ये आज 6 डिसेंबर रोजी दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक असलेले गजाननराव बिलेवार यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक शर्मान राबरी यांना विचारणा केली की नुकसानीचा पंचनामा कोणी कधी केला त्याची प्रत का देत नाहीत्याचे नाव सांगा मात्र रिलायन्स पिक विमाकंपनीच्या व्यवस्थापकाने टाळाटाळ केल्यामुळे दिलेल्या खोट्या माहितीमुळे संतप्त होऊन गजानन बिलेवार यांनी विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकाला त्याच बैठकीच्या ठिकाणी चांगलेच धारेवर धरले ्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेले शेतकरी आणि सर्व अधिकार्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली होती यावेळी तहसीलदार समाधान सोनवणे व तालुका कृषी अधिकारी गायकवाड यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण निवळले. बैठकीला शेतकरी क्रांती संघटनेचे संस्थापक गजानन बिलेवार, राजू पाटील शेळके, अरुण पाटील उन्हाळे, भारत भाऊ कंकाळ राजू पाटील कराळे नामदेवराव कराळे या शेतकर्यासह शेगाव तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पवार ,मंडळ अधिकारी राठोड ,तहसील कार्यालयाचे बाबू वानखडे ,यांच्यासह शेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी होते