काँग्रेस कार्यलयात संविधान दिन उत्साहात संपन्न

0
728

 

भारतीय संविधान हे सर्वसमावेशक व अतुलनीय : राजूरेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधि
रमेश सुध्दाला

घुग्घुस : भारतीय संविधान हे दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाच्या मेहनतीने तैयार करण्यात आला.
संविधान सभेचे प्रारूप समिती अध्यक्ष डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी निर्मित संविधान राष्ट्राला समर्पित केले.
26 जानेवारी 1949 पासून देशातील गणराज्य अंमलात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 वी जयंती वर्षाच्या उपलक्ष्यात 26 नोव्हेंबर 2015 पासून संपूर्ण देशात संविधान दिन साजरा करण्यात येत आहे.
यापूर्वी हा दिवस कानून दिन म्हणून साजरा केला जात होता.
आज घुग्घुस शहर काँग्रेस कार्यलयाय संविधान दिन साजरा करण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस मालार्पण करण्यात आले
संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी भारतीय संविधान हे लोकतंत्राचे प्राण असून हे सर्व समावेशक व अतुलनीय असल्याचे प्रतिपादन केले

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,विशाल मादर, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे,बंडू झाडे, देव भंडारी,साहिल सैय्यद,सचिन कोंडावार,अंकुश सपाटे,सुनील पाटील,पोचम बासमपेलली,संजय कोवे,रंजित राखुंडे,अंकेश मडावी,प्रणय लिंगांपेलली,सुधाकर झुंगरे,बाबा जीवने,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here