किनगाव बस स्थानकावर बसथांबत नसल्याने विद्यार्थीनी केला एसटी बसचा घेराव आगार प्रमुखांच्या आश्वसनाने घडवुन आला समेट

0
552

 

यावल( प्रतिनीधी),विकी वानखेडे

।कोरोना विषाणुसंसर्ग माहामारीच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशभरात लाँकडाऊन सुरू होते खबरदारीचा उपाय म्हणुन राज्यातील शाळा व महाविद्यालय या पुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या , मात्र देशात अनलाँकची प्रक्रीया सुरू झाली असून, जनजीवन पुर्वपदावर येत असुन , टप्प्या-टप्प्याने व्यवसाय शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय तसेच बस सेवा सुरू होत आहे . यातच सुमारे आठ महिन्यांच्या कालावधीनंतर बंद असलेल्या शाळा- महाविद्यालय देखील सुरुवात झाली असून पूर्वपदावर येण्याची प्रयत्न करीत आहेत .विद्यार्थ्यांनी शैक्षणीक भविष्याच्या दुष्टीने शाळेत जाण्याच्या तळमळीला आहेत , मात्र यावल आगारातील बस सेवा देणारे काही वाहक आणि चालक पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद देत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण त्रास होत आहे. यावलआगाराच्या बसेस बऱ्यापैकी रस्त्यावर सुरू झालेल्या असून किनगावहुन साकळी येथे अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३० मुली व १५ मुले विद्यार्थी हे किनगावहून साकळीला शिक्षणासाठी ये जा करीत असतात या सर्व विद्यार्थ्यांनी किनगाव ते साकळी अश्या पासेस देखील काढल्या असून, दररोज सकाळी ९:३० वाजता हे सर्व विद्यार्थी बस स्थानकावर येतात मात्र यावल आगाराचे काही वाहक व चालक हे किनगाव बस स्थानकावर बस न थांबवता मागे किंवी पुढे बसेस थांबवतात यामुळे विद्यार्थ्यांना पळत जावे लागते तसेच काही बसेस विद्यार्थ्यांना बसवत नाहीत व यामुळे शाळेची वेळही होते कधीकधीतर शाळाच सापळत नाही तसेच दोन दिवसांनपुर्वी एका बसच्या चालकाला विद्यार्थ्यीनींनी विचारले आज बस उशीराने आली त्यावर त्या चालकाने सांगीतले बसची एव्हळावेळ वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला पायीच शाळेत जाता येत नव्हते का याचाही विद्यार्थीनींना राग होता व म्हणून पालकही मोठ्यासंख्येने आक्रमक होते एकुणच यावल आगाराच्या काही वाहक व चालकांनमुळे आगार प्रमुख शांताराम भालेराव व बस स्थानक प्रमुख संदीप जगन्नांथ अडकमोल हे काही वेळातच किनगावला आले आणी पालक व विद्यार्थी यांच्या तक्रारी समजुन घेत बसेस थांबण्याबाबत व सदर अर्वाच्च उत्तरे देणारा चालक यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी सरपंचपती संजय सयाजीराव पाटील किनगाव खु! चे सरपंच भुषण नंदन पाटील उपसरपंच लुकुमान कलंदर तडवी,सचिन नायदे,खलील शे.सुपडू,रविंद्र ठाकूर यांनी यांनीही पालकांना व विद्यार्थ्यांना समज देत आगार प्रमुखांना विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्या बाबत सांगीतले.यावेळी किरण सोनवणे मेहमूद हाजी रूस्तम,अश्पाक
शहा,राजेंन्द्र पाटील,यासीन तडवी,मुक्तार मन्यार,जाहाबीर तडवी,मेहबुब पिंजारी,सबदर तडवी हानिफसर प्राचार्य साकळी व असलम ताहेर मन्यारसर इ.सह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अन् संजय पाटील झाले आक्रमक.
यावल आगाराच्या काही वाहक व चालकांनमुळे किनगाव अपडाउन करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना जो असह्य त्रास सहन करावा लागतो त्यामुळे पालकांचा व नागरिकांचा आमच्यावर रोष आहे व लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही आपणाकडे नेहमी ही कैफियत मांडत असतो मात्र आपण याकडे अजिबात लक्ष देत नाही तरी आपण लवकर विद्यार्थ्यांचा अपडाऊन करण्याचा मार्ग सुरळीत करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू असे सरपंचपती संजय सयाजीराव पाटील यांनी यावेळी आक्रमक होवुन यावल आगाराच्या कारभाऱ्यांना सुनावले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here