जाम येथे अहमदनगर ते बांगलादेश सद्भभावना सायकल यात्रा चे स्वागत व सत्कार करण्यात आला

0
326

 

समुद्रपूर :- भारत-बांगलादेश सद्भभावना सायकल रॅली 2021 सद्द्भावना सायकल यात्रा महामार्ग जाम येथे दि. 15 ऑक्टोंबर ला पोहोचली असता सर्व सहभागी सायकल रॅली मधील प्रत्येक व्यक्तींचे आमच्या मार्फतीने सत्कार करण्यात आले तसेच पुढील प्रवासासाठी शुभकामना देण्यात आली. सदर रॅली ही अहमदनगर ते बांगलादेश असे 75 दिवस 3000 किलोमीटर असा प्रवास आहे प्रवास करीत असताना महामार्गावर होणारे अपघात याबाबत व तो टाळण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन केले. सर्व यात्रेकरू यांना पुष्पगुच्छ देऊन व चहा , बिस्कीट , पाणी इत्यादी व्यवस्था करुन सत्कार करण्यात आले .सदर रॅली 2 ऑक्टोंबर ते 16 डिसेंबर 2021पावेतो आहे. सदर रॅली ही दिल जोडो भारत जोडो याबाबत आहे.माहिती
API संतोष सपाटे महामार्ग जाम जिल्हा वर्धा यांनी मा. पोलीस अधीक्षक नागपूरला कळविले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here