संग्रामपूर प्रतिनिधी
आज दि. 4 मे रोजी टिपू सुल्तान शहीद दिनानिमित्त वरवट बकाल येथील मुस्लिम युवकांनी ग्रामपंचायत ला टिपू सुल्तान यांची प्रतिमा भेट देऊन एक आदर्श निर्माण केला.
टिपू सुलतान त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला!
टिपू सुल्तान ने स्वतःहा पुढाकार घेऊन मराठ्यांना व निजामला पत्रव्यवहार करून हे सांगितल. टिपूने स्वतःहा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले, इंग्रजांच्या नाकी नऊ आणले. भूमीसाठी अन्यायाविरुद्ध लढता लढता रणांगणात शहीद झाले मात्र माघार घेतली नाही, इंग्रजांसमोर झुकले नाही!
टिपू सुलतान म्हणजे एक आदर्श प्रजाहितवादी,प्रचंड दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता होता. शेतकऱ्यांसाठी त्या काळी नवनवीन व शेतकरी हिताचे धोरण त्यांनी त्याच्या राज्यात राबवले.अस्पृश्यते विरुद्ध लढला,जातीधर्माच्या नावाने कधी भेद केला नाही. मंदिरांना देणग्या ते द्यायचे. गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना ते राबवायचे त्याच्या राज्यात त्यांनी सविस्तर सर्वेक्षण आणि वर्गीकरणावर आधारित भू-महसूल यंत्रणा तयार केली, ज्यामुळे कर पद्धत सुधारली गेली ज्याने राज्याच्या संसाधनाचा मार्ग विस्तृत झाला. त्यांनी शेतीचे आधुनिकीकरण केले, पडीक जमीन विकसित करण्यासाठी कर खंडित केला, सिंचन पायाभूत सुविधा बांधल्या आणि जुनी धरणे दुरुस्त केली,कृषी उत्पादन व रेशीम संवर्धनास चालना दिली.
त्यांनी व्यापाराला आधार देण्यासाठी नौदल बांधले आणि कारखाने उभारण्यासाठी “राज्य कमर्शियल कॉर्पोरेशन” ची स्थापना केली. म्हैसूरचे चंदन, रेशीम, मसाले, तांदूळ आणि गंधक यांचा व्यापार केल्यामुळे टिपूच्या राजवटीत व परदेशातही जवळपास 30 व्यापार चौकी उभारण्यात आल्या होत्या.
टिपूने आपल्या सैन्याची पुनर्रचना केली, नवीन तंत्रज्ञान वापरले,युद्ध मैदानावरील ते उत्कृष्ट स्टॅटर्जी मेकर होते.टिपू सुलतानने युद्धात रॉकेट तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला.म्हणूनच टिपूचा मिसाईलमॅन म्हणून देखील गौरव केला जातो. प्रतिमा भेट देऊन सरपंच प्रतिभा इंगळे यांनी टिपू सुलतान यांच्या फोटोला हारार्पण करून वंदन केले. ह्यावेळी सरपंच प्रतिभा इंगळे, ग्रा प सदस्य संतोष टाकळकर, विशाल बकाल पाटील, राजू राठोड, पंकज इंगळे, शेख रहीम भाई, शेख कारीस. जलील, शे. नईम, शेख सलीम, शेख जावेद, शे. झाकीर, शे. इद्रिस, शे. सिद्दीक, शे. रेहान, नारायण, गणेश माकोडे, विजय वानेरे, राजू टाकळकर, प्रल्हाद धुर्डे, संदीप ढगे सह आदी उपस्थित होते.