आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे
यावल तालुक्यातील एका गावात ग्रामपंचायतील पाण्याची समस्या घेऊन . गेलेल्या ग्रामपंचायत सदस्य महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली .याप्रकरणी शनिवारी स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावल तालुक्यातील एका गावात ३०,वर्षीय विवाहित ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे ३ मे २०२२. रोजी १२.३० वाजेच्या सुमारास पीडित महिला ग्रामपंचायत मध्ये पाण्याची समस्या घेऊन गेली होती, यावेळी ग्रामपंचायत मध्ये हजर असलेले १) नितीन व्यंकट चौधरी 2) ,देविदास हिरामण कोळी ३) ,शिपाई धनराज मुरलीधर चौधरी, ४) लिपिक मोहन भीमराव बाविस्कर ५) विशाल सुद्धा तायडे , ६) सुभाष बाबुराव तायडे, ,७) विजय चंद्रकांत चौधरी, ८) संदेश यशवंत पाटील, यांनी पाण्याची समस्या ऐकून न घेता महिलेची छोडछानी करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
, तसेच पुढील तपास
पोलीस निरीक्षक(आयपीएस) अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उप निरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत