भटक्या श्वानांची शुश्रुषा करते ‘ निसर्गसाथी फाउंडेशन ‘ची रेस्क्यु टिम .

0
203

 

हिंगणघाट २७ मार्च शहरात पशु ,पक्षी संवर्धनासाठी कार्यरत निसर्गसाथी फाउंडेशन शहारात भटक्या श्वानांची शुश्रुषा करते.भटक्या श्र्वान सध्या चर्मरोगानी ग्रस्त आहे . अंगावरील पुर्ण केस गळुन सारखे पायांनी अंगावर रक्त येईपर्यंत हे भटके श्र्वान शहरात फेरफटका मारताना सहज नजरेस पडतात.तद्वतच भटका श्र्वान म्हणजे सर्वांकडून दुर्लक्षित अशातच पोटाची भूक भागविण्यासाठी इकडे तिकडे वणवण भटकत असताना अनेकदा मारहाण करुन जखमी करणारे महाभाग श्वानांना लगंडे करून ,जखमी अवस्थेत व्हिवळत असणारे भटके श्र्वान शहरात कुठेतरी रस्त्याचे कडेला , दुकान, हॉटेल शेजारी पहुडलेले असतात खरे मात्र एरवी पाळीव विदेशी श्वानांची सग्यासोयरयापेक्षा जिवापाड काळजी घेणारे बिस्केट ,चाकलेट खाउ घालणारे महाभाग या भटक्या श्वानांकडे ढुंकूनही बघत नाही अशी सध्या ची गावरान देशी श्वानांची अवस्था गावशहरासह जिल्ह्यात राज्यात पहावयास मिळत आहे.
हे देशी गावरान श्वान भटक्या श्वानांत रुपांतरीत होते आहे .पुर्वी पाळीव कुत्रा म्हणजे हमखास देशी श्वान असायचा गावखेड्यात घरोघरी अंगणात ‘ घराचा रक्षक ‘ पाळलेला कुत्रा पहुडलेला पहावयास मिळायचा .दिवसभर मालकासोबत शेतात व संध्याकाळी मालकासोबतच घरी . पाळीव कुत्रा हा मालकांवर जीवापाड प्रेम करायचा मालकांवर ओढवलेल्या संकटात प्रसंगी प्राणाची बाजी लावून स्वत: समर्पीत झाल्याची उदाहरणे ऐकीवात आहे.
मात्र अलीकडे ८० चे दशकांनंतर विदेशी संस्कृती चे अतिक्रमणामुळे आपली संस्कृती गिळंकृत करण्यास प्रारंभ केला.त्यात देशी श्वान ही सुटले नाही .याचा परीणाम म्हणजे गाव शहरातील भटक्या श्वानांचे संख्येत वाढ झाली.राज्याती अनेक नगरपालिका, महानगरपालिका भटक्या कुत्र्यांच्यासंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेवर लाखो रुपये खर्च करीत आहे.
हिंगणघाट शहरातील भटक्या चर्मरोगानी ग्रस्त, मारहाण, अपघातात जखमी श्वानां ,प्राणी ,पशु, पक्षी यांचेवर उपचार करण्यासाठी निसर्ग साथी फाउंडेशन हिंगणघाट ची रेस्क्यु निसर्गसाथी राकेश झाडे याचे नेतृत्वाखाली कार्यरत आहे.मागील‌ वर्षी पासुन आजतागायत जवळपास ५० भटक्या श्वांनांवर उपचार करुन त्यांना बरे केले.
@ देशी कुत्र्या चे वाण जपणे गरजेचे
प्रविण कडु
अध्यक्ष, निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट
निसर्गसाथी फाउंडेशन हिंगणघाट ची रेस्क्यु टिम सध्या शहरातील भटक्या श्वानांवर उपचार करुन त्यांना रोगमुक्त करीत आहे.सध्या स्थितीत गावशहरासह विदेशी पाळीव कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने देशी गावरान श्वानांचे भटक्या,लावारीस श्वानांत रुपांतरीत होत आहे . शहरात, जिल्ह्यात , राज्यात भटक्या श्वानांचे संख्येत नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे लाखो करोडो रुपये खर्च करून निर्बीजीकरण केले जात आहे.वास्तवीकता भारतीय कुत्रा प्रजाती परीहा ,जोनांगी हे पाळणण्यास सर्वोत्तम,कमी खर्चीक , ईमानदार असुनही लोकांचा कल विदेशी कुत्री पाळणा्याकडे वाढला परिणाम देशी कुत्र्या चे रूपांतर भटक्या होत आहे आणी ती प्रजाती कमी कमी होत आहे.अशानी भविष्यात भारतीय गावरान श्वानांचे देशी वाण नष्ट होणार आहे.हे कुठेतरी थांबायला हवे.या देशी कुत्र्या चे संरक्षण , संवर्धन करण्यासाठी निसर्ग साथी फाउंडेशन हिंगणघाट चे राकेश झाडे,स्वप्नील वाळके,करण विटाळे,दीपक जोशी,दिनेश वर्मा,सौरभ लामकासे,रोशन बालपांडे, ऋषिकेश जीवने, चांद जगताप , निधी जक्कनवार ,मिताली जक्कनवार यशस्वी मांडवकर इ कार्यरत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here