प्रज्वल यावले
आर्वी तालुका प्रतिनिधी
आर्वी-पुलगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडल्या जात असून या रस्त्याची दळण-वळण खूप मोठ्या प्रमाणात चालते,
तसेच आर्वी-पुलगाव मार्गावर असलेल्या खूबगाव लगतच्या पुलाजवळ अर्धा ते एक फुटाचा खड्डा पडलेला आहे. तसेच हा खड्डा उंचवटा दर्शवून आपले अस्तित्व दर्शीवित आहे.
सध्या पावसाळ्या सुरू झाला असून या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे या खड्डाची अर्धा ते एक फूट असलेली खोली प्रवाशांना समजून येत नसल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.
संबंधित रस्त्याला बहुतांश ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, पण या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे लक्ष वेधले जात नाही का? असा प्रश्न येथील प्रवाशी जनतेला पडला आहे.या रस्त्यावर पडलेली खड्डे बंधकाम विभागाने दुरुस्ती करून घ्यावी, कारण या रस्त्याला प्रवाशी जनता त्रासली आहे,हे मात्र नाकी आहे…
आर्वी-पुलगाव रस्ताची खड्डे संबंधित यंत्रणेने रस्त्याची दखल घेऊन दुरुस्ती करून घ्यावी,अन्यथा एखद्याच्या जीवावर….बीतू शकते