डी. एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयामध्ये सकाळी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी मध्ये सहभाग घेतला. प्रभात फेरी मध्ये स्वच्छतेचे महत्व, मास्क व सॅनिटायझर चा नियमित प्रयोग, (सोशल डिस्टंसिंग) सुरक्षित अंतर स्वतः सुरक्षित, गाव सुरक्षित व देश सुरक्षित, कसे राहतील याबद्दल विद्यालयातील सह शिक्षक,
*श्री.सय्यद एम.डी*
सर यांनी गावामध्ये संदेश पर मार्गदर्शन केले व ग्रामस्थांमध्ये जागरण पर माहिती संदेश दिला. विद्यार्थ्यांनी माहिती पर बॅनर बनवून गावामध्ये संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. विद्यालयाचे प्राचार्य
श्री संजीव कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभात फेरी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या प्रभात फेरी मध्ये covid-19चे सर्व नियम पाळून सर्व विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मास्क सोशल डिस्टंसिंग बाळगून ही प्रभात फेरी पूर्ण केली.या प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील
*सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी*
यांनी परिश्रम घेतले.