भारत येनोरकर हल्ला प्रकरणात तीन आरोपींना जमानत तर तीन आरोपी फरार

0
568

 

दि.25 मार्च
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल रायगडचे संचालक भारत येणोरकर यांना लेआउटचे हिशोबाचे वादातुन मारहाण केल्याप्रकरणी एम.सी.आर मधे असलेल्या तीन आरोपींना आज दि.24 रोजी न्यायालयाने त्यांचा जमानत अर्ज मंजुर केला.
रंगपंचमीच्या दिवशी 6
जनांनी त्यांच्यावर शहालंगडी येथील वसंत लॉन परिसरात हल्ला करून बेसबॉल स्टिक व लाठयाकाठ्याने गंभीर मारहाण केली होती.
या प्रकरणातील आरोपी भाजपाचे शहर अध्यक्ष आशिष पर्बत,सोनू आर्य, ताजु अली या तिघांना हिंगणघाट पोलिसांनी त्याच दिवशी अटक केली, दि.22 रोजी पीसीआर संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांची वर्धा कारागृहात रवानगी केली होती.
आरोपींच्यावतीने श्रीमती डफरे यांच्या न्यायालयात दि.22 मार्चला जमानत मिळण्यासाठी अर्ज केला,परंतु खटल्याचे कामकाज पूर्ण न झाल्याने मंगळवारी न्यायाधीश श्रीमती डफरे यांनी त्यांची वर्धा कारागृहात रवानगी केली.
आज दि.24 ला सरकारी पक्षाचे वतीने काही बाबीची पुर्तता केल्यानंतर एमसीआर मधे असलेल्या तिन्ही आरोपीच्या जमानतीचा मार्ग सुकर झाला आहे.
स्थानिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत वर्धा कारागृह तसेच संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांना मिळताच कोठडीतील तिन्ही आरोपींना काही शर्थीवर सोडून देण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयीन परिसरातून मिळाली.
या प्रकरणातील उर्वरित आरोपी हरी शेंडे,विक्की साहू,प्रविण घुरडे हे अद्यापही फरार असून या सर्व आरोपींनी संपत्तीचे हिशोबाचे वादातुन फिर्यादि भारत येणोरकर यांना हल्ला करुन गंभीर जखमी केले,यानंतर जखमी येणोरकर यांना नागपुर येथील सिम्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते, 23 तारखेलारुग्णालयातुन सुट्टी मिळाली .
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here